अलीकडे टॉक्सिक फॅन-कल्चर पुन्हा एकदा भीषणस्वरूपात समोर आले. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेडआणि विराट कोहली यांच्या हस्तांदोलनावरून निर्माणझालेला वाद हेडच्या पत्नी आणि कुटुंबापर्यंत पोहोचला.पुन्हा एकदा आपण मर्यादा तोडलेल्या पाहिल्या. मात्र, हेपहिल्यांदाच घडलेले नाही. प्रत्येक वेळी अशा घटनाघडतात. तेव्हा हे ट्रोल्स चाहतावर्गाच्या भावनेला कलंकलावताना आणि घृणास्पद कृत्य करताना दिसतात.कोणालाही कुणाच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा हक्कनाही. या विषयावर शून्य सहनशीलतेची भूमिकाआवश्यक आहे. मी स्वतः ही परिस्थिती अनुभवली आहे आणि आई, पत्नी किंवा मुलांना अपमानास्पद नावांनीहाक मारली जाणे किती वेदनादायक असते, हे मलामाहीत आहे. हाच तो टप्पा आहे. येथे सोशल मीडियागलित स्थितीत जातो. त्यावर तातडीने नियंत्रणआणण्याची गरज आहे. ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवरीलटॉक्सिक चाहत्यांच्या या फौजेलाही हे समजून घ्यावेलागेल की, एखाद्या व्यक्तीविषयी आंधळी निष्ठादाखवून ते मोठ्या उद्देशालाच हानी पोहोचवत आहेत. ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीवर अपमानास्पद टिप्पणी करून ते विराट कोहलीविषयी निष्ठा सिद्ध करत नाहीत. प्रत्यक्षातव्यक्ती-केंद्रित फॅन-संस्कृती दिवसेंदिवस अधिक क्रूरआणि विषारी बनत आहे. व्यक्तिपूजा ही भारतीयक्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक राहिलीआहे. अनेकदा असे वाटते की, आपल्या आवडत्याखेळाडूने धावा केल्या की चाहते समाधानी होतात, मगसंघ हरला तरी चालते. त्याच धर्तीवर मग असा विचारहोतो की, आपल्या आवडत्या खेळाडूसोबत वादघालण्याची हिंमत कुणी केलीच कशी? मग त्याच्याकुटुंबालाही यात ओढले जाते. तेंडुलकर आणि द्रविडयुग कोहली आणि रोहितपूर्वी होते. त्यांच्याही आधीगावस्कर आणि कपिल यांचा काळ होता. पण विराटआणि रोहित समर्थकांमधील टॉक्सिक फॅन-वॉर दिसतेतसे यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते. आणि यातसर्वात मोठे नुकसान भारतीय क्रिकेटचेच होत आहे. याघटनेनंतर ट्रॅव्हिस हेडच्या समर्थनाचा दावा करणारीबनावट खातीही समोर आली. त्यांचा वापर कोहलीआणि त्यांच्या कुटुंबियांना अपमानित करण्यासाठीकरण्यात आला. हेही तितकेच निषेधार्ह आहे. यात शंकानाही की, भारतीय ‘चाहत्यां’चाच एक गट यामागे आहे.त्यांच्यासाठी हा फक्त स्वतःचा द्वेष आणि कोहलीविरोधव्यक्त करण्याचा आणखी एक मार्ग आहे. परिणामी,वेगवेगळे चाहतागट एकमेकांशी भांडताना दिसत आहेतआणि त्यासाठी परस्परांना दोष देत आहेत. आता याट्रोल्सविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. हेकायमचे थांबवले पाहिजे. द्वेष पसरवणे हा नव्याभारताचा चेहरा बनत चालला आहे, पण आपण अशाभारताच्या बाजूने नाही. आपण त्यावर विश्वास ठेवतनाही आणि समाज म्हणून ते स्वीकारणारही नाही. हावाद केवळ सामन्यातील एका हस्तांदोलनाचा आहे.प्रत्येक खेळात कुणीतरी जिंकतो, कुणीतरी हरतो. त्याचाकुणाच्या कुटुंबाशी, पत्नीशी किंवा मुलीशी काही संबंधनाही. आणि जो कोणी ही मर्यादा ओलांडतो, तो भ्रमितआहे किंवा सभ्य समाजात राहण्यास योग्य नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता असे वाटूलागले आहे की, त्यांना काहीही बोलण्याचा आणित्यातून सुटून जाण्याचा अधिकार आहे. काळाच्याओघात सोशल मीडिया अनियंत्रित शिवीगाळीचे मैदानबनले आहे. एका पातळीवर ते अश्लील आणि घृणास्पदआहे, तर दुसऱ्या पातळीवर अत्यंत चिंताजनक आहे. हेलोकांच्या मनातील खोल अस्वस्थता आणि राग उघडकरते. आपण ही परिस्थिती खूप काळ चालू दिली आहेआणि सोशल मीडियावरील चर्चा आपण स्वतःला ज्याअवस्थेत अडकवले आहे, त्याचेच प्रतिबिंब बनलीआहे. खऱ्या चाहत्यांनी आता याविरोधात उभे राहिलेपाहिजे आणि हे थांबवले पाहिजे. चाहत्यांनी यापरिस्थितीची गंभीरता समजून घेत द्वेषप्रदर्शन थांबवणेअत्यंत आवश्यक आहे. अनेक जण म्हणतील की, हेआपल्या आयुष्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या सोशलमीडियाचे उपउत्पादन आहे. पण याविरोधात फारसेसंघटित आंदोलन कधीच झाले नाही. एखाद-दुसरेवक्तव्य या समस्येचे समाधान करू शकणार नाही.यासाठी सामूहिक कारवाई आवश्यक आहे, तेव्हाच हेट्रोल्स थांबतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनाही कायस्वीकारार्ह आहे आणि काय नाही, हे समजून घ्यावेलागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लोकांना आता काहीही बोलण्याचाआणि बोलून मोकळे होण्याचा हक्कअसल्यासारखे वाटू लागले आहे, हीअत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.कालांतराने सोशल मीडिया अनियंत्रितशिवीगाळीचे व्यासपीठ बनले आहे. हीचिंतेची बाब आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



