'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप

सिने विश्व: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आगामी 'ईथा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तमाशा आणि लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाच्या शीर्षकावर त्यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटाला 'विठाबाई' हेच नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली असून इतिहासाशी कोणतीही छेडछाड सहन केली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विठाबाई नारायणगावकर हे महाराष्ट्राच्या लोककलेचे मोठे नाव आहे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला वेगळे शीर्षक देणे म्हणजे त्यांच्या वारशाचा आणि ओळखीचा अवमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या वादात काही राजकीय नेत्यांनीही चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असला, तरी शीर्षकाच्या वादामुळे चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. निर्मात्यांकडून अद्याप या वादावर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *