
Mumbai News : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात सुरू झालेले मराठा आंदोलन आणि त्यामुळे भाजपपासून मराठा समाज दुरावला असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. मात्र असे असले तरी मराठा समाजाच्या तुलनेत बहुसंख्य असलेला ओबीसी समाज सोबत राहावा, यासाठी भाजपतर्फे प्रयत्न सुरु केले गेले.
मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा घेत ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला असला, तरी पुन्हा एकदा सोशल इंजिनीरिंग करत चाळीस वर्षांपूर्वीचा ‘माधव’ फॉर्मुला राबविण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान करण्यात येत आहे. भाजपने १९८० च्या दशकात हा फॉर्म्युला वापरून ओबीसी समाज आपल्याकडे आकृष्ट करीत आपल्यावरील शेटजी भटजींचा पक्ष हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला होता.
|
|
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या निवडणुकीत महायुतीसमोर महाविकास आघाडीने तगडे आव्हान उभे केले आहे.
त्यामुळे ४०० पारचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर राज्यातील बहुसंख्य असलेला ओबीसी समाज सोबत असणे ही भाजपसाठी आवश्यक आहे. ‘माधव’ म्हणजे, माळी, धनगर आणि वंजारी. ओबीसी समुदायातील या प्रबळ जाती आहेत.
संख्येने जास्त असलेल्या या जाती सर्वच मतदार संघांत आहेत. त्यातच आर्थिकदृष्ट्या सधन असलेला हा समाज राजकारणातही सक्रिय आहे. या जातींना आपल्याकडे वळते करून राज्यात सत्ता आणण्याची अशी भाजपची खेळी आहे. अहमदनगरचे नाव बदलून आहिल्यानगर करणे हा त्याच खेळीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
सांगली, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात धनगर समाजाची मोठी संख्या आहे. राज्यातील जवळपास शंभर विधानसभा मतदारसंघांत आणि सुमारे १५-१६ लोकसभा मतदार संघांवर या समाजाचा प्रभाव आहे.
त्यामुळे या समाजाच्या मतांवरच या मतदार संघातील गणित ठरू शकते. याच ‘माधव’ फॉर्मुल्याचा भाग म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कोट्यातून परभणीतून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने जानकर यांना माढा लोकसभेतून उमेदवारी देण्याची तयारी दाखवताच महायुतीने त्यांना परभणीतून उमेदवारी दिली.
गेले अनेक दिवस विजनवासात गेलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने बीड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. बीड मतदार संघात वंजारी समाज बहुसंख्य असल्याने, या समाजाची मते येथे निर्णायक ठरू शकतात.
त्याचबरोबर परभणीतील गंगाखेड व पूर्णा, लातुरातील अहमदपूर व उदगीर, नाशिक जिल्ह्यातील नाशिक व सिन्नर आणि नगर जिल्ह्यातील पाथर्डी व इतर काही भागात वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे.
पंकजा मुंडे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला उमेदवारी देऊन पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याचा प्रयोग हा वंजारी समाज महायुतीकडे खेचण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे बोलले जाते. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीचा फायदा बीड व्यतिरिक्त अन्य मतदार संघातही होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधून माळी समाजाचा उमेदवार दिल्यास ‘माधव३ फॉर्म्युला परिपूर्ण सक्रिय होईल आणि त्याचा फायदा अन्य मतदार संघांमध्ये करून घेता येणार आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र सदनासंदर्भातील प्रकरण नव्याने ऐरणीवर आल्यामुळे त्यात काही बदल होतो का पाहावे लागेल, परंतु भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आग्रही आहे.
भाजपने ऐंशीच्या दशकात ‘माधव’ फॉर्म्युला स्वीकारला होता. २०१४ मध्ये धनगर, माळी आणि वंजारी समाजाला एकत्र करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले होते. निवडणुकीत भाजपला त्याचा फायदाही झाला.
त्यातच भाजपने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन देऊन या समाजाला खेचण्यात यश मिळवले होते. त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे सातत्याने भाजपला टीकेला सामोरे जावे लागत आहे. रासप नेते महादेव जानकर यांना २०१४ मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात संधी देऊन या समाजाची चांगलीच सहानुभूती मिळवली होती.
पुन्हा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग
भाजपने माळी, धनगर आणि वंजारी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला, तरी मधल्या काळात भाजपमध्ये मराठा नेत्यांनी प्रवेश केला. त्यामुळे पक्षाचा चेहरा मराठा होतोय की काय, अशी शंका भाजपच्या नेतृत्वाला येऊ लागली. त्यामुळेच महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘माधव’ फॉर्म्युला राबविण्याचा प्रयत्न असल्याचे जाणवते.
भाजपची प्रतिमा बदलण्यासाठी भाजपचे नेते दिवंगत वसंतराव भागवत यांनी चांगलेच प्रयत्न केले. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, अण्णा डांगे, ना. स. फरांदे, महादेव शिवणकर यांच्यासारख्या नेत्यांच्या मदतीने त्यांनी सोशल इंजिनीरिंगचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. आज भाजपला मिळालेला जनाधार ही त्याचीच फलनिष्पत्ती असल्याचे मानले जाते.
शहर
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- "ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानीला लगाम: महाराष्ट्र सरकारचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; आता नियमांचे पालन अनिवार्य"
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
गुन्हा
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.



























Subscribe to my channel



