जंतर-मंतर येथे जे घडले त्याला तुम्ही क्रांती मानता कीएक तात्पुरते वादळ हे तुमच्या राजकीय विचारसरणीवरअवलंबून आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की,पहिल्यांदाच सरकारविरोधात थेट जनक्षोभ उसळला आणित्याचा उघडपणे निषेध करण्यात आला. सरकारने 20जुलैनंतर तातडीने कारवाई केली असेल तर त्याचे खरेकारण हे होते की आंदोलन करणाऱ्या 95% तरुणांमध्ये,प्रामुख्याने मुलांमध्ये मध्यम आणि उच्च-मध्यमवर्गीय हिंदूकुटुंबांचा समावेश होता. हाच त्यांचा मुख्य आधार आहे.तुम्ही त्यांना ‘जेन-झी’ म्हणू शकता आणि त्यांच्या भाषेवर,उच्चारांवर किंवा त्यांच्या अपमानास्पद भाषेवर वाद घालूनत्यांच्या बंडाला नाकारू शकता. हे ‘जेन-झी’ कसे वेगळाविचार करतात यावर शेकडो ‘चर्चा’ होऊ शकतात, पणत्यांनी दाखवलेला प्रतिकार नाकारता येणार नाही. पहिले म्हणजे, त्यांनी प्रचंड शारीरिक धोका पत्करूनप्रतिकार केला हे त्यांच्या मार खाल्ल्यानंतरही पुन्हा एकत्रयेण्यावरून दिसून येते. दुसरे म्हणजे, त्यांनी आपल्याकरिअरची पर्वा न करता जवळजवळ बेपर्वा निर्भयतादाखवली. व्ही. पी. सिंग यांच्या अल्प कार्यकाळातीलआरक्षणविरोधी आंदोलनानंतर नवी दिल्लीतील हे सर्वातहिंसक विद्यार्थी आंदोलन होते. त्यावेळच्या तरुणांनी त्याआरक्षणविरोधी आंदोलनात भाग घेतला होता, ज्यातसुरिंदरसिंग चौहान आणि राजीव गोस्वामी (ज्यांचाही मृत्यूझाला) यांच्यासारख्या काहींनी तर आत्मदहन करण्याचाप्रयत्नही केला होता. दोन्ही आंदोलनांमागील मूळ मुद्देसारखेच होते : करिअर, रोजगार आणि शिक्षण. पहिलेआंदोलन उघडपणे ‘उच्च जातीं’चे होते, तर हे आंदोलनमोठ्या प्रमाणावर इंग्रजी बोलणाऱ्या, मीम्स बनवणाऱ्याउच्च-मध्यमवर्गीय तरुणांचे बनलेले होते. दोन पिढ्यांत चार दशकांचे अंतर होते त्यापैकी कोणालाही पोलिस किंवा दडपशाहीची पर्वा नव्हती. या तरुणांनी उच्चभ्रू वर्गाने लादलेले मौन तोडले, ज्यामुळेत्यांना सरकारवर उघडपणे टीका करता येत नव्हती. हाबऱ्याच अंशी एक थेट निषेध होता. तरुणांनी हे दाखवून दिले की, ‘विकसित भारत’ किंवा ‘अमृतकाळ’ यांसारख्या घोषणांवर मोठ्या लोकसंख्येचा विश्वास नाही. आजच्या ‘जेन-झी’मधील जुनी पिढी 2047 पर्यंत 50 वर्षांची होईलआणि सर्वात तरुण 35 वर्षांची असेल. तोपर्यंत त्यांचे आयुष्य जवळजवळ संपलेले असेल. इतका वेळ थांबण्याची सहनशीलता कोणामध्ये आहे? या घोषणा 50 वर्षांवरील मतदारांना कदाचित प्रभावित करू शकतील, पण मुलांनाइतका दूरचा विचार करता येत नाही. या आंदोलनाने सरकारच्या टीकाकारांना असा भावनिक विश्वास दिला आहे की कोलंबो/ढाका/काठमांडूचीपुनरावृत्ती भारतात घडवली जाऊ शकते. पण हा विश्वास केवळ भारतीय लोकशाहीच्या आणि तिच्या ‘प्रणाली’च्या सामर्थ्याबद्दल अनादर दर्शवतो. तसेच निवडून आलेलेसरकार सहजपणे हटवले जाऊ शकते हा भ्रमही तो उघड करतो. वस्तुस्थिती अशी आहे की, भाजपने केवळ 240जागा जिंकल्या असतील, पण जवळपास 24 कोटीमतदारांनी त्यांना मतदान केले. काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली, पण भाजपला जवळपास दुप्पट मतेमिळाली. तथापि, आंदोलकांनी सरकारच्या विरोधकांसाठीदार उघडले आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की नावेलाछिद्र पडले आहे. सरकारच्या सर्वात निष्ठावान समर्थकवर्गामध्ये असलेल्या लोकप्रियतेबद्दलची सरकारची धारणाआणि वास्तव यातील दरी वाढत आहे. समर्थक वर्गामध्येसरकारबद्दल भ्रमनिरास होणाऱ्या लोकांची संख्या वाढतआहे. यामुळे मला 2018 च्या छत्तीसगड निवडणुकीदरम्यानएका गावात झालेल्या संभाषणाची आठवण झाली, ज्यातमी, प्रणॉय रॉय आणि दोराब सुपारीवाला यांनी भाग घेतलाहोता. आम्ही एका गावकऱ्याला विचारले, “रमण सिंगसरकारने तुम्हाला इतके काही देऊ केले असतानाहीतुम्हाला बदल का हवा आहे?’ त्याचे उत्तर होते, “हे सरकारइतके दिवस सत्तेत आहे! तुम्हाला भाज्या कितीही आवडतअसल्या तरी रोज तेच तेच खाऊन तुम्हाला कंटाळा येणारनाही का?’ त्या संध्याकाळी टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान,प्रणॉयने मला विचारले, “एकच भाजी खाऊन मला कंटाळायेणार नाही का?’ मी उत्तर दिले, “नाही, जर ती भेंडी असेलतर येणार नाही.’ तो एक विनोद होता, पण त्याचा गंभीरपरिणाम असा झाला की निवडणुकीच्या निकालांनीसरकारला सत्तेतून बाहेर काढले. यातून मिळालेला धडा हा होता की थकवा आणि कंटाळा दीर्घकाळ निष्ठावंतअसलेल्या मतदारांनाही निराश करू शकतात. आता 2029पर्यंत स्पर्धात्मक राजकारणाचे लक्ष ‘जेन-झी’ने निर्माणकेलेली दरी कमी करण्यावर किंवा ती वाढवण्यावर असेल.भाजपने ही समस्या ओळखली आहे. म्हणूनच पंतप्रधानांनीआता इन्स्टाग्रामवर संदेश पोस्ट करण्यास सुरुवात केलीआहे. पण ते आपल्या सरकारमध्ये नवचैतन्य आणूशकतील का? शिक्षण मंत्रालयात सहा बदल झाले आहेत.कौशल्य विकास मंत्रालयात चार मंत्री बदलले आहेत. हेमंत्रालय यशस्वी झाले असते तर बेरोजगारी किंवाअर्धबेरोजगारी कमी झाली असती. नियोजन आयोग रद्दकरण्यात आला आहे, पण नियोजन मंत्रालय कायम आहे.सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह अवजड उद्योग यापैकीप्रत्येक मंत्रालय रोजगार निर्मितीमध्ये भूमिका बजावू शकते.विरोधी पक्षांनाही हे लक्षात ठेवावे लागेल की सत्ता काहीआकाशातून टपकून मिळत नाही. भारतात, कोणत्याहीशक्तिशाली नेत्याला आव्हान देऊन कुणीही त्याला हरवूशकलेले नाही. ते स्वत:च पराभवाचे कारण ठरले आहेत.आणीबाणीला इंदिरा गांधींनी आपल्या पराभवाचे कारणबनवले, शाह बानो प्रकरणापासून अयोध्येपर्यंतच्या अनेकचुका राजीव गांधींनी आपल्या पराभवाचे कारण बनल्या,तर अटलबिहारी वाजपेयींनी ‘भारत उदय’च्या भ्रमात येऊनवेळेआधीच निवडणुका घेतल्या. प्रत्येक वेळी एखादाशक्तिशाली नेता तेव्हाच पराभूत झाला आहे, जेव्हा विरोधीपक्षाला एखाद्या अशा व्यक्तिमत्त्वाचा आधार मिळाला,ज्याने लाट निर्माण केली. इंदिरा गांधींच्या विरोधात जेपी उभेराहिले, तर राजीव गांधींच्या विरोधात व्हीपी सिंग उभेराहिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि यूपीए सरकारउलथवून टाकण्यात संघानेही भूमिका बजावली होती.काँग्रेसची कमजोरी ही आहे की त्यांच्याकडे अशीकोणतीही निष्ठावान पायदळ सेना नाही. या नव्या संधीचाफायदा घेण्यासाठी त्यांच्याकडे तीन वर्षांचा वेळ आहे, परंतुभाजपकडेही तयारीसाठी तेवढाच वेळ आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) पराभवाचे कारण ते स्वत:च...भारतात कोणत्याही शक्तिशाली नेत्यालाआव्हान देणारा त्याला हरवू शकलेलानाही. त्याला स्वतःच्या पराभवाचे कारणबनावे लागते. तथापि, संघानेजेपी-व्हीपीसोबत मिळून इंदिरा गांधी,राजीव गांधी व यूपीए सरकार उलथवूनटाकण्यात भूमिका बजावली. काँग्रेसचीकमजोरी ही आहे की त्यांच्याकडे अशानिष्ठावान सैनिकांची कमतरता आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तातडीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी येणार कमी दाबाने पाणी
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रसिद्ध धबधबा पर्यटकांसाठी बंद, आता केवळ रस्त्यावरूनच घेता येणार आनंद
- पुणे: तातडीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद, तर शुक्रवारी येणार कमी दाबाने पाणी
- मुंबई: एकाच ॲपवर एसटी, ऑटो आणि टॅक्सीची सुविधा; महाराष्ट्र शासनाच्या 'छावा राईड' ॲप लाँचच्या दिशेने मोठे पाऊल, निविदा प्रक्रिया सुरू
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली

























Subscribe to my channel




