बलराज संघई यांचा कॉलम:साधनेच्या प्रवासात मानसिक स्थिरता महत्त्वाची

मानवी मनाच्या दोन प्रकारांचे अधिक तर वर्णन आढळते : पारदर्शक मन आणि अपारदर्शक मन. मनाचे हे असे असणे माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्ती वर अवलंबून आहे. संवेदनेची पाच इंद्रिय आहेत Sense Organs. ती आपल्याला आहेत म्हणून आपणही पंचेंद्रिय जीव राशीमध्ये येतो.( विश्वामध्ये एक ते पाच असे संवेदन इंद्रिय असलेल्या जीव राशी आहेत) पण मनुष्याला सहावे विशिष्ट इंद्रिय आहे ते म्हणजे मन. म्हणून शास्त्रामध्ये मनुष्याचा समनस्क जीव असा उल्लेख येतो. जगातील असंख प्राणी जीव अमनस्क आहेत. त्यांना मन मिळालं नाही. मनुष्याला मन आहे म्हणून इष्ट अनिष्ट वर्तवणुकीची अपेक्षा आहे. हे सहावे इंद्रिय मन अदृश्य आहे, म्हणून त्याला अदृश्य म्हटलेले आहे. इतर इंद्रिय नाक, कान, डोळ्य सारखे ते शरीरावर दिसत नाही. मानसशास्त्रानुसार या मनाच्या उथळ आणि खोल अशा अवस्था असतात. कर्मशास्त्रानुसार पूर्व संचित कर्म आणि संस्काराप्रमाणे वृत्ती आणि प्रवृत्ती असतात. तात्विक व्याख्यान, प्रवचनातील एक उदाहरण आहे : एक ओला घडा/ (मातीचा माठ) आहे, एक कोरडा घडा आहे. हवा आली. हवेमधील धूळ दोन्ही घड्यांवर बसली. जो कोरडा घडा होता त्यावरील धूळ हवेच्या दुसऱ्या सहज झुळूकेसरशी निघून गेली. पण जो ओला घडा होता, त्यावरील धूळ तशीच राहिली. त्याला पाणी टाकून स्वच्छ धुवावी लागेल. म्हणजे परिश्रम मेहनत लागेल. पारदर्शक मनावर ही बाहेरील प्रवृत्ती, इतरांचे द्वारे कृत, कारीत अनुमोदित घटना, आणि पूर्व संचित कर्माची धूळ सहज निघून जाते. याउलट दुसरा प्रकार. ओल्या घड्यावर बसलेली धूळ मोठ्या परिश्रमाने काढावी लागेल. सांगण्याचा अर्थ असा की पारदर्शक मन असलेल्या जीवाला मुक्तीसाठी फार कठीण साधना करावी लागणार नाही, तर अपारदर्शक मन असलेल्या जीवाला मुक्ती अत्यंत सुदूर अशी असते व त्याला कठीण परिश्रम साधना करावी लागेल. मानवी मन हे संसार आणि मुक्ती दोन्ही अवस्थेचे कारणीभूत असते. म्हणून आपले मन कलुशीत नसावे. त्यावर राग,द्वेष ,लोभ, मोह, मान, अभिमान,अहंकार इत्यादी आत्मशत्रूंचा ताबा नसावा. स्वच्छ मोकळ्या मनाने जगात आपले कार्य करत जगल्यास नवीन कर्म बांधली जाणार नाहीत व जुन्या संचित धर्मांचा नाश करणे अधिक सुलभ होईल. कर्म बंधाचे आणि मूर्तीचे दोन्हीचे कारण मन आहे. मानवी जीवनाचा मुख्य उद्देश आत्ममुक्तीची वाट मनाच्या मार्गाने जाते. मन स्थिर असेल तर ही वाट सोपी. मन चंचल असल्यास कठीण. म्हणूनच चंचल मनास लगाम लावण्यासाठी व्रत,नियम, आचरण अशा अनेक क्रिया सांगितल्या जातात. शारीरिक चंचलता दूर झाल्यास मनाची एकाग्रता साधली जाते. आणि मग पुढे साधना पथ साधला जातो. म्हणूनच मानवी जीवन जगत असताना, अध्यात्मिक मार्गाचे क्रमण करत असताना, साधना पथावरील गतीचे नियमन मनाच्या स्थिरतेवर अवलंबून असते. मन स्थिर असल्यास पाच इंद्रिये काबूमध्ये अर्थातच आपल्या नियमनात, वश राहतात. आणि परिणाम स्वरूप आत्मिक उज्वला तिकडे साधनेचा प्रवास निरंतर होऊन शुद्ध आत्म अवस्था प्राप्त होण्यास मदत होते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *