राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:सीजेपी ‘दबाव गट”च राहणार‎ राजकारणातही उतरणार?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याही‎आश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधी‎लोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यात‎फारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30 वर्षीय‎अभिजित दिपके यांच्या अनपेक्षित उदयाकडे गांभीर्याने‎पाहिले पाहिजे. 16 मे रोजी ‘कॉक्रोचनी एकत्र यावे'' असे‎आवाहन करणारे त्यांचे एक ट्विट देशभरातील‎युवकांच्या आंदोलनात रूपांतरित होईल आणि अखेरीस‎एका प्रभावशाली केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा‎लागेल, असे कुणाला वाटले होते का? काही‎काळापूर्वीपर्यंत दिपके आणि त्यांची कॉक्रोच जनता पार्टी ‎‎(सीजेपी) देशात फारशी परिचित नव्हती. आज‎परिस्थिती अशी आहे की, टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी, ‎‎युट्यूबर्स आणि मोठे राजकारणी त्यांच्या छत्रपती ‎‎संभाजीनगर येथील साध्या घराचा शोध घेत आहेत. ‎‎अनेकांनी केवळ ऑनलाइन ट्रेंड म्हणून दुर्लक्ष केलेली ही ‎‎चळवळ अचानक वर्षातील सर्वात मोठ्या राजकीय ‎‎घडामोडींपैकी एक ठरली आहे.‎ मात्र, सीजेपीने तात्कालिक लढाई जिंकली असली तरी ‎‎तिची खरी कसोटी आता सुरू होते. सीजेपीने केवळ‎प्रेशर ग्रुप म्हणूनच राहावे की निवडणुकीच्या‎राजकारणातही उतरावे? अलीकडेच मी हाच प्रश्न‎दिपके यांना विचारला. त्यांनी तत्काळ उत्तर दिले,‎"राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आम्ही विचारही‎केलेला नाही. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी‎करणारी चळवळ म्हणूनच आम्हाला राहायचे आहे.’‎देशाने यापूर्वीही असेच विधान ऐकले होते . 2011 मध्ये‎अरविंद केजरीवाल वारंवार सांगत होते की,‎राजकारणात येण्याचा विचार नाही. मात्र, अवघ्या दोन‎वर्षांत ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. प्रत्येक यशस्वी‎आंदोलनासमोर शेवटी हाच प्रश्न उभा राहतो—नैतिक‎बळाचे राजकीय शक्तीत रूपांतर कसे करायचे? तेही ती‎नैतिक विश्वासार्हता गमावल्याशिवाय? ही कोंडी दिपके‎अनेकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात.‎कारण त्यांनी आम आदमी पक्षासोबत काम केले आहे.‎त्यामुळे त्यांनी या प्रवासाच्या दोन्ही बाजू जवळून‎पाहिल्या आहेत. आघाड्या, तडजोडी आणि‎संघटनात्मक बंधने अपरिहार्य असतात. तेव्हा तिची‎नैतिक शुचिता टिकवून ठेवणे किती कठीण असते.‎इतिहास सांगतो की, प्रत्येक यशस्वी राजकीय‎परिवर्तनासाठी केवळ जनआक्रोश पुरेसा नसतो.‎त्यासाठी योग्य वेळ व स्पष्ट सामाजिक आधार‎आवश्यक असतो. केजरीवाल केवळ भ्रष्टाचारविरोधी‎लाटेवर स्वार झाले नव्हते. ते भारतातील वाढत्या शहरी‎मध्यमवर्गाचा आवाज बनले होते. भ्रष्टाचार, निकृष्ट‎सार्वजनिक सेवा आणि सामान्यांच्या प्रश्नांपासून‎दुरावलेल्या व्यवस्थेमुळे हा सुशिक्षित वर्ग अस्वस्थ‎झाला होता. हाच वर्ग ‘आप''चा भक्कम सामाजिक पाया‎ठरला. नैतिक संतापामुळे एखाद्या आंदोलनाचा जन्म‎होऊ शकतो. पण निवडणुकीत तो फार काळ टिकत‎नाही. त्यामुळेच दिपके यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न‎उभा राहतो. सीजेपीचा मुख्य समर्थक वर्ग नेमका‎कोणता? वारंवार पेपरफुटीमुळे त्रस्त झालेली जेन-झी?‎नोकरीसाठी संघर्ष करणारे बेरोजगार पदवीधर? की‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारताच्या विकासप्रवासात आपण मागे पडलो आहोत,‎असे वाटणारा महत्त्वाकांक्षी निम्न मध्यमवर्ग? या‎प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाल्याशिवाय कोणत्याही‎आंदोलनाचे निवडणुकीतील राजकीय ताकदीत रूपांतर‎होणे अत्यंत कठीण आहे. भारतीय जनता पक्ष आजही‎देशातील सर्वात प्रभावी निवडणूक शक्ती आहे. एका‎केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणे ही निश्चितच मोठी‎कामगिरी आहे. परंतु भाजपासारख्या मजबूत निवडणूक‎यंत्रणेला पराभूत करणे ही पूर्ण वेगळी बाब आहे. खरे तर‎सीजेपीची सर्वात मोठी ताकद याच गोष्टीत आहे की, ती‎राजकीय पक्ष नाही. या आंदोलनाने जनतेच्या मनात‎स्थान निर्माण केले. कारण ते पारंपरिक पक्षीय‎राजकारणाच्या पलीकडे उभे राहिले. त्यांनी युवकांना‎आपला रोष व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध‎करून दिले. ही नैतिक विश्वासार्हता मौल्यवान आहे.‎एकदा ती गमावली तर ती पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण‎ठरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ एखादी चळवळ निवडणुकीच्या‎राजकारणात प्रवेश करते तसा तिचा‎प्रत्येक निर्णय तडजोडीसारखा वाटू‎लागतो. एकेकाळी व्यवस्थेला बाहेरून‎आव्हान देणारी संघटना हळूहळू त्याच‎व्यवस्थेचा भाग बनते. कदाचित याच‎कारणामुळे सीजेपीला दबाव गट म्हणूनच‎कायम राहायचे असावे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *