रश्मी बन्सल यांचा कॉलम ‎‎‎:अन्न केवळ भोजन नव्हे‎ त्याला‎ आपण भावनांशी जोडलेय

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायला‎पाहून मला समाधान वाटले. कारण माझ्यासारखी तीही‎आता ‘हेल्दी’ दिसते. बावन्नाव्या वर्षी पंचविशीतल्या‎मुलीसारखे दिसणे शक्य नाही, हे वास्तव आहे. पण‎बॉलिवूड हे स्वीकारायलाच तयार नाही. रिॲलिटी शोचे‎परीक्षण करतात, पण वास्तव स्वीकारत नाहीत.‎ थोडा विचार करा. या अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्यासाठी‎मी कॉलेज बंक केले होते. ती तीस वर्षांनंतरही तशीच‎दिसते. तिचा आहार काय असेल- उकडलेल्या भाज्या,‎सॅलडची पाने की फक्त हवा? माझ्या मनात एकच प्रश्न‎येतो- चविष्ट अन्नापासून वंचित असलेली व्यक्ती‎खरोखर आनंदी असू शकते का?‎ आता औषध कंपन्यांनी यावर उपाय शोधल्याचा‎गाजावाजा सुरू केला आहे. औषध तयार झाले होते‎मधुमेह असलेल्या लोकांसाठी. पण आता त्याचा वापर ‎‎‘डायमीटर’ची चिंता असलेले लोकही करू लागले‎आहेत. ओझेम्पिक घ्या आणि स्वतःच जाणून घ्या. पण‎हो, कोणाला सांगू नका. अरे, मी तर खूप व्यायाम केला. ‎‎नाश्त्यात चिया खाल्ले, दुपारी दुधी भोपळा. तुमच्या ‎‎इच्छाशक्तीचे खरंच कौतुक करावे लागेल. औषधांचे ‎‎दुष्परिणामही तुम्ही किती धैर्याने सहन करता. डोळे मिटून‎मनात कल्पना करत असाल- चरबीखाली काय आहे,‎चरबीखाली… मी सांगते- हाडे. आज अनेक प्रसिद्ध‎व्यक्ती कोमेजलेल्या झाडासारख्या दिसू लागल्या आहेत.‎शरीर सुकलेले, चेहरा कोरडा. गाल नाहीत, फक्त खळगे‎उरलेत. वजन नक्की कमी झाले आहे, पण त्याचबरोबर‎चेहऱ्याची चमकही हरवली आहे. अर्थात, ती त्यांची‎वैयक्तिक निवड आहे. पण सामान्य लोक स्टार्सचे‎अनुकरण करतात, त्यामुळे माझा एकच सल्ला आहे-‎शॉर्टकट घेऊ नका. खरोखर वैद्यकीय कारणांसाठी‎औषधांची गरज असेल, तरच ती घ्या. फक्त लग्न ठरले‎आहे म्हणून पटकन दहा किलो वजन कमी करायचे,‎म्हणून सोपा मार्ग निवडू नका. अशा औषधांचा दीर्घकाळ‎वापर केल्यावर काय परिणाम होईल, हे कुणालाही माहीत‎नाही. मग उगाच धोका का घ्यायचा? आपल्याला‎सगळ्यांनाच माहीत आहे की काय करायला हवे-‎पौष्टिक खा, जिमला जा. पण माझ्या मते वजन‎वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण काही वेगळेच आहे.‎आपण जास्त खातो तरी का? कारण अन्नाने आपण‎फक्त पोटाची नव्हे, तर मनाचीही तृप्ती करत असतो.‎ लहानपणापासून अन्नाला आपण आईच्या मायेबरोबर‎जोडले आहे. ‘बाळा, अजून एक घास खा, माझ्यासाठी‎खा.’ प्रत्येक टप्प्यावर आपण अन्नाला केवळ अन्न‎मानत नाही, तर भावनांशी जोडतो. कोणतेही नातेवाईक‎घरी आले की आपण म्हणतो- जेवूनच जा. त्यांच्या‎ताटात एक पोळी जास्त वाढतो. यालाच आदरातिथ्य‎म्हणतात. लग्नात १२५ पदार्थ नसतील, तर ती लग्नाची‎मेजवानीच कसली? जेवत-जेवत पोटावर नाड्याचा‎ठसा पडला नाही, तर मेजवानीत काहीतरी कमी राहिले‎असे वाटते. सुख असो वा दु:ख, अन्नाशी आपले नाते‎कायम राहते. संयम ठेवायला हवा हे माहीत असूनही मन‎मानत नाही. सगळ्या समस्येचे मूळ तेच आहे. मी असे‎म्हणत नाही की केक, आइस्क्रीम किंवा समोसा कधीच‎खाऊ नका. फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा- मी उदास‎असताना मला काहीतरी खावेसे वाटते का? आणि तेही‎पोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरी गोड किंवा‎चटपटीत. जेणेकरून मन हलके होईल, दु:ख दडपले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जाईल. यालाच इमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासून‎दूर पळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे. तुम्ही अन्नात‎प्रेम, आपलेपणा, समाधान शोधत असता; पण ते तुम्हाला‎फक्त अतिरिक्त कॅलरीज देऊ शकते. म्हणून पुढच्या‎वेळी अवेळी किंवा विनाकारण खाण्याची इच्छा झाली,‎तर दोन मिनिटे डोळे मिटा. स्वतःला विचारा- माझ्या‎आत नेमके काय सुरू आहे? पेन उचला आणि दहा‎मिनिटे आपल्या भावना कागदावर उतरवा. रडू येत‎असेल, तर अश्रू वाहू द्या. राग येत असेल, तर तो‎कागदावर उमटू द्या. लिहून झाल्यावर एक दीर्घ श्वास‎घ्या. ती वाईट भावना निघून गेली ना? पोटाची खरी भूक‎असेल, तर जरूर खा. तुपाची पोळी खाण्याला घाबरू‎नका. हाडे दिसणाऱ्यांशी स्पर्धा करू नका. त्यांना हवा‎मुबारक, तुम्ही मात्र खऱ्या अन्नाचा आनंद घ्या।‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎ आपण उदास असतो, तेव्हा काहीतरी‎खावेसे वाटते का? आणि तेही‎पोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरी‎गोड किंवा चटपटीत. जेणेकरून मन‎हलके होईल, दु:ख दडपले जाईल. यालाच‎इमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासून दूर‎पळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे.‎‎

This post was originally published on this site.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *