
Pune : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील बंधारे तसेच पाझर तलावांवर अतिक्रमणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पर्यावरण विभागाकडे या जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली.
महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या ३२ गावांतील बंधारे, पाझर तलाव या नैसर्गिक स्रोतांवर अतिक्रमण होत आहे. या नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन केले जावे, असे पत्र जिल्हा परिषदेने महापालिकेला दिले होते. याची दखल महापालिकेने घेतली आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सामाविष्ट गावांतील बंधारे आणि पाझर तलावांच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी या विभागांकडे देण्यात आली.
|
|
महापालिकेत समावेश झालेल्या गावांना आवश्यक सोयी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने त्या देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी पाषाण, मॉडेल कॉलनी आणि कात्रज येथील तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या तलावांच्या कामाच्या खर्चाला पालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार तीनपैकी दोन तलावांची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, महापालिकेत समाविष्ट गावांतील २५ ते ३० पाझर तलाव तसेच बंधारेदेखील सुरक्षित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
समाविष्ट गावांतील बंधारे, ओढे, नाले तसेच तलावांची जागा ताब्यात घेण्यासाठी त्यावर अतिक्रमणे करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी जमिनीवर अथवा नैसर्गिक प्रवाह बंद करून तलावांच्या जागा ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा या जागा ताब्यात घेणे अवघड होते. हा प्रकार समाविष्ट गावांतील तलावांबाबत होऊ नये, यासाठी पालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी तलावांची हद्द ठरविण्यात येणार असून, या जागा महापालिका ताब्यात घेणार आहे. तलावांची जागा ताब्यात आल्यानंतर हे नैसर्गिक प्रवाह जिवंत ठेण्यात मदत होणार आहे. तसेच, या जागा अतिक्रमणमुक्त राखण्यास मदत होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वारीज यांनी सांगितले.
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील पाझर तलाव, बंधारे यांचे क्षेत्र महापालिकेने ताब्यात घ्यावे. तेथील अतिक्रमण दूर करावे, असे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महापालिकेला दिले आहे. याची जबाबदारी पाणीपुरवठा आणि पर्यावरण विभागाकडे देण्यात आली आहे.
पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
शहर
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
महाराष्ट्र
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




