संशोधक म्हणून अजय आपल्या कामात एआयचा वापर करतो, पण लॅबच्या बाहेरही एआय टूल त्याचा संभाषण-प्रशिक्षक बनले आहे. तो संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये संभाषणाची सुरुवातीची वाक्ये, पाहुणे व मित्रांना शुभेच्छा देण्याच्या आयडियाज लिहिण्यातही त्याची मदत घेतो. तो विचारतो की, जर कोणी असा अवघड प्रश्न विचारला की ‘लग्न कधी करत आहेस?’ तेव्हासुद्धा समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी एआय त्याची मदत करतो. समजा संभाषण अशा एखाद्या पुस्तकावर किंवा लेखावर गेले, ज्याची अजयला माहिती नाही, तर तो लगेच एआयकडे सारांश मागवतो. जोपर्यंत एआय सारांश बनवतो, त्या क्षणांमध्ये अजय एक ओळ म्हणत राहतो की, ‘मी कधीतरी वाचतो.’ असे नाही की अजय स्वतः विचार करू शकत नाही, पण एआय गोष्टी थोड्या सोप्या करून देतो. 20 वर्षांचा अजय तरुणांच्या वेगाने वाढणाऱ्या त्या गटाचा भाग आहे, जे अगदी मानवी कामेसुद्धा एआयकडून करून घेत आहेत. लहान-मोठ्या सामाजिक भीतीचा (सोशल अँक्झायटीचा) सामना करणारे अनेक तरुण अजयप्रमाणेच समोरासमोर भेटण्यापूर्वी एआयची मदत घेतात. सामान्य व्हॉट्सॲप चॅटमध्येही आता बॉट-जनरेटेड मेसेज दिसू लागले आहेत, पण या वयाच्या रोमँटिक पार्टनर्समध्ये यांची संख्या बऱ्याच अंशी आहे. अचानक त्यांचे टेक्स्ट अचूक व्याकरणाचे होऊ लागतात. वास्तवात समोरची व्यक्ती हे जाणते की ही तीच व्यक्ती आहे, जी साध्या ओळीसुद्धा पाच चुकांशिवाय लिहू शकत नाही. अनेक नाती तर घट्ट होण्यापूर्वीच तुटू लागली आहेत. एक पार्टनर अशी इच्छा बाळगतो की संभाषण थोडे विस्तारलेले असावे, कारण आपलेपणा त्याच अनौपचारिकतेतून येतो. ही परिपूर्णता यासाठी येते, कारण चॅटबॉट्स मानवी भाषेचे पॅटर्न जोडून वाक्ये बनवतात. मी एका अशा मुलीला ओळखतो, जिने आपले नाते म्हणूनच संपवून टाकले, कारण तिला वाटले की ती ज्या मुलाला डेट करत होती, तो इतका आळशी आणि प्रेमाच्या बाबतीत निरस आहे की, त्याने त्यांचे संभाषणसुद्धा एआयच्या हातात सोपवून दिले. ब्लॉक करण्यापूर्वी तिने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हटले की, ‘हे विचित्र आहे की तुझ्या प्रेमाचे शब्दही तुझे नसून एआय जनरेटेड आहेत.’ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एश्ली गोल्डन म्हणतात की, ‘हे दोन्ही बाजूंसाठी नुकसानदायक आहे. चॅटबॉट्सचा उद्देश उत्पादकता (प्रॉडक्टिव्हिटी) वाढवणे हा होता, नाती बनवणे नाही.’ जर तुम्ही असे तरुण असाल, जो आपला प्रत्येक टेक्स्ट एआयकडून तपासून घेत आहे, तर तुम्ही स्वतःला हेच शिकवत आहात की तुमची स्वतःची समज विश्वासपात्र नाही. ही गोष्ट विशेषतः अशा लोकांना जास्त लागू होते, ज्यांना सामाजिक भीती (सोशल अँक्झायटी) असते. गोल्डन मानतात की एआय लोकांना सोशल मिसस्टेप्सच्या वेदनेपासून वाचवू शकतो, पण हा दिलासा तात्पुरता असतो. हळूहळू हेच टूल कुबड्या बनते आणि लोक स्वतःच्या निर्णयांवरच कमी विश्वास ठेवू लागतात. आज अनेक एक्झिक्युटिव्हज् जेव्हा व्यवस्थापनाच्या नोटीसला रागारागात रिप्लाय लिहितात, तेव्हा तो एआयच्या मदतीने सुधारण्याचा प्रयत्न करतात. आधी मनातील भाव लिहिणे आणि नंतर त्यांना एआयच्या माध्यमातून भाषेत ढकलणे घेणाऱ्या व्यक्तीला थोड्या गोंधळात टाकते. भाषा जरी उत्तम होत असली, तरी पत्रातील भावना कोणतीही स्पष्ट भूमिका दर्शवत नाहीत. अनेकदा मित्रांशी समोरासमोर संवाद साधण्यासाठी एआयचा आधार घेणे तरुणांवर उलटलेदेखील आहे आणि नंतर गोल्डन यांनी त्यांचे समुपदेशन केले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या कठीण संभाषणाच्या तयारीसाठी एआयचा वापर करणे योग्य आहे, पण संपूर्ण संभाषण त्याच्या भरवशावर असू नये. एआय हे सांगू शकतो की काय बोलायचे आहे, पण कसे बोलायचे हे प्रत्येक व्यक्तीला स्वतः शिकावे लागेल. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की, मोठ्या इव्हेंट्स किंवा क्लायंट्सची उत्तरे तयार करण्यापर्यंत एआयचा वापर ठीक आहे, पण भावनिक संभाषणाची स्क्रिप्ट लिहून घेणे बॅकफायर करू शकते. कारण ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही. फंडा असा की, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एआयकडून पॉलिश करून घेतली, तर हळूहळू तुम्ही स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वावरील विश्वास गमावून बसाल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



