अलीकडे टॉक्सिक फॅन-कल्चर पुन्हा एकदा भीषणस्वरूपात समोर आले. आयपीएलमध्ये ट्रॅव्हिस हेडआणि विराट कोहली यांच्या हस्तांदोलनावरून निर्माणझालेला वाद हेडच्या पत्नी आणि कुटुंबापर्यंत पोहोचला.पुन्हा एकदा आपण मर्यादा तोडलेल्या पाहिल्या. मात्र, हेपहिल्यांदाच घडलेले नाही. प्रत्येक वेळी अशा घटनाघडतात. तेव्हा हे ट्रोल्स चाहतावर्गाच्या भावनेला कलंकलावताना आणि घृणास्पद कृत्य करताना दिसतात.कोणालाही कुणाच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याचा हक्कनाही. या विषयावर शून्य सहनशीलतेची भूमिकाआवश्यक आहे. मी स्वतः ही परिस्थिती अनुभवली आहे आणि आई, पत्नी किंवा मुलांना अपमानास्पद नावांनीहाक मारली जाणे किती वेदनादायक असते, हे मलामाहीत आहे. हाच तो टप्पा आहे. येथे सोशल मीडियागलित स्थितीत जातो. त्यावर तातडीने नियंत्रणआणण्याची गरज आहे. ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवरीलटॉक्सिक चाहत्यांच्या या फौजेलाही हे समजून घ्यावेलागेल की, एखाद्या व्यक्तीविषयी आंधळी निष्ठादाखवून ते मोठ्या उद्देशालाच हानी पोहोचवत आहेत. ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीवर अपमानास्पद टिप्पणी करून ते विराट कोहलीविषयी निष्ठा सिद्ध करत नाहीत. प्रत्यक्षातव्यक्ती-केंद्रित फॅन-संस्कृती दिवसेंदिवस अधिक क्रूरआणि विषारी बनत आहे. व्यक्तिपूजा ही भारतीयक्रीडाक्षेत्रातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक राहिलीआहे. अनेकदा असे वाटते की, आपल्या आवडत्याखेळाडूने धावा केल्या की चाहते समाधानी होतात, मगसंघ हरला तरी चालते. त्याच धर्तीवर मग असा विचारहोतो की, आपल्या आवडत्या खेळाडूसोबत वादघालण्याची हिंमत कुणी केलीच कशी? मग त्याच्याकुटुंबालाही यात ओढले जाते. तेंडुलकर आणि द्रविडयुग कोहली आणि रोहितपूर्वी होते. त्यांच्याही आधीगावस्कर आणि कपिल यांचा काळ होता. पण विराटआणि रोहित समर्थकांमधील टॉक्सिक फॅन-वॉर दिसतेतसे यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते. आणि यातसर्वात मोठे नुकसान भारतीय क्रिकेटचेच होत आहे. याघटनेनंतर ट्रॅव्हिस हेडच्या समर्थनाचा दावा करणारीबनावट खातीही समोर आली. त्यांचा वापर कोहलीआणि त्यांच्या कुटुंबियांना अपमानित करण्यासाठीकरण्यात आला. हेही तितकेच निषेधार्ह आहे. यात शंकानाही की, भारतीय ‘चाहत्यां’चाच एक गट यामागे आहे.त्यांच्यासाठी हा फक्त स्वतःचा द्वेष आणि कोहलीविरोधव्यक्त करण्याचा आणखी एक मार्ग आहे. परिणामी,वेगवेगळे चाहतागट एकमेकांशी भांडताना दिसत आहेतआणि त्यासाठी परस्परांना दोष देत आहेत. आता याट्रोल्सविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. हेकायमचे थांबवले पाहिजे. द्वेष पसरवणे हा नव्याभारताचा चेहरा बनत चालला आहे, पण आपण अशाभारताच्या बाजूने नाही. आपण त्यावर विश्वास ठेवतनाही आणि समाज म्हणून ते स्वीकारणारही नाही. हावाद केवळ सामन्यातील एका हस्तांदोलनाचा आहे.प्रत्येक खेळात कुणीतरी जिंकतो, कुणीतरी हरतो. त्याचाकुणाच्या कुटुंबाशी, पत्नीशी किंवा मुलीशी काही संबंधनाही. आणि जो कोणी ही मर्यादा ओलांडतो, तो भ्रमितआहे किंवा सभ्य समाजात राहण्यास योग्य नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता असे वाटूलागले आहे की, त्यांना काहीही बोलण्याचा आणित्यातून सुटून जाण्याचा अधिकार आहे. काळाच्याओघात सोशल मीडिया अनियंत्रित शिवीगाळीचे मैदानबनले आहे. एका पातळीवर ते अश्लील आणि घृणास्पदआहे, तर दुसऱ्या पातळीवर अत्यंत चिंताजनक आहे. हेलोकांच्या मनातील खोल अस्वस्थता आणि राग उघडकरते. आपण ही परिस्थिती खूप काळ चालू दिली आहेआणि सोशल मीडियावरील चर्चा आपण स्वतःला ज्याअवस्थेत अडकवले आहे, त्याचेच प्रतिबिंब बनलीआहे. खऱ्या चाहत्यांनी आता याविरोधात उभे राहिलेपाहिजे आणि हे थांबवले पाहिजे. चाहत्यांनी यापरिस्थितीची गंभीरता समजून घेत द्वेषप्रदर्शन थांबवणेअत्यंत आवश्यक आहे. अनेक जण म्हणतील की, हेआपल्या आयुष्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या सोशलमीडियाचे उपउत्पादन आहे. पण याविरोधात फारसेसंघटित आंदोलन कधीच झाले नाही. एखाद-दुसरेवक्तव्य या समस्येचे समाधान करू शकणार नाही.यासाठी सामूहिक कारवाई आवश्यक आहे, तेव्हाच हेट्रोल्स थांबतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनाही कायस्वीकारार्ह आहे आणि काय नाही, हे समजून घ्यावेलागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लोकांना आता काहीही बोलण्याचाआणि बोलून मोकळे होण्याचा हक्कअसल्यासारखे वाटू लागले आहे, हीअत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे.कालांतराने सोशल मीडिया अनियंत्रितशिवीगाळीचे व्यासपीठ बनले आहे. हीचिंतेची बाब आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- पुणे: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान खळबळ; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात
- नागपूर: भरचौकात मारहाण करून युवकांचे अपहरण; पोलिसांच्या 'सिनेस्टाइल ॲक्शन'मुळे आरोपींची पळापळ
महाराष्ट्र
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- पुणे: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान खळबळ; ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: सदाशिव पेठेत पोलिसांच्या भरधाव व्हॅनचा थरार; चार-पाच वाहनांना उडवले, विश्रामबाग पोलिसांकडून चालक ताब्यात
- नांदेड: सामाजिक वनीकरण विभागाचा अधिकारी श्रीनिवास लखमावाड बीडमध्ये ४५ लाखांची लाच घेताना जेरबंद
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये रस्ता खचला; सिंकहोलमध्ये कार कोसळली, चालक बचावला
भिवंडीत 'कोहिनूर' इमारत कोसळली; ८ ते १० जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर
घराच्या अंगणात भलामोठा अजगर; तेलंगणातील घटनेने परिसरात खळबळ
देश विदेश
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;


























Subscribe to my channel



