
Uruli Kanchan: : निवडणुकीच्या बदलत्या समीकरणाची बीजे इतकी खोलवर रुजली आहेत की, यातून नेमकी लोकशाही जिवंत राहणार का आर्थिक हुकुमशाही येणार असा सवाल या प्रक्रियेतून दूर असणाऱ्या वर्गाला सध्या सतावत आहे. यात्रा, देवदर्शन, लक्ष्मीदर्शन की गावातील, परिसरातील विकास कामे याचीच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा गाजत आहेत. कोण जिंकणार कोण हरणार हा विषयच मतदारांच्या गावीच नाही.’
हवेली तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापले असून हवेली तालुक्यातील समीकरणे, उमेदवारांचा धडक प्रचार आणि देवदर्शन-यात्रांच्या माध्यमातून रंगत वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत गावागावातील एक मोठा बदल प्रकर्षाने जाणवतो गावपुढाऱ्यांची पारंपरिक पकड सैल झाली असून, थेट उमेदवाराचा मतदारांशी संपर्क ही बाब निर्णायक ठरत आहे. पूर्वी गावातील वडीलधारी मंडळींनी आदेश द्यायचा त्याप्रमाणे मतदान व्हायचे... नंतर गांवपुढाऱ्यांच्या निर्णयावर निवडणूक काही काळ चालली... अन आता आयोध्या... काशी...
उज्जैन... कोल्हापूर... ज्योतिबा... पंढरपूर. तुळजापूर... अक्कलकोट... गाणगापूर आदी ठिकाणचे देवदर्शन वा पर्यटन, त्यानंतर लक्ष्मीदर्शन तरच मतदर्शन असा नवीन फंडा चालू झाल्याने, लोकशाहीत वावरणाऱ्या सर्वसामान्यांची ही निवडणूक राहिली नाही असे वास्तव चित्र सध्या बघायला मिळत आहे नव्हे तर गंभीर चर्चेचा विषय झाला आहे.
|
|
उमेदवारांचे थेट घराघरात दौरे सुरू झालेले आहेत, सोशल मीडियावरून थेट संवाद वाढलेला दिसत आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन, कोपरा बैठक, जाहिरनामा, मुद्द्यावर आधारित प्रचार यामुळे मध्यस्थी करणाऱ्या गावपुढाऱ्यांची भूमिका पूर्णपणे मागे पडली आहे. त्यातच येणाऱ्या काळातील ग्रामपंचायतीचे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पुढाऱ्यांनीही सावध भूमिका घेतलेली दिसत आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर मतदारांचा विचार बदलतोय फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स, युट्यूब शॉर्ट्स, व्हॉट्सअॅप ग्रुप यांद्वारे उमेदवारांकडून त्यांच्या कामांचा आढावा, प्रतिमा आणि घोषणापत्र थेट जनतेपर्यंत पोहोचत आहे.
यामुळे माहितीचे केंद्रीकरण संपुष्टात आले असून उमेदवारांच्या प्रत्यक्ष कामावर आधारित चर्चांना उधाण आले आहे. राजकारणातील आर्थिक प्रभाव चिंताजनक आहे. "पैसे घेणे चुकीचे आहे अशी लोकांची पूर्वीची धारणा "आताची मानसिकता "वरचे नेते कमावतात, आम्ही घेतलं तर चूक काय? अशी आहे. भेटवस्तू, देवदर्शन व्हिडिओ, जेवण पार्त्या आणि शेवटी पैशांचे व्यवहार या नव्या 'फंड्या'मुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या सामाजिक, राजकीय निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे कठीण झाले आहे.
या बाबी मुळे हवेलीत नवीन समीकरण तयार झाले आहे "देवदर्शन, लक्ष्मीदर्शन की विकास ? "यात्रां, मंदिर भेटी, व्हिडिओ प्रचार या सर्वांमुळे गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे की, "निवडणुका विकासावर होतील की देवदर्शनावर?" त्यामध्ये काही सामाजिक सदस्यांचे मत असे आहे की, "जर निवडणुका मंदिर भेटी आणि व्हिडिओंवर चालणार असतील, तर पैसे नसलेले उमेदवार कसे निवडणूक लढवणार?"
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel




