
New Delhi : कृषी आणि कृषिपूरक क्षेत्रांसाठी क अर्थसंकल्पात एक लाख ६२ हजार ६७१ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ती ७.१२ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी एक लाख ५१ हजार ७५३ कोटींची तरतूद शेतीसाठी केली होती. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविणे आणि पारंपरिक शेतीपलीकडील रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पशुधन, मत्स्य व्यवसाय आणि उच्च मूल्य कृषी क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली आहे.
शेतीउत्पन्नात पशुधनाचा वाटा १६ टक्के असल्याचा उल्लेख करून सीतारामन यांनी गरीब आणि अल्पभूधारक कुटुंबांसाठी कर्ज आधारित भांडवली अनुदान योजनेचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. ही योजना खासगी क्षेत्रातील पशुवैद्यकीय आणि खासगी महाविद्यालये, पशुवैद्यकीय रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि प्रजनन सुविधांच्या स्थापनेस साह्यभूत ठरेल. या योजनेमुळे ग्रामीण भागात २० हजारांपेक्षा अधिक पशुवैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता होऊ शकेल. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पाचशे जलाशये आणि अमृत सरोवरांचा पाचशे जलाशये आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास करून किनारी भागांमधील मूल्य साखळी मजबूत केली जाईल. यामुळे स्टार्टअप्स, महिला बचतगट आणि मत्स्य शेतकरी उत्पादक संघटनांद्वारे बाजारपेठेशी जोडणी सहज शक्य होऊ शकेल. विशेष आर्थिक क्षेत्र आणि खोल समुद्रातील मासेमारीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अशी मस्त्य उत्पादने परदेशी बंदरावर उतरवल्यास, ती निर्यात मानली जाईल. मासेमारीची वाहतूक व हस्तांतरणादरम्यान गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना केल्या जातील, भारतीय मच्छिमारांना देशाच्या प्रादेशिक जलक्षेत्राबाहेरील सागरी संसाधनांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्यास मदत करणे हा मुख्य उद्देश आहे. मागील आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या 'सी-फूड' उत्पादनांच्या 'एफओबी' मूल्याच्या विशिष्ट आयातीवरील शुल्क-मुक्त आयातीची मूल्यमर्यादा वाढविणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
|
|
नारळ प्रोत्साहन योजना
किनारी भागातील शेतकऱ्यांसाठी सीतारामन यांनी जुन्या आणि कमी उत्पादन देणाऱ्या झाडांएवजी नवीन जातींची लागवड करण्याच्या उद्देशाने नारळ प्रोत्साहन योजनेचा प्रस्ताव मांडला. नारळाचे उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये एक कोटी उत्पादक शेतकऱ्यांसह ३० कोटी लोक त्यांच्या उपजीविकेसाठी नारळावर अवलंबून आहेत; तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय काजू आणि कोकोसाठीच्या एका विशेष कार्यक्रमाचा घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या पिकांबाबत २०३० पर्यंत देशाला उत्पादन आणि प्रक्रियेमध्ये आत्मनिर्भर बनविणे, निर्यातीतील स्पर्धात्मकता वाढवणे आणि त्यांना जागतिक स्तरावरील उच्च ब्रँडसमध्ये परावर्तित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
देशी चंदनाच्या लागवडीला चालना
चंदनाची लागवड व उत्पादन काढणीनंतरच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी राज्यांसोबत भागीदारी करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ज्यामुळे
भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडले गेलेल्या चंदन परिसंस्थेला गतवैभव परत मिळू शकेल. डोंगराळ भागातील फळबागांचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा करतानाच, बदाम, अक्रोड, पाइन नट्सच्या लागवडीच्या विस्तारासाठी अर्थसंकल्पात विशेष कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून डोंगराळ भागातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पशुधन उत्पादक संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज-संलग्न अनुदानाचा प्रस्ताव
कृषी स्टॅकचे एकत्रीकरण करण्यासाठी 'भारत विस्तार' हे बहुभाषिक 'एआय' टूल आणणार
महिला समुदायांसाठी 'शी मार्ट्स' ही किरकोळ विक्री केंद्रे स्थापन करणार
तेंदू पत्त्याच्या उद्गमस्थानी कर संकलन (टीसीएस) दोन टक्क्यांपर्यंत कमी करणार
काजू, कोको उत्पादनात देशाला २०३० पर्यंत आत्मनिर्भर बनविणार
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel





Apply now and unlock exclusive affiliate rewards!