कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याहीआश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधीलोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यातफारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30 वर्षीयअभिजित दिपके यांच्या अनपेक्षित उदयाकडे गांभीर्यानेपाहिले पाहिजे. 16 मे रोजी ‘कॉक्रोचनी एकत्र यावे'' असेआवाहन करणारे त्यांचे एक ट्विट देशभरातीलयुवकांच्या आंदोलनात रूपांतरित होईल आणि अखेरीसएका प्रभावशाली केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावालागेल, असे कुणाला वाटले होते का? काहीकाळापूर्वीपर्यंत दिपके आणि त्यांची कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) देशात फारशी परिचित नव्हती. आजपरिस्थिती अशी आहे की, टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी, युट्यूबर्स आणि मोठे राजकारणी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील साध्या घराचा शोध घेत आहेत. अनेकांनी केवळ ऑनलाइन ट्रेंड म्हणून दुर्लक्ष केलेली ही चळवळ अचानक वर्षातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडींपैकी एक ठरली आहे. मात्र, सीजेपीने तात्कालिक लढाई जिंकली असली तरी तिची खरी कसोटी आता सुरू होते. सीजेपीने केवळप्रेशर ग्रुप म्हणूनच राहावे की निवडणुकीच्याराजकारणातही उतरावे? अलीकडेच मी हाच प्रश्नदिपके यांना विचारला. त्यांनी तत्काळ उत्तर दिले,"राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आम्ही विचारहीकेलेला नाही. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणीकरणारी चळवळ म्हणूनच आम्हाला राहायचे आहे.’देशाने यापूर्वीही असेच विधान ऐकले होते . 2011 मध्येअरविंद केजरीवाल वारंवार सांगत होते की,राजकारणात येण्याचा विचार नाही. मात्र, अवघ्या दोनवर्षांत ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. प्रत्येक यशस्वीआंदोलनासमोर शेवटी हाच प्रश्न उभा राहतो—नैतिकबळाचे राजकीय शक्तीत रूपांतर कसे करायचे? तेही तीनैतिक विश्वासार्हता गमावल्याशिवाय? ही कोंडी दिपकेअनेकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात.कारण त्यांनी आम आदमी पक्षासोबत काम केले आहे.त्यामुळे त्यांनी या प्रवासाच्या दोन्ही बाजू जवळूनपाहिल्या आहेत. आघाड्या, तडजोडी आणिसंघटनात्मक बंधने अपरिहार्य असतात. तेव्हा तिचीनैतिक शुचिता टिकवून ठेवणे किती कठीण असते.इतिहास सांगतो की, प्रत्येक यशस्वी राजकीयपरिवर्तनासाठी केवळ जनआक्रोश पुरेसा नसतो.त्यासाठी योग्य वेळ व स्पष्ट सामाजिक आधारआवश्यक असतो. केजरीवाल केवळ भ्रष्टाचारविरोधीलाटेवर स्वार झाले नव्हते. ते भारतातील वाढत्या शहरीमध्यमवर्गाचा आवाज बनले होते. भ्रष्टाचार, निकृष्टसार्वजनिक सेवा आणि सामान्यांच्या प्रश्नांपासूनदुरावलेल्या व्यवस्थेमुळे हा सुशिक्षित वर्ग अस्वस्थझाला होता. हाच वर्ग ‘आप''चा भक्कम सामाजिक पायाठरला. नैतिक संतापामुळे एखाद्या आंदोलनाचा जन्महोऊ शकतो. पण निवडणुकीत तो फार काळ टिकतनाही. त्यामुळेच दिपके यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्नउभा राहतो. सीजेपीचा मुख्य समर्थक वर्ग नेमकाकोणता? वारंवार पेपरफुटीमुळे त्रस्त झालेली जेन-झी?नोकरीसाठी संघर्ष करणारे बेरोजगार पदवीधर? कीभारताच्या विकासप्रवासात आपण मागे पडलो आहोत,असे वाटणारा महत्त्वाकांक्षी निम्न मध्यमवर्ग? याप्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाल्याशिवाय कोणत्याहीआंदोलनाचे निवडणुकीतील राजकीय ताकदीत रूपांतरहोणे अत्यंत कठीण आहे. भारतीय जनता पक्ष आजहीदेशातील सर्वात प्रभावी निवडणूक शक्ती आहे. एकाकेंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणे ही निश्चितच मोठीकामगिरी आहे. परंतु भाजपासारख्या मजबूत निवडणूकयंत्रणेला पराभूत करणे ही पूर्ण वेगळी बाब आहे. खरे तरसीजेपीची सर्वात मोठी ताकद याच गोष्टीत आहे की, तीराजकीय पक्ष नाही. या आंदोलनाने जनतेच्या मनातस्थान निर्माण केले. कारण ते पारंपरिक पक्षीयराजकारणाच्या पलीकडे उभे राहिले. त्यांनी युवकांनाआपला रोष व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्धकरून दिले. ही नैतिक विश्वासार्हता मौल्यवान आहे.एकदा ती गमावली तर ती पुन्हा मिळवणे अत्यंत कठीणठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एखादी चळवळ निवडणुकीच्याराजकारणात प्रवेश करते तसा तिचाप्रत्येक निर्णय तडजोडीसारखा वाटूलागतो. एकेकाळी व्यवस्थेला बाहेरूनआव्हान देणारी संघटना हळूहळू त्याचव्यवस्थेचा भाग बनते. कदाचित याचकारणामुळे सीजेपीला दबाव गट म्हणूनचकायम राहायचे असावे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




