देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्सटेररिझम'' असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधानवारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहकबाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वमिळवण्यात आहे. उद्योजकता आणि नवसंशोधनालाचालना देण्यासाठी सरकारने स्टँड-अप इंडिया आणिस्टार्ट-अप इंडिया यांसारख्या योजना सुरू केल्या.त्यामुळे भारतीय संशोधकांना प्रोत्साहनही मिळाले. मात्रसरकारी करप्रणालीने अनेक नकारात्मक अडथळेनिर्माण केले. हे तीन उदाहरणांतून समजून घेता येईल. पहिले उदाहरण एंजेल फंडचे आहे. क्षमता असलेल्या स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांनी हा निधी दिला. परंतुआयकर विभागाने तो स्टार्टअप्सचे उत्पन्न मानून त्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली. परिणामी नवसंशोधनावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी छोट्या स्टार्टअप्सना आपले मर्यादित मनुष्यबळ कायदेशीर अडचणी सोडवण्यात खर्च करावे लागले. दुसरेउदाहरण आयआयटी संस्थांचे आहे. या संस्थांकडे संशोधनासाठी मर्यादित निधी असतो. मात्र कालांतराने उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र इंडस्ट्री फंड उभारले. या संशोधनाचे निष्कर्ष त्वरित प्रत्यक्षातहीउतरवले जात होते. कारण समस्येची ओळख आणिगरज यांचे मूल्यांकन आधीच झालेले असे. मात्र, एकेदिवशी या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनाही जीएसटीच्यानोटिसा मिळाल्या. उद्योगांकडून वित्तपुरवठा होणाऱ्यासंशोधनाला सेवा श्रेणीत समाविष्ट करण्यात आले. यादोन्ही प्रकरणांमुळे संशोधनाची संपूर्ण प्रक्रिया जवळपासदोन वर्षे विस्कळीत झाली. अखेर सरकारने हे प्रावधानमागे घेतल्यानंतरच परिस्थिती पूर्ववत झाली. दुसरे उदाहरण ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे आहे. 2023मध्ये ‘गेम ऑफ स्किल'' ( विविध न्यायालयीननिर्णयांमध्ये तसे वर्गीकृत करण्यात आले आहे) यावरीलजीएसटी 18 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला. हीकरवाढ पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात आली. म्हणजेचवाढीव कर 2017 पासून लागू करण्यात आला. यानिर्णयामुळे गेमिंग क्षेत्रातील नवसंशोधन जवळपास ठप्पझाले. नवसंशोधन केवळ डीआरडीओसारख्या मोठ्यासंस्थांमध्येच होत नाही. ते लहान स्टार्टअप्स व त्यांच्यानवकल्पनांच्या एकत्रित प्रयत्नांचेही फलित असते. याअडथळ्यांमुळे भारताने आपली आघाडी गमावली.भारताला नवसंशोधनाचे केंद्र बनायचे असेल आणितंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबन वाढवायचे असेल, तरनव्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानांकडे महसूलवसुलीच्या दृष्टीकोनातून न पाहणे आवश्यक नाही का?देशात औद्योगिकीकरणाला चालना दिली जात होती.तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी दीर्घकालीन धोरणेआखली होती. तसेच करसवलतीही दिल्या होत्या. आतापुन्हा एकदा या विषयाकडे व्यापक दृष्टीने पाहण्याचीवेळ आलेली नाही का? गुंतवणूक आकर्षितकरण्यासाठी दीर्घकालीन, स्थिर, विश्वासार्ह वसमन्वयित धोरणात्मक चौकट तयार करण्याची गरजआहे. त्यामुळे स्थिर धोरणे असलेल्या देशांकडेवळणाऱ्या स्टार्टअप्सनाही विश्वास मिळू शकेल.अन्यथा भारताची प्रतिमा केवळ परदेशात होणारेनवसंशोधन स्वीकारणाऱ्या देशाची बनेल. आज प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्याकरांबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज आहे.विशेषतः आरोग्य आणि शिक्षण उपकरासारखे अतिरिक्तकर आकारले जात असताना ही गरज अधिकमहत्त्वाची ठरते. आयकरावरही उपकर आकारलेजातात. या माध्यमातून सातत्याने निधी जमा होतअसेल, तर देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणिआरोग्यसेवा उपलब्ध होत आहेत, याची खात्री करणेआवश्यक आहे. त्याचे सामाजिक लेखापरीक्षणही झालेपाहिजे. भारताकडे प्रचंड क्षमता आहे. ज्ञान आणिप्रतिभेची कमतरता नाही. मात्र, संशोधन आणिनवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापकदृष्टीकोनाचा अभाव हीच सर्वात मोठी अडचण आहे.भारताला जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्था बनायचेअसेल, तर अडथळेमुक्त संशोधन आणिनवसंशोधनाला प्रोत्साहन देण्याशिवाय दुसरा शॉर्टकटनाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) नवसंशोधन केवळ मोठ्या संस्थांमध्येहोत नाही तर लहान स्टार्टअप्स आणित्यांच्या नवकल्पनांच्या एकत्रितप्रयत्नांतूनही ते घडते. भारताला तंत्रज्ञानक्षेत्रात आघाडी घ्यायची असेल तरनव्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानांनाकरसवलती आणि करातील दिलासा देणेआवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




