येल्लम्मा या 2021 मध्ये बांधकामावर मजुरी करायच्या. प्रत्येक पावसाळ्यात बांधकामाची कामे मंदावतात. त्यामुळे त्यांना कामाचा शोध घेणे कठीण जायचे. अशा वेळी त्या भारती मेधी यांच्याशी संपर्क साधायच्या. पुणे येथील कर्वेनगरमध्ये मेधी यांची ‘मोदकघर’’’’ नावाची फॅक्टरी होती. तिथे एखादे काम मिळेल अशी त्यांना आशा असायची. त्या वेळी त्या छोट्याशा फॅक्टरीत रोज साधारण एक हजार मोदकच बनायचे. मेधी आणि त्यांच्या पतींनी 2009 मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. ते मोदक आणि इतर पारंपरिक पदार्थ बनवत असत. येल्लम्मा आणि इतर महिला कामाच्या शोधात तिथे पोहोचल्या. तेव्हा मेधी यांना एक गोष्ट लक्षात आली. त्यांना काम करणाऱ्या हातांची गरज होती आणि या महिलांना कामाची गरज होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्या छोट्याशा सुरुवातीनंतर ‘मोदकघर’’’’चा व्यवसाय विस्तारत गेला. आज तिथे दररोज 18 ते 20 हजार हातांनी बनवलेले उकडीचे मोदक तयार होतात. गेल्या वर्षीचे उत्पादन तब्बल 3 लाख मोदकांपर्यंत पोहोचले होते. यंदा तर पहिल्याच दिवशी 3.5 लाख मोदक बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांत एकूण 10 लाख मोदक बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. आता संपूर्ण पुण्यात ‘मोदकघर’’’’च्या पाच शाखा आहेत. दिल्ली, कोलकाता आणि त्याहूनही दूरच्या शहरांतून इथे ऑर्डर येतात. मेधी यांचा मुलगा आकाश आता या व्यवसायात उतरला आहे. तो डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन हा कौटुंबिक व्यवसाय पुढे नेत आहे. म्हणूनच मी लेखाच्या सुरुवातीला हा विचार मांडला होता- एका कुटुंबासाठी प्रसाद आहे, तो दुसऱ्या कुटुंबासाठी आठवड्याची मजुरी असू शकते. गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण उरलेला नाही. याचे महत्त्व त्याहून खूप मोठे आहे. हा उत्सव सामाजिक नातेसंबंध घट्ट करतो. लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून बाहेर काढून पुन्हा कुटुंबे, शेजारपाजार, गावे, बाजारपेठा, कला आणि सामाजिक कामांशी जोडतो. आज या सणाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे हा सण तरुणाईला एकत्र आणतो. तरुणांवर पारंपरिक सणांपासून दूर जाण्याची टीका होते, अशा वेळी हे घडत आहे. या काळात तुम्ही आसपास पाहिले तर एक चित्र दिसेल. तरुण मंडळी कामावरून सुट्टी घेतात. मंडपाच्या सजावटीसाठी उशिरापर्यंत जागतात. आपला मंडप सर्वांपेक्षा वेगळा दिसावा म्हणून पूर्ण वीकेंड त्यात घालवतात. ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गर्दीचे नियोजन करतात. विक्रेत्यांशी समन्वय साधतात. देणगी गोळा करतात. सोमवारपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या उत्सवासाठी एकत्र येऊन आपला मंडप सजवतात. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याचा आरोप केल्या जाणाऱ्या पिढीला गणेशोत्सव काहीतरी वेगळे देतो. बाहेर पडण्याचे कारण देतो. हातांनी काम करण्याची, लोकांना भेटण्याची, एकत्र मिळून काहीतरी घडवण्याची आणि स्वतःपेक्षा मोठ्या कार्याचा भाग होण्याची संधी देतो. आपले सण काही निराळे घडवतात. ती गोष्ट तंत्रज्ञानालाही शक्य नाही. हे सण लोकांना फोन बाजूला ठेवून माणसांशी नाती जोडण्यासाठी प्रेरित करतात. पण या उत्सवांची आणखी एक बाजू आहे. त्यावर आपण पुरेशी चर्चा करत नाही. ती म्हणजे यातून होणारी आर्थिक आणि सामाजिक देवाणघेवाण. बघा, गणेशोत्सव येतो तेव्हा नेमके काय होते? कोणीतरी मूर्ती खरेदी करतो. कोणीतरी ती बनवतो. चित्रकाराला काम मिळते. सजावट करणाऱ्याला ऑर्डर मिळते. फूल विक्रेता कमावतो. सुतार मंडप उभारतो. विजेच्या कामासाठी इलेक्ट्रिशियनला पैसे मिळतात. वाहतूकदाराला फेऱ्या मिळतात. मोदक बनवणाऱ्या महिलेला जास्त ऑर्डर मिळतात. एखाद्या रोजंदारी मजुराला कित्येक दिवसांचा रोजगार मिळतो. लहान दुकानदाराची विक्री वाढते. तरुणांना आयोजनाची संधी मिळते. एखादे कुटुंब स्वतःच्या गावी जाऊन तिथे पैसे खर्च करते. खर्च झालेला हा पैसा कुठे गायब होत नाही. तो एका हातातून दुसऱ्या हातात फिरत राहतो. कदाचित म्हणूनच भारताच्या पारंपरिक कॅलेंडरमध्ये वर्षभर एवढे सण असतात. आपल्या पूर्वजांनी एकत्र बसून एखाद्या आर्थिक धोरणासारखे हे सण आखले होते, असे आपण मानू नये. खरे तर त्यांनी संस्कृतीची निर्मिती केली. तिचे जतन केले आणि ती साजरी केली. यात वर्षभर वस्तूंची वाटणी, प्रवास, खरेदी, निर्मिती, खाणे-पिणे, देणे आणि भेटणे सतत चालत राहायचे. परिणामी एक अर्थव्यवस्था विकसित झाली. तेथे पैसा एका कुटुंबात, एका व्यवसायात किंवा एकाच्याच खिशात तुंबून न राहता, संपूर्ण समाजात खेळता राहिला. फंडा असा की - आपल्या परंपरेत प्रगतीला पुढे नेण्याची मोठी शक्ती आहे. म्हणूनच आज संपूर्ण देशात हाच एक जयघोष ऐकायला मिळतो - ‘आला रे आला, गणपती आला!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



