उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला

उत्तर प्रदेश: उन्नावमध्ये रसमलाई खाण्यावरून असा वाद झाला की, प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. फ्रिजमध्ये ठेवलेली रसमलाई खाल्ल्याच्या रागातून धाकट्या भावाने आणि त्याच्या पत्नीने मोठ्या भावावर आणि वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. नातेवाईकांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


बांगरमऊ कोतवाली क्षेत्रातील एका शहरात ही घटना घडली आहे. शानू आणि त्यांची पत्नी साबरीन यांच्यावर त्यांचा धाकटा भाऊ नूर आणि त्याची पत्नी फातमा यांनी कात्रीने हल्ला केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साबरीन यांनी फ्रिजमध्ये ठेवलेली रसमलाई मुलांमध्ये वाटली आणि स्वतःही खाल्ली. याच गोष्टीवरून नूर आणि फातमा संतापले.

 


रसमलाईवरून सुरू झाला वाद
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साबरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बहिणीने फोन करून रसमलाई मुलांमध्ये वाटण्यास सांगितली होती. त्यानंतर त्यांनी फ्रिजमधून रसमलाई काढून मुलांमध्ये वाटली आणि स्वतःही खाल्ली. रसमलाई खाल्ल्याचे समजताच त्यांचा दीर नूर आणि फातमा संतापले आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली.


कात्रीने केला हल्ला
पाहता पाहता वाद इतका वाढला की नूर आणि फातमा यांनी शानू आणि साबरीन यांच्यावर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही रुग्णालयात नेले. घटनेनंतर पीडित कुटुंबाच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *