उल्हासनगर: उल्हासनगरच्या कैलास नगर परिसरात भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि नवे वळण समोर आले आहे. या गोळीबारात अनिल चौहान आणि अमन चौहान या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. या दुहेरी हत्येनंतर आता थेट स्थानिक पोलीस प्रशासनाच्याच भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या घरातील दोन तरुण मुलांचे प्राण गेले, असा खळबळजनक आरोप मृतकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हप्तेखोरी आणि खंडणीला विरोध ठरला कारणीभूत
मृतकांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, सागर पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी महिनाभरापूर्वी परिसरात टेम्पो चालवण्यासाठी १० हजार रुपयांची बेकायदेशीर खंडणी (हप्ता) मागितली होती. केवळ खंडणी मागून हे गुंड थांबले नाहीत, तर त्यांनी खंडणी न दिल्याने या मुलांना बेदम मारहाण देखील केली होती. हप्तेखोरी व दादागिरीला विरोध केल्याचा राग मनात धरून या टोळीने चौहान कुटुंबीयांना लक्ष केले होते.
तक्रार करूनही पोलिसांनी केले दुर्लक्ष
या मारहाणीनंतर पीडित कुटुंबाने ३० एप्रिल रोजी स्थानिक हिललाईन पोलीस ठाण्यात लेखी अर्ज आणि तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हाही नोंदवला होता. मात्र, गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे पूर्णपणे टाळले आणि त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. "पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलून आरोपींना जेलमध्ये टाकले असते, तर ते बाहेर मोकाट फिरले नसते आणि आज आमच्या दोन्ही मुलांची हत्या झाली नसती," असा उद्विग्न आणि आक्रमक सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
१० ते १२ जणांच्या टोळीकडून १० राउंड फायर
पोलिसांनी दाखवलेल्या याच ढिसाळ कारभाराचा फायदा घेत, गुरुवारी सायंकाळी १० ते १२ जणांच्या टोळीने दुचाकीवरून येत कैलास कॉलनी चौकात अनिल आणि अमन यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आरोपींनी तब्बल १० राउंड फायर केले, ज्यामध्ये दोन्ही सख्ख्या भावांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आता वातावरण प्रचंड तापले असून, स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) किंवा सीबीआय (CBI) मार्फत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी मृतकांच्या कुटुंबाने केली आहे.
शहर
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
महाराष्ट्र
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel





https://shorturl.fm/efpaK