उल्हासनगर: उल्हासनगरच्या कैलास नगर परिसरात भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि नवे वळण समोर आले आहे. या गोळीबारात अनिल चौहान आणि अमन चौहान या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. या दुहेरी हत्येनंतर आता थेट स्थानिक पोलीस प्रशासनाच्याच भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या घरातील दोन तरुण मुलांचे प्राण गेले, असा खळबळजनक आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हप्तेखोरी आणि खंडणीला विरोध ठरला कारणीभूत
मृतकांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, सागर पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी महिनाभरापूर्वी परिसरात टेम्पो चालवण्यासाठी १० हजार रुपयांची बेकायदेशीर खंडणी (हप्ता) मागितली होती. केवळ खंडणी मागून हे गुंड थांबले नाहीत, तर त्यांनी खंडणी न दिल्याने या मुलांना बेदम मारहाण देखील केली होती. हप्तेखोरी व दादागिरीला विरोध केल्याचा राग मनात धरून या टोळीने चौहान कुटुंबीयांना लक्ष केले होते.
तक्रार करूनही पोलिसांनी केले दुर्लक्ष
या मारहाणीनंतर पीडित कुटुंबाने ३० एप्रिल रोजी स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी अर्ज आणि तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हाही नोंदवला होता. मात्र, गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे पूर्णपणे टाळले आणि त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. "पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून आरोपींना जेलमध्ये टाकले असते, तर ते बाहेर मोकाट फिरले नसते आणि आज आमच्या दोन्ही मुलांची हत्या झाली नसती," असा उद्विग्न आणि आक्रमक सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
१० ते १२ जणांच्या टोळीकडून १० राउंड फायर
पोलिसांनी दाखवलेल्या याच ढिसाळ कारभाराचा फायदा घेत, गुरुवारी सायंकाळी १० ते १२ जणांच्या टोळीने दुचाकीवरून येत कैलास कॉलनी चौकात अनिल आणि अमन यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आरोपींनी तब्बल १० राउंड फायर केले, ज्यामध्ये दोन्ही सख्ख्या भावांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता वातावरण प्रचंड तापले असून, स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) किंवा सीबीआय (CBI) मार्फत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मृतकांच्या कुटुंबाने केली आहे.
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel





https://shorturl.fm/efpaK