कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायलापाहून मला समाधान वाटले. कारण माझ्यासारखी तीहीआता ‘हेल्दी’ दिसते. बावन्नाव्या वर्षी पंचविशीतल्यामुलीसारखे दिसणे शक्य नाही, हे वास्तव आहे. पणबॉलिवूड हे स्वीकारायलाच तयार नाही. रिॲलिटी शोचेपरीक्षण करतात, पण वास्तव स्वीकारत नाहीत. थोडा विचार करा. या अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्यासाठीमी कॉलेज बंक केले होते. ती तीस वर्षांनंतरही तशीचदिसते. तिचा आहार काय असेल- उकडलेल्या भाज्या,सॅलडची पाने की फक्त हवा? माझ्या मनात एकच प्रश्नयेतो- चविष्ट अन्नापासून वंचित असलेली व्यक्तीखरोखर आनंदी असू शकते का? आता औषध कंपन्यांनी यावर उपाय शोधल्याचागाजावाजा सुरू केला आहे. औषध तयार झाले होतेमधुमेह असलेल्या लोकांसाठी. पण आता त्याचा वापर ‘डायमीटर’ची चिंता असलेले लोकही करू लागलेआहेत. ओझेम्पिक घ्या आणि स्वतःच जाणून घ्या. पणहो, कोणाला सांगू नका. अरे, मी तर खूप व्यायाम केला. नाश्त्यात चिया खाल्ले, दुपारी दुधी भोपळा. तुमच्या इच्छाशक्तीचे खरंच कौतुक करावे लागेल. औषधांचे दुष्परिणामही तुम्ही किती धैर्याने सहन करता. डोळे मिटूनमनात कल्पना करत असाल- चरबीखाली काय आहे,चरबीखाली… मी सांगते- हाडे. आज अनेक प्रसिद्धव्यक्ती कोमेजलेल्या झाडासारख्या दिसू लागल्या आहेत.शरीर सुकलेले, चेहरा कोरडा. गाल नाहीत, फक्त खळगेउरलेत. वजन नक्की कमी झाले आहे, पण त्याचबरोबरचेहऱ्याची चमकही हरवली आहे. अर्थात, ती त्यांचीवैयक्तिक निवड आहे. पण सामान्य लोक स्टार्सचेअनुकरण करतात, त्यामुळे माझा एकच सल्ला आहे-शॉर्टकट घेऊ नका. खरोखर वैद्यकीय कारणांसाठीऔषधांची गरज असेल, तरच ती घ्या. फक्त लग्न ठरलेआहे म्हणून पटकन दहा किलो वजन कमी करायचे,म्हणून सोपा मार्ग निवडू नका. अशा औषधांचा दीर्घकाळवापर केल्यावर काय परिणाम होईल, हे कुणालाही माहीतनाही. मग उगाच धोका का घ्यायचा? आपल्यालासगळ्यांनाच माहीत आहे की काय करायला हवे-पौष्टिक खा, जिमला जा. पण माझ्या मते वजनवाढण्यामागचे सर्वात मोठे कारण काही वेगळेच आहे.आपण जास्त खातो तरी का? कारण अन्नाने आपणफक्त पोटाची नव्हे, तर मनाचीही तृप्ती करत असतो. लहानपणापासून अन्नाला आपण आईच्या मायेबरोबरजोडले आहे. ‘बाळा, अजून एक घास खा, माझ्यासाठीखा.’ प्रत्येक टप्प्यावर आपण अन्नाला केवळ अन्नमानत नाही, तर भावनांशी जोडतो. कोणतेही नातेवाईकघरी आले की आपण म्हणतो- जेवूनच जा. त्यांच्याताटात एक पोळी जास्त वाढतो. यालाच आदरातिथ्यम्हणतात. लग्नात १२५ पदार्थ नसतील, तर ती लग्नाचीमेजवानीच कसली? जेवत-जेवत पोटावर नाड्याचाठसा पडला नाही, तर मेजवानीत काहीतरी कमी राहिलेअसे वाटते. सुख असो वा दु:ख, अन्नाशी आपले नातेकायम राहते. संयम ठेवायला हवा हे माहीत असूनही मनमानत नाही. सगळ्या समस्येचे मूळ तेच आहे. मी असेम्हणत नाही की केक, आइस्क्रीम किंवा समोसा कधीचखाऊ नका. फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा- मी उदासअसताना मला काहीतरी खावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरी गोड किंवाचटपटीत. जेणेकरून मन हलके होईल, दु:ख दडपलेजाईल. यालाच इमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासूनदूर पळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे. तुम्ही अन्नातप्रेम, आपलेपणा, समाधान शोधत असता; पण ते तुम्हालाफक्त अतिरिक्त कॅलरीज देऊ शकते. म्हणून पुढच्यावेळी अवेळी किंवा विनाकारण खाण्याची इच्छा झाली,तर दोन मिनिटे डोळे मिटा. स्वतःला विचारा- माझ्याआत नेमके काय सुरू आहे? पेन उचला आणि दहामिनिटे आपल्या भावना कागदावर उतरवा. रडू येतअसेल, तर अश्रू वाहू द्या. राग येत असेल, तर तोकागदावर उमटू द्या. लिहून झाल्यावर एक दीर्घ श्वासघ्या. ती वाईट भावना निघून गेली ना? पोटाची खरी भूकअसेल, तर जरूर खा. तुपाची पोळी खाण्याला घाबरूनका. हाडे दिसणाऱ्यांशी स्पर्धा करू नका. त्यांना हवामुबारक, तुम्ही मात्र खऱ्या अन्नाचा आनंद घ्या। (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) आपण उदास असतो, तेव्हा काहीतरीखावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरीगोड किंवा चटपटीत. जेणेकरून मनहलके होईल, दु:ख दडपले जाईल. यालाचइमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासून दूरपळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: विरारमध्ये मन हेलावून टाकणारी घटना; बाळावरून झालेल्या वादात सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून २८ वर्षीय सुनेचा मृत्यू
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
- पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढणार, चारही धरणांमध्ये ९५.२२ टक्के पाणीसाठा
महाराष्ट्र
- जळगाव: मुसळधार पावसाचा रेकॉर्ड! १५ पैकी १४ तालुक्यांत २०१५ नंतरची सर्वाधिक एकाच दिवसाची नोंद, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
- मुंबई: विरारमध्ये मन हेलावून टाकणारी घटना; बाळावरून झालेल्या वादात सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून २८ वर्षीय सुनेचा मृत्यू
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

























Subscribe to my channel




