चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ

चंद्रपूर: तालुक्यातील साखरा शिवारात प्रेमविवाहानंतर अवघ्या तीन महिन्यांत एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (दि. २) विवाहितेचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणात मृत महिलेच्या वडिलांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पती महेश गुलाब कावळे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मयुरी हरिदास सुपारे (वय २६, रा. खेक, ता. समुद्रपूर, जि. वर्धा), असे मृत महिलेचे नाव आहे.

वरोरा तालुक्यातील साखरा येथील महेश गुलाब कावळे याच्याशी मयुरीचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून मयुरी गर्भवती झाल्यानंतर मे महिन्यात दोघांनी प्रेमविवाह केल्याची माहिती मिळाली आहे.

विवाहानंतर तिचा जबरदस्तीने वरोरा तालुक्यातील शेगाव येथील एका खासगी डॉक्टरकडे अनधिकृत गर्भपात केल्याचा, तसेच सासरी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू असल्याचा आरोपही मयुरीच्या वडिलांनी केला आहे. महेश कावळे हा बुटीबोरी येथील एका खासगी कंपनीत कार्यरत असल्याने दोघे काह काळ तेथे वास्तव्यास होते.

त्यानंतर महेशने मयुरीला माहेरी सोडल्याचे तक्रारीत नमूद आहे. २ ऑगस्ट रोज महेशने मयुरीला साखरा येथे बोलावले. त्यानुसार तिचा भाऊ चेतन सुपारे याने सकाळी सुमारे ९:३० वाजत तिला साखरा येथे सोडले. त्यानंतर दुपारी ३ वाजता साखरा शेतशिवारातील झाडाला एका महिलेने गळफ घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. मृत महिलेच्या वडिलांनी मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

प्रेमविवाहानंतर वाद ?

मयुरी सुपारे आणि महेश कावळे यांचे प्रेमसंबंध होते. मयुरी गर्भवती झाल्यानंतर मे महिन्यात दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र, विवाहानंतर तिचा जबरदस्तीने अनधिकृत गर्भपात करण्यात आला आणि त्यानंतर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप मयुरीच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *