पुणे: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव २०२६ चे यजमानपद एमकेएसएसएसच्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (KBJIIT), पुणे यांनी भूषविले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थिनींनी स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहन करण्यात आले.
एमकेएसएसएस कॅम्पस, कर्वेनगर, पुणे येथील इचलकरंजी सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी, “तुम्हीच तुमच्या जीवनाच्या आर्किटेक्ट आहात. तुमच्या आयुष्याची दिशा, ध्येय आणि भविष्यातील वाटचाल तुम्हीच ठरवायची आहे,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थिनींनी केवळ संधींची वाट न पाहता “तुमची जागा तुम्ही स्वतः निर्माण करा आणि जिथे काम कराल तिथे तुमच्या कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करा,” असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणासोबत कौशल्य, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्याचा संदर्भ देत प्रा. चक्रदेव यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ यांनी एकत्रितपणे कार्य करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि आत्मनिर्भर पिढी घडविणे ही दोन्ही संस्थांची सामायिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना साहित्य, ललित कला, संगीत, सांस्कृतिक तसेच विविध कला प्रकारांमध्ये आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, सर्जनशीलतेला आणि नेतृत्वगुणांना चालना मिळते, असे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी एमकेएसएसएसचे अध्यक्ष श्री. रवींद्र देव, उपाध्यक्ष डॉ. आनंद लेले, डॉ. नितीन एस. प्रभूतेंडोलकर, डॉ. अनघा वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक व कर्मचारी, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, परीक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पश्चिम महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये युवा महोत्सवाबद्दल उत्साहाचे वातावरण असून, दोन दिवस विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel


