
New Delhi : कृषी आणि कृषिपूरक क्षेत्रांसाठी क अर्थसंकल्पात एक लाख ६२ हजार ६७१ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ती ७.१२ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी एक लाख ५१ हजार ७५३ कोटींची तरतूद शेतीसाठी केली होती. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविणे आणि पारंपरिक शेतीपलीकडील रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पशुधन, मत्स्य व्यवसाय आणि उच्च मूल्य कृषी क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली आहे.
शेतीउत्पन्नात पशुधनाचा वाटा १६ टक्के असल्याचा उल्लेख करून सीतारामन यांनी गरीब आणि अल्पभूधारक कुटुंबांसाठी कर्ज आधारित भांडवली अनुदान योजनेचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. ही योजना खासगी क्षेत्रातील पशुवैद्यकीय आणि खासगी महाविद्यालये, पशुवैद्यकीय रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि प्रजनन सुविधांच्या स्थापनेस साह्यभूत ठरेल. या योजनेमुळे ग्रामीण भागात २० हजारांपेक्षा अधिक पशुवैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता होऊ शकेल. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पाचशे जलाशये आणि अमृत सरोवरांचा पाचशे जलाशये आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास करून किनारी भागांमधील मूल्य साखळी मजबूत केली जाईल. यामुळे स्टार्टअप्स, महिला बचतगट आणि मत्स्य शेतकरी उत्पादक संघटनांद्वारे बाजारपेठेशी जोडणी सहज शक्य होऊ शकेल. विशेष आर्थिक क्षेत्र आणि खोल समुद्रातील मासेमारीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अशी मस्त्य उत्पादने परदेशी बंदरावर उतरवल्यास, ती निर्यात मानली जाईल. मासेमारीची वाहतूक व हस्तांतरणादरम्यान गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना केल्या जातील, भारतीय मच्छिमारांना देशाच्या प्रादेशिक जलक्षेत्राबाहेरील सागरी संसाधनांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्यास मदत करणे हा मुख्य उद्देश आहे. मागील आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या 'सी-फूड' उत्पादनांच्या 'एफओबी' मूल्याच्या विशिष्ट आयातीवरील शुल्क-मुक्त आयातीची मूल्यमर्यादा वाढविणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
|
|
नारळ प्रोत्साहन योजना
किनारी भागातील शेतकऱ्यांसाठी सीतारामन यांनी जुन्या आणि कमी उत्पादन देणाऱ्या झाडांएवजी नवीन जातींची लागवड करण्याच्या उद्देशाने नारळ प्रोत्साहन योजनेचा प्रस्ताव मांडला. नारळाचे उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये एक कोटी उत्पादक शेतकऱ्यांसह ३० कोटी लोक त्यांच्या उपजीविकेसाठी नारळावर अवलंबून आहेत; तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय काजू आणि कोकोसाठीच्या एका विशेष कार्यक्रमाचा घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या पिकांबाबत २०३० पर्यंत देशाला उत्पादन आणि प्रक्रियेमध्ये आत्मनिर्भर बनविणे, निर्यातीतील स्पर्धात्मकता वाढवणे आणि त्यांना जागतिक स्तरावरील उच्च ब्रँडसमध्ये परावर्तित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
देशी चंदनाच्या लागवडीला चालना
चंदनाची लागवड व उत्पादन काढणीनंतरच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी राज्यांसोबत भागीदारी करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ज्यामुळे
भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडले गेलेल्या चंदन परिसंस्थेला गतवैभव परत मिळू शकेल. डोंगराळ भागातील फळबागांचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा करतानाच, बदाम, अक्रोड, पाइन नट्सच्या लागवडीच्या विस्तारासाठी अर्थसंकल्पात विशेष कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून डोंगराळ भागातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पशुधन उत्पादक संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज-संलग्न अनुदानाचा प्रस्ताव
कृषी स्टॅकचे एकत्रीकरण करण्यासाठी 'भारत विस्तार' हे बहुभाषिक 'एआय' टूल आणणार
महिला समुदायांसाठी 'शी मार्ट्स' ही किरकोळ विक्री केंद्रे स्थापन करणार
तेंदू पत्त्याच्या उद्गमस्थानी कर संकलन (टीसीएस) दोन टक्क्यांपर्यंत कमी करणार
काजू, कोको उत्पादनात देशाला २०३० पर्यंत आत्मनिर्भर बनविणार
शहर
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
- पुणे: मुळा-मुठा आणि भीमा नदीला महापूर! संगम-वाळकी पूल पाण्याखाली; दौंड तालुक्यात रेड अलर्ट
महाराष्ट्र
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!



























Subscribe to my channel


Apply now and unlock exclusive affiliate rewards!