सापांबद्दल समाजात अनेक समज गैरसमज आहेत. त्यामुळे अजूनही दिसला साप की आपण लगेचच त्याला मारतो. मात्र साप हा निसर्ग साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता त्याची माहिती ही सर्पमित्रांना दिल्यास ते सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडू शकतात. भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आढळतात, त्यापैकी काही जाती या अत्यंत विषारी आहेत, तर काही जाती या निमविषारी आहेत. मात्र विषारी आणि निमविषारी जातींच्या सापांची सख्या ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. बहुतांश जाती या बिनविषारी असतात आणि त्यांच्यापासून मानवाला कोणताही धोका नसतो. बिनविषारी जातीच्या सापांमध्ये गवत्या,धामण, वेरुळा, दिवड, शेलाटी अशा अनेक जातींची नाव सांगता येतील, हे साप माणसाला चावले तरी एवढा जास्त धोका नसतो, मात्र कोणताही साप चावला तर खबरदारी म्हणून सर्वात आधी डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करणं गरजेच असतं. तर विषारी सापांमध्ये घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग ज्याला आपण कोब्रा देखील म्हणतो या चार प्रमुख जाती आहेत. ज्याला बिग फोर असं देखील म्हटलं जातं.
महाराष्ट्रासंदर्भात बोलायचं झाल्यास या चारही सापाच्या जाती राज्यात विविध ठिकाणी आढळून येतात, यातील नाग आणि घोणस या दोन विषारी सापाच्या जाती तर राज्यात सर्वत्र आढळून येतात. दरम्यान साप घरात येऊ नये, यासाठी ग्रामीण भागांमध्ये विविध उपाय केले जातात, जसं की विशिष्ट प्रकारची झाडं लावली तर साप घरात येत नाहीत अशी मान्यता आहे. जसं की काही ठिकाणी लसून, कांद्याचं रोप लावतात याच्या तीव्र वासामुळे साप घरात प्रवेश करत नाही अशी मान्यता आहे. असे विविध झाडं आहेत, की ज्यामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करत नाही, मात्र अशी देखील काही झांड आहेत, की जी सापांची आवडती झाडं आहेत, या झाडांच्या विविध गुणधर्मांमुळे साप या झाडांकडे आकर्षित होतो, आज आपण अशाच एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
हे झाड आहे केवड्याचं असं म्हणतात केवड्याच्या पानाला विशिष्ट प्रकारचा सुंगध असतो या वासामुळे साप या झाडाकडे आकर्षित होतो. त्यामुळे आज देखील ग्रामीण भागांमध्ये घरात कोणीही केवड्याचं झाडं लावत नाही, हे झाड शेतात किंवा मोकळ्या जागेतच लावलं जातं. केवड्याच्या झाडाखाली कायम ओल असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये साप गारव्यासाठी या झाडाखाली ओलीला बसण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे चंदनाच्या झाडाकडे देखील साप आकर्षित होतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चंदनाला विशिष्ट प्रकारची फळं येतात, ही फळं खाण्यासाठी पक्षी येतात, पक्ष्यांना ही फळं खूप आवडतात, अनेक पक्षांची घरटे देखील चंदनाच्या झाडावर असतात, त्यामुळे साप पक्षी आणि त्यांची अंडी खाण्यासाठी या झाडाकडे आकर्षित होतात, त्यामुळे आपण अशा ठिकाणी सावध असणं गरजेचं असतं. साप कोणताही असो जर सर्पदंश झाला की वेळ न घालवता तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार करणं गरजेचं असतं, अन्यथा ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




