अलीकडेच दोन बातम्या समोर आल्या. पहिली बातमी अशीहोती की, भारतातील जवळपास दर 10 पैकी 9 प्रौढांमध्येकोलेस्टेरॉल किंवा इतर लिपिडची पातळी सामान्यमर्यादेच्या वर किंवा खाली आहे. दुसरी बातमी अमेरिकेतूनआली, जिथे अशा एका नवीन औषधाला मंजुरी मिळाली,जे एलडीएल कोलेस्टेरॉल 60% पर्यंत कमी करू शकते. हाकेवळ योगायोग असू शकतो, परंतु तो एक अस्वस्थकरणारा प्रश्नही उपस्थित करतो: एखाद्या आजाराचे ओझेआपल्याला तेव्हाच का आठवण करून दिले जाते, जेव्हात्याच्या उपचारासाठी नवीन बाजारपेठ तयार होते? लठ्ठपणा कमी करणाऱ्या औषधांचा अनुभव याचे स्पष्ट उदाहरण आहे. लठ्ठपणा वर्षानुवर्षे वाढत होता. परंतु नवीनऔषधे येताच लठ्ठपणा हा वैद्यकीय क्षेत्र, माध्यमांमधीलचर्चेचा विषय बनला. यामुळे जनजागृती तर वाढली, पणवजनाला औषधाने ठीक होणारा आजार बनवले गेले.शारीरिक अॅक्टिव्हिटी नसणे, ताणतणाव, प्रोसेस्ड फूडयांसारखी मूळ कारणे मागे सुटली. भारतात हृदयविकार,मधुमेह, लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर वाढत आहेत. आपल्याजीवनशैलीत बसून राहणे वाढले आहे, चालणे कमी झालेआहे आणि जेवणात साखर, मैदा तसेच जंकफूड वाढलेआहे. गेल्या काही वर्षांत लिपिड आणि कोलेस्टेरॉलउपचारांची उद्दिष्टे सातत्याने खाली आली आहेत. अधिकधोका असलेल्या रुग्णांसाठी एलडीएल कोलेस्टेरॉल 55मिलिग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला दिलाजातो. याआधी ही मर्यादा 70 होती. नवीन औषध एलडीएलकोलेस्टेरॉल 56 ते 59% पर्यंत कमी करू शकते. परंतु प्रत्येकरुग्णाला याची गरज असतेच असे नाही. याच वेळी आयसीएमआर-इंडिया अभ्यासाचे निकालहीआले. हा अभ्यास भारतातील 23 हजार 665 प्रौढांवरआधारित होता आणि त्यात असे आढळून आले की, 87.3टक्के लोकांमध्ये लिपिडशी संबंधित किमान एकअसामान्यता होती. येथे हे समजून घेणे आवश्यक आहे की,याचा अर्थ असा नाही की जवळपास 90 टक्के भारतीयांचेखराब कोलेस्टेरॉल धोकादायक पातळीवर आहे किंवात्यांनी औषध सुरू करायलाच हवे. यामध्ये अशालोकांचाही समावेश आहे, ज्यांची एचडीएल लेव्हल कमीआहे. याला चांगले कोलेस्टेरॉल मानले जाते, पण तेवाढवण्यासाठी कोणतेही औषध येत नाही. हे केवळचांगल्या आणि निरोगी जीवनशैलीनेच वाढू शकते. समस्या तेव्हा सुरू होते, जसे उपचारांचे लक्ष्य बदललेजाते तसे लाखो लोक अचानक अशा श्रेणीत येतात, ज्यांनाऔषध दिले जाणे योग्य मानले जाते. वास्तविक त्यांच्याशरीरात रात्रीतून कोणतेही नवीन नुकसान झालेले नसते.याला मेडिकलायझेशन म्हणतात. याचा अर्थ असा नाही कीकोलेस्टेरॉलची औषधे निरुपयोगी आहेत. खरा प्रश्न हाआहे की औषध कोणाला आणि किती काळ हवे आहे? एका बाजूला एक कोटी लोकांना आवश्यक उपचारमिळत नाहीत, तर दुसरीकडे श्रीमंत वर्गात गरजेपेक्षा जास्ततपासण्या व औषधे वाढत आहेत. थोडे वाढलेले एलडीएलअसलेला निरोगी तरुण आणि हृदयविकाराचा झटका सहनकेलेला व्यक्ती हे दोघे सारखे रुग्ण असू शकत नाहीत.जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या आजारांवर गोळ्यांनीउपाय होणार नाही. आपल्याला चांगले अन्न, सक्रिय जीवनव मजबूत प्राथमिक आरोग्य सेवांची गरज आहे. समजूतदाररुग्ण औषधाला नकार देत नाही; तो औषधाची गरज, फायदेआणि कालावधीबद्दल प्रश्न विचारतो आणि विचारपूर्वकनिर्णय घेतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तातडीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी येणार कमी दाबाने पाणी
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रसिद्ध धबधबा पर्यटकांसाठी बंद, आता केवळ रस्त्यावरूनच घेता येणार आनंद
- पुणे: तातडीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी येणार कमी दाबाने पाणी
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

























Subscribe to my channel




