उल्हासनगर: उल्हासनगरच्या कैलास नगर परिसरात भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि नवे वळण समोर आले आहे. या गोळीबारात अनिल चौहान आणि अमन चौहान या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. या दुहेरी हत्येनंतर आता थेट स्थानिक पोलीस प्रशासनाच्याच भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या घरातील दोन तरुण मुलांचे प्राण गेले, असा खळबळजनक आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हप्तेखोरी आणि खंडणीला विरोध ठरला कारणीभूत
मृतकांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, सागर पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी महिनाभरापूर्वी परिसरात टेम्पो चालवण्यासाठी १० हजार रुपयांची बेकायदेशीर खंडणी (हप्ता) मागितली होती. केवळ खंडणी मागून हे गुंड थांबले नाहीत, तर त्यांनी खंडणी न दिल्याने या मुलांना बेदम मारहाण देखील केली होती. हप्तेखोरी व दादागिरीला विरोध केल्याचा राग मनात धरून या टोळीने चौहान कुटुंबीयांना लक्ष केले होते.
तक्रार करूनही पोलिसांनी केले दुर्लक्ष
या मारहाणीनंतर पीडित कुटुंबाने ३० एप्रिल रोजी स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी अर्ज आणि तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हाही नोंदवला होता. मात्र, गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे पूर्णपणे टाळले आणि त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. "पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून आरोपींना जेलमध्ये टाकले असते, तर ते बाहेर मोकाट फिरले नसते आणि आज आमच्या दोन्ही मुलांची हत्या झाली नसती," असा उद्विग्न आणि आक्रमक सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
१० ते १२ जणांच्या टोळीकडून १० राउंड फायर
पोलिसांनी दाखवलेल्या याच ढिसाळ कारभाराचा फायदा घेत, गुरुवारी सायंकाळी १० ते १२ जणांच्या टोळीने दुचाकीवरून येत कैलास कॉलनी चौकात अनिल आणि अमन यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आरोपींनी तब्बल १० राउंड फायर केले, ज्यामध्ये दोन्ही सख्ख्या भावांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता वातावरण प्रचंड तापले असून, स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) किंवा सीबीआय (CBI) मार्फत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मृतकांच्या कुटुंबाने केली आहे.
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- यवतमाळ: सहकार विभागाची कठोर कारवाई! लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना नोटिसा जारी, सहकार वर्तुळात खळबळ
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल

























Subscribe to my channel




https://shorturl.fm/efpaK