अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!

मुंबई: कौटुंबिक वादावर सुनीता आहुजांचा खुलासा; कृष्णा-कश्मीरासोबतचा पॅचअप कसा झाला? ज्येष्ठ अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा आणि त्यांचा पुतण्या, प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, अलीकडेच एका टीव्ही शोच्या मंचावर या कुटुंबाचे पुनर्मिलन झाले आणि १४-१५ वर्षांपासून सुरू असलेल्या या वादाचा शेवट झाला. आता सुनीता आहुजा यांनी या भेटीमागचा भावनिक प्रवास उघड केला आहे.

काय घडले त्या दिवशी?

'लॉक अप' या शोमध्ये आपल्या सह-स्पर्धकांशी संवाद साधताना सुनीता यांनी हा प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, "मी जेव्हा 'लाफ्टर शेफ्स' (Laughter Chefs) शोच्या सेटवर गेले, तेव्हा तिथे कृष्णा आणि माझी भेट झाली आणि आमचा पॅचअप झाला. १४-१५ वर्षे मी त्याच्या मुलांकडे पाहिले नव्हते, जी आता नऊ वर्षांची झाली आहेत. मी त्याला लहानाचा मोठा केला होता, त्यामुळे या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप भावनिक होत्या."

कश्मीराची माफी आणि भावनिक क्षण:

सुनीता यांनी पुढे सांगितले की, ही भेट अत्यंत भावनिक होती. "कश्मीरा ही एक चांगली मुलगी आहे. ती तिथे आली आणि थेट माझ्या पायावर पडून रडू लागली. तिने मला माफी मागितली आणि 'माझ्याकडून चूक झाली' असे कबूल केले. तिला रडताना पाहून मीही स्वतःला रोखू शकले नाही आणि माझ्याही डोळ्यात पाणी आले. १४ वर्षांनंतर मी त्यांना भेटत होते."

वाद कसा सुरू झाला होता?

गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील दुरावा अनेक वर्षांचा होता. कश्मीरा शाह हिने केलेल्या एका ट्विटनंतर हा वाद अधिक चिघळला होता, ज्याचा रोख गोविंदा आणि सुनीता यांच्यावर असल्याचे मानले जात होते. त्यानंतर अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले होते. इतकेच नाही तर, कृष्णा ज्या शोमध्ये असेल त्या शोमध्ये सुनीता सहभागी होणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली होती. मात्र, आता हे सर्व मतभेद मागे सारून संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे.



महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *