कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायलापाहून मला समाधान वाटले. कारण माझ्यासारखी तीहीआता ‘हेल्दी’ दिसते. बावन्नाव्या वर्षी पंचविशीतल्यामुलीसारखे दिसणे शक्य नाही, हे वास्तव आहे. पणबॉलिवूड हे स्वीकारायलाच तयार नाही. रिॲलिटी शोचेपरीक्षण करतात, पण वास्तव स्वीकारत नाहीत. थोडा विचार करा. या अभिनेत्रीचा चित्रपट पाहण्यासाठीमी कॉलेज बंक केले होते. ती तीस वर्षांनंतरही तशीचदिसते. तिचा आहार काय असेल- उकडलेल्या भाज्या,सॅलडची पाने की फक्त हवा? माझ्या मनात एकच प्रश्नयेतो- चविष्ट अन्नापासून वंचित असलेली व्यक्तीखरोखर आनंदी असू शकते का? आता औषध कंपन्यांनी यावर उपाय शोधल्याचागाजावाजा सुरू केला आहे. औषध तयार झाले होतेमधुमेह असलेल्या लोकांसाठी. पण आता त्याचा वापर ‘डायमीटर’ची चिंता असलेले लोकही करू लागलेआहेत. ओझेम्पिक घ्या आणि स्वतःच जाणून घ्या. पणहो, कोणाला सांगू नका. अरे, मी तर खूप व्यायाम केला. नाश्त्यात चिया खाल्ले, दुपारी दुधी भोपळा. तुमच्या इच्छाशक्तीचे खरंच कौतुक करावे लागेल. औषधांचे दुष्परिणामही तुम्ही किती धैर्याने सहन करता. डोळे मिटूनमनात कल्पना करत असाल- चरबीखाली काय आहे,चरबीखाली… मी सांगते- हाडे. आज अनेक प्रसिद्धव्यक्ती कोमेजलेल्या झाडासारख्या दिसू लागल्या आहेत.शरीर सुकलेले, चेहरा कोरडा. गाल नाहीत, फक्त खळगेउरलेत. वजन नक्की कमी झाले आहे, पण त्याचबरोबरचेहऱ्याची चमकही हरवली आहे. अर्थात, ती त्यांचीवैयक्तिक निवड आहे. पण सामान्य लोक स्टार्सचेअनुकरण करतात, त्यामुळे माझा एकच सल्ला आहे-शॉर्टकट घेऊ नका. खरोखर वैद्यकीय कारणांसाठीऔषधांची गरज असेल, तरच ती घ्या. फक्त लग्न ठरलेआहे म्हणून पटकन दहा किलो वजन कमी करायचे,म्हणून सोपा मार्ग निवडू नका. अशा औषधांचा दीर्घकाळवापर केल्यावर काय परिणाम होईल, हे कुणालाही माहीतनाही. मग उगाच धोका का घ्यायचा? आपल्यालासगळ्यांनाच माहीत आहे की काय करायला हवे-पौष्टिक खा, जिमला जा. पण माझ्या मते वजनवाढण्यामागचे सर्वात मोठे कारण काही वेगळेच आहे.आपण जास्त खातो तरी का? कारण अन्नाने आपणफक्त पोटाची नव्हे, तर मनाचीही तृप्ती करत असतो. लहानपणापासून अन्नाला आपण आईच्या मायेबरोबरजोडले आहे. ‘बाळा, अजून एक घास खा, माझ्यासाठीखा.’ प्रत्येक टप्प्यावर आपण अन्नाला केवळ अन्नमानत नाही, तर भावनांशी जोडतो. कोणतेही नातेवाईकघरी आले की आपण म्हणतो- जेवूनच जा. त्यांच्याताटात एक पोळी जास्त वाढतो. यालाच आदरातिथ्यम्हणतात. लग्नात १२५ पदार्थ नसतील, तर ती लग्नाचीमेजवानीच कसली? जेवत-जेवत पोटावर नाड्याचाठसा पडला नाही, तर मेजवानीत काहीतरी कमी राहिलेअसे वाटते. सुख असो वा दु:ख, अन्नाशी आपले नातेकायम राहते. संयम ठेवायला हवा हे माहीत असूनही मनमानत नाही. सगळ्या समस्येचे मूळ तेच आहे. मी असेम्हणत नाही की केक, आइस्क्रीम किंवा समोसा कधीचखाऊ नका. फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा- मी उदासअसताना मला काहीतरी खावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरी गोड किंवाचटपटीत. जेणेकरून मन हलके होईल, दु:ख दडपलेजाईल. यालाच इमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासूनदूर पळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे. तुम्ही अन्नातप्रेम, आपलेपणा, समाधान शोधत असता; पण ते तुम्हालाफक्त अतिरिक्त कॅलरीज देऊ शकते. म्हणून पुढच्यावेळी अवेळी किंवा विनाकारण खाण्याची इच्छा झाली,तर दोन मिनिटे डोळे मिटा. स्वतःला विचारा- माझ्याआत नेमके काय सुरू आहे? पेन उचला आणि दहामिनिटे आपल्या भावना कागदावर उतरवा. रडू येतअसेल, तर अश्रू वाहू द्या. राग येत असेल, तर तोकागदावर उमटू द्या. लिहून झाल्यावर एक दीर्घ श्वासघ्या. ती वाईट भावना निघून गेली ना? पोटाची खरी भूकअसेल, तर जरूर खा. तुपाची पोळी खाण्याला घाबरूनका. हाडे दिसणाऱ्यांशी स्पर्धा करू नका. त्यांना हवामुबारक, तुम्ही मात्र खऱ्या अन्नाचा आनंद घ्या। (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) आपण उदास असतो, तेव्हा काहीतरीखावेसे वाटते का? आणि तेहीपोळी-भाजी, डाळ-भात नव्हे. काहीतरीगोड किंवा चटपटीत. जेणेकरून मनहलके होईल, दु:ख दडपले जाईल. यालाचइमोशनल ईटिंग म्हणतात. स्वतःपासून दूरपळण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा





























Subscribe to my channel



