सह्याद्रीच्या सिंहगर्जतो शिवशंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात अभिमानाचं रक्त सळसळवण्याचा दिवस. आज आपला 'महाराष्ट्र दिन'! पण हा महाराष्ट्र नकाशावर सहज आलेला नाही. यामागे आहे रक्ताचं पाणी करणारा संघर्ष, १०६ हुतात्म्यांचं बलिदान आणि अखंड मराठी मनाची जिद्द. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत - *कसा घडला आपला महाराष्ट्र?*"
१. संघर्षाची ठिणगी:
"मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण आपला महाराष्ट्र तेव्हा 'बॉम्बे स्टेट'चा भाग होता. गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते. पण मराठी माणसाला हवी होती स्वतःची ओळख, स्वतःची भाषा असलेला 'संयुक्त महाराष्ट्र'! आणि याच मागणीतून उभी राहिली एक अभूतपूर्व चळवळ."
२. हुतात्म्यांचे बलिदान
"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही गर्जना आसमंतात घुमली. फ्लोरा फाऊंटनचा तो परिसर आजही त्या संघर्षाची साक्ष देतोय. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी १०६ आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या रक्ताने मुंबईचा रस्ता भिजला, पण त्यांनी मराठी माणसाची मान झुकू दिली नाही."
३. १ मे १९६० - मंगल कलशाचे आगमन:
"अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं! ३० एप्रिल १९६० च्या मध्यरात्री मुंबईतील राजभवनात एक ऐतिहासिक सोहळा झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 'मराठी राज्याचा मंगल कलश' स्वीकारला. आणि १ मे १९६० रोजी पहाटेच्या सूर्यकिरणांसोबत जगाच्या नकाशावर नवा 'महाराष्ट्र' उदयाला आला!"
"आज आपला महाराष्ट्र देशाचं इंजिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, जोतिराव फुलेंचा विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन आपला महाराष्ट्र आज तंत्रज्ञान, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात जगात अव्वल आहे. मुंबईची धावपळ असो, पुण्याची विद्यानगरी असो किंवा विदर्भ-मराठवाड्याची माती... महाराष्ट्राची ही संस्कृती जपणं हीच आपली जबाबदारी आहे."
"आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण त्या १०६ हुतात्म्यांना अभिवादन करूया आणि शपथ घेऊया की, आपल्या राज्याची अस्मिता आपण नेहमी जपून ठेवू.
तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
जाता जाता इतकंच म्हणेन...
'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा!'*
जय हिंद, जय महाराष्ट्र!"
शहर
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
महाराष्ट्र
- सातारा: कॉलेज हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीचे टोकाचे पाऊल, शिक्षुता वर्तुळात व महाविद्यालयात शोककळा!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
गुन्हा
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात



























Subscribe to my channel




