पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ज्ञान, कर्म, उपासना समजून घ्या; फसवणुकीपासून सावध राहा

आजच्या 'लक्झरी मार्केट'मध्ये ब्रँडेड वस्तूंमध्येही सुमारे 8% माल बनावट असल्याचे सांगितले जाते, मग सामान्य वस्तूंची तर बातच सोडा. खाण्यापिण्याच्या वस्तू बनावट, एकाच्या नावावर दुसराच परीक्षा देतोय, आता तर 'एआय'मुळे असली-नकलीतील फरक ओळखणेही कठीण झाले आहे. शास्त्र-पुराणांमध्ये ही असे अनेक प्रसंग येतात. रावण नकली साधू बनून सीतेचे अपहरण करून गेला. भगवान विष्णूंनीही काही प्रसंगांत असली-नकलीचा खेळ खेळला. देवांचे गुरू ब्रह्माजी तर चक्क दैत्यांचे गुरू शुक्राचार्यांचे फसवे रूप घेऊन गेले. शूर्पणखेच्या प्रसंगावरूनही आपण हे समजू शकतो की, जीवनात जेव्हा असली-नकलीचा सामना होईल, तेव्हा ज्ञान, कर्म आणि उपासनेचा मार्ग समजून घेऊन त्याचा मुकाबला केला पाहिजे. शूर्पणखा जशी होती तशी न येता मायावी रूप धारण करून आली होती. तिच्यासमोर होते राम, लक्ष्मण आणि सीता. अखेर शूर्पणखेचे नाक कापले गेले. राम हे ज्ञान आहेत, लक्ष्मण कर्म आणि सीता उपासना आहेत. हे तिन्ही मार्ग योग्य असतील, तर आपण नकली गोष्टींना बळी पडणार नाही व खऱ्या गोष्टींचा योग्य वापर करू शकू.

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *