संशोधक म्हणून अजय आपल्या कामात एआयचा वापर करतो, पण लॅबच्या बाहेरही एआय टूल त्याचा संभाषण-प्रशिक्षक बनले आहे. तो संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये संभाषणाची सुरुवातीची वाक्ये, पाहुणे व मित्रांना शुभेच्छा देण्याच्या आयडियाज लिहिण्यातही त्याची मदत घेतो. तो विचारतो की, जर कोणी असा अवघड प्रश्न विचारला की ‘लग्न कधी करत आहेस?’ तेव्हासुद्धा समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी एआय त्याची मदत करतो. समजा संभाषण अशा एखाद्या पुस्तकावर किंवा लेखावर गेले, ज्याची अजयला माहिती नाही, तर तो लगेच एआयकडे सारांश मागवतो. जोपर्यंत एआय सारांश बनवतो, त्या क्षणांमध्ये अजय एक ओळ म्हणत राहतो की, ‘मी कधीतरी वाचतो.’ असे नाही की अजय स्वतः विचार करू शकत नाही, पण एआय गोष्टी थोड्या सोप्या करून देतो. 20 वर्षांचा अजय तरुणांच्या वेगाने वाढणाऱ्या त्या गटाचा भाग आहे, जे अगदी मानवी कामेसुद्धा एआयकडून करून घेत आहेत. लहान-मोठ्या सामाजिक भीतीचा (सोशल अँक्झायटीचा) सामना करणारे अनेक तरुण अजयप्रमाणेच समोरासमोर भेटण्यापूर्वी एआयची मदत घेतात. सामान्य व्हॉट्सॲप चॅटमध्येही आता बॉट-जनरेटेड मेसेज दिसू लागले आहेत, पण या वयाच्या रोमँटिक पार्टनर्समध्ये यांची संख्या बऱ्याच अंशी आहे. अचानक त्यांचे टेक्स्ट अचूक व्याकरणाचे होऊ लागतात. वास्तवात समोरची व्यक्ती हे जाणते की ही तीच व्यक्ती आहे, जी साध्या ओळीसुद्धा पाच चुकांशिवाय लिहू शकत नाही. अनेक नाती तर घट्ट होण्यापूर्वीच तुटू लागली आहेत. एक पार्टनर अशी इच्छा बाळगतो की संभाषण थोडे विस्तारलेले असावे, कारण आपलेपणा त्याच अनौपचारिकतेतून येतो. ही परिपूर्णता यासाठी येते, कारण चॅटबॉट्स मानवी भाषेचे पॅटर्न जोडून वाक्ये बनवतात. मी एका अशा मुलीला ओळखतो, जिने आपले नाते म्हणूनच संपवून टाकले, कारण तिला वाटले की ती ज्या मुलाला डेट करत होती, तो इतका आळशी आणि प्रेमाच्या बाबतीत निरस आहे की, त्याने त्यांचे संभाषणसुद्धा एआयच्या हातात सोपवून दिले. ब्लॉक करण्यापूर्वी तिने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हटले की, ‘हे विचित्र आहे की तुझ्या प्रेमाचे शब्दही तुझे नसून एआय जनरेटेड आहेत.’ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एश्ली गोल्डन म्हणतात की, ‘हे दोन्ही बाजूंसाठी नुकसानदायक आहे. चॅटबॉट्सचा उद्देश उत्पादकता (प्रॉडक्टिव्हिटी) वाढवणे हा होता, नाती बनवणे नाही.’ जर तुम्ही असे तरुण असाल, जो आपला प्रत्येक टेक्स्ट एआयकडून तपासून घेत आहे, तर तुम्ही स्वतःला हेच शिकवत आहात की तुमची स्वतःची समज विश्वासपात्र नाही. ही गोष्ट विशेषतः अशा लोकांना जास्त लागू होते, ज्यांना सामाजिक भीती (सोशल अँक्झायटी) असते. गोल्डन मानतात की एआय लोकांना सोशल मिसस्टेप्सच्या वेदनेपासून वाचवू शकतो, पण हा दिलासा तात्पुरता असतो. हळूहळू हेच टूल कुबड्या बनते आणि लोक स्वतःच्या निर्णयांवरच कमी विश्वास ठेवू लागतात. आज अनेक एक्झिक्युटिव्हज् जेव्हा व्यवस्थापनाच्या नोटीसला रागारागात रिप्लाय लिहितात, तेव्हा तो एआयच्या मदतीने सुधारण्याचा प्रयत्न करतात. आधी मनातील भाव लिहिणे आणि नंतर त्यांना एआयच्या माध्यमातून भाषेत ढकलणे घेणाऱ्या व्यक्तीला थोड्या गोंधळात टाकते. भाषा जरी उत्तम होत असली, तरी पत्रातील भावना कोणतीही स्पष्ट भूमिका दर्शवत नाहीत. अनेकदा मित्रांशी समोरासमोर संवाद साधण्यासाठी एआयचा आधार घेणे तरुणांवर उलटलेदेखील आहे आणि नंतर गोल्डन यांनी त्यांचे समुपदेशन केले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या कठीण संभाषणाच्या तयारीसाठी एआयचा वापर करणे योग्य आहे, पण संपूर्ण संभाषण त्याच्या भरवशावर असू नये. एआय हे सांगू शकतो की काय बोलायचे आहे, पण कसे बोलायचे हे प्रत्येक व्यक्तीला स्वतः शिकावे लागेल. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की, मोठ्या इव्हेंट्स किंवा क्लायंट्सची उत्तरे तयार करण्यापर्यंत एआयचा वापर ठीक आहे, पण भावनिक संभाषणाची स्क्रिप्ट लिहून घेणे बॅकफायर करू शकते. कारण ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही. फंडा असा की, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एआयकडून पॉलिश करून घेतली, तर हळूहळू तुम्ही स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वावरील विश्वास गमावून बसाल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



