सामूहिक पक्षांतरांच्या या काळात अनेक प्रश्न पुढे येतात.पक्ष का फुटतात? नेते पक्ष का बदलतात? विचारसरणी,तत्त्वनिष्ठा व पक्षनिष्ठेला अजूनही काही महत्त्व उरलेआहे का? तसेच काही पक्षात सतत फूट पडूनही काहीपक्ष मात्र एकसंध कसे राहतात? अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर राजकीयहालचाली घडल्या. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलकाँग्रेसमधील अंतर्गत बंड मोठी घटना ठरली, तर उद्धवठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा फूट पडली. झारखंडमध्ये‘इंडिया’ आघाडीतील काही आमदारांनी क्रॉस व्होटिंगकरून रालोआ समर्थित अपक्ष उमेदवार परिमलनाथवाणी यांना विजय मिळवून दिला. कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालीकाँग्रेसला रालोआतील काही आमदारांकडून क्रॉसव्होटिंगचा लाभ मिळाला. आम आदमी पक्षाचे सातसदस्य कमी झाले तर बिजू जनता दलातील तीन सदस्यएनडीएकडे गेले. यापूर्वी वायएसआर काँग्रेसमधील काहीसदस्यांनीही पक्ष सोडला होता. या सर्व घडामोडींमुळेरालोआ विशेषतः भाजपची संख्या वाढली. शिरोमणीअकाली दलातूनही मनप्रीत सिंह बादल व मनजिंदर सिंहसिरसा यांसारख्या नेत्यांनी बाहेर पडण्याचा मार्गस्वीकारला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस नेत्यांची यादी खूपमोठी आहे. त्यात मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्रीपदापर्यंतपोहोचलेल्या नेत्यांकडे पाहिले तर आसामचे हिमंत बिस्वासरमा, अरुणाचलचे पेमा खांडू आणि त्रिपुराचे माणिकसाहा हे सध्याचे मुख्यमंत्री काँग्रेसमधून आले आहेत. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचाही त्यात समावेश करता येईल. केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू, राव इंदरजित सिंह, जितीन प्रसाद आणि रवनीत सिंह बिट्टू यांचाही उल्लेख करता येईल. पैकी अनेक नेतेकाँग्रेसमधील प्रतिष्ठित राजकीय घराण्यांशी संबंधितआहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह, अशोक चव्हाण, एस. एम. कृष्णा, नारायण दत्त तिवारी, दिगंबर कामत, किरण कुमार रेड्डी, विजय बहुगुणा यांसारखे अनेक माजी मुख्यमंत्रीही भाजपमध्ये दाखल झाले. मात्र पेमा खांडू यांचा अपवाद वगळता बहुतेकांना अपेक्षित राजकीय लाभ मिळालेलानाही. आज विविध पक्षांतील नाराज नेत्यांना भाजप आकर्षित करतो, अशी धारणा निर्माण झाली आहे. त्यासोबतच‘साम, दाम, दंड, भेद’ या राजकीय तंत्राचाही वापर होत असल्याचे आरोप होतात. दोन-तृतीयांश सदस्यांना सोबत घेऊन स्वतंत्र गट तयार करणे आणि तोच मूळ पक्ष असल्याचा दावा करणे, ही रणनीती आता प्रभावीपणेवापरली जात असल्याचे दिसते. यातून आणखी एक प्रश्न निर्माण होतो की विरोधी पक्षांत फूट पाडण्याची पद्धत हीनवी आहे का? प्रत्यक्षात काँग्रेसनेही भूतकाळात अशा राजकीय डावपेचांचा वापर केला होता. एस. आर. बोम्मई प्रकरणातील 11 मार्च 1994 च्यासर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी काँग्रेसने कलम 356चा वापर करून अनेक विरोधी पक्षांची राज्य सरकारेबरखास्त केली होती. आज मात्र विस्तारासाठी थेटराजकीय ‘अधिग्रहण’ करण्याची पद्धत अधिक दिसूनयेते. अनेक पक्ष वारंवार फुटतात, पण काही पक्षांत अशीपरिस्थिती दिसत नाही. भाजप, समाजवादी पक्ष आणिडावे पक्ष ही त्याची उदाहरणे मानली जातात. डाव्या पक्षांतलेनिन-ट्रॉट्स्की किंवा मॉस्को-बीजिंग विचारांवरूनमतभेद झाले, तरी व्यापक डावी चळवळ एकत्र राहिली.आज हे पक्ष सत्तेबाहेर असून इतिहासातील कमकुवतटप्प्यावर आहेत, तरी त्यांच्यातील नेते मोठ्या प्रमाणावरइतर पक्षांकडे जाताना दिसत नाहीत. 2014 मध्ये काँग्रेसलोकसभेत केवळ 44 जागांवर आली, तर 1984 मध्येभाजप फक्त दोन जागांवर मर्यादित राहिला होता. तरीहीभाजपमध्ये मोठी फूट पडली नाही. भारतीय जनसंघापासूनच्या 75 वर्षांच्या इतिहासात 2014पूर्वी भाजप केवळ सहा वर्षे सत्तेत होता, तरी पक्षाचीसंघटनात्मक एकता कायम राहिली. त्यात एकउल्लेखनीय व अल्पकालीन पक्षांतराचे उदाहरणगुजरातचे शंकर सिंह वाघेला यांचे आहे. याउलट काँग्रेस अनेक वेळा विभाजनातून गेली.भाजपमध्ये काही उल्लेखनीय मतभेद झाले. बलराजमधोक यांनी आर्थिक धोरणांवर अटल बिहारी वाजपेयीआणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी तीव्र मतभेद व्यक्तकेले. ते जम्मूतील ‘स्वयंसेवक’ होते. त्यांच्याअध्यक्षतेखाली पक्षाने 1967 च्या निवडणुकीत 35 जागाजिंकल्या होत्या. ही तेव्हा सर्वांत मोठी संख्या होती. 1973 मध्ये त्यांना जनसंघात दुय्यम स्थान मिळाले आणित्यांनी नेतृत्वावर कठोर टीका केली. त्यानंतर ते नाराजझाले. मात्र त्यांनी कोणत्याही विरोधी पक्षात प्रवेश केलानाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, 1980 मध्ये तत्कालीनपंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिलीहोती, परंतु स्वयंसेवक म्हणून त्यांनी ती नाकारली, असेत्यांनीच एका मुलाखतीत ही बाब सांगितली होती. पुढे कल्याण सिंह, उमा भारती आणि बी. एस. येदियुरप्पायांनी बंडखोरी केली, पण अखेरीस ते पुन्हा भाजपमध्येपरतले. शंकरसिंह वाघेला काँग्रेसच्या पाठिंब्याने वर्षभरमुख्यमंत्री राहिले, नंतर त्यांनी स्वतःचा गट काँग्रेसमध्येविलीन केला, दोनदा खासदार झाले आणि 2004 मध्येकेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रीही बनले. आज हे 85 वर्षीय नेतेसक्रिय राजकारणापासून दूर आहेत. भाजपमध्ये असंतोषाची उदाहरणे दिसली तरी मोठ्याप्रमाणावर बंडाळी झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघव कार्यकर्त्यांमधील गुरु-शिष्य नात्याने त्यांच्या एकजूटदाखवून दिली. यात सत्ताही घरात उदयाला आलेल्यानेत्यांच्या हाती राहिली. त्यात वैचारिक शुद्धता राहिलीआहे. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
साम, दाम, दंड, भेद...विविध पक्षांमध्ये उपेक्षित ठरलेल्या अनेकनेत्यांसाठी भाजप आज चुंबकासारखाठरला आहे, असे म्हणता येईल. कारणराजकीय लाभ मिळण्याची शक्यता तिथेअधिक दिसते. त्यासाठी ‘साम, दाम, दंड,भेद’ ही नीती वापरली जाते. या प्रकारातकाँग्रेसचाही इतिहास राहिला आहे. कलम356 चा वापर करून विरोधी पक्षांचीसरकारे बरखास्त केल्याचे दिसून येते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




