
जळगाव : जळगावमधील राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या (ED) कारवाईमुळे आरएल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने छापेमारी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तब्बल 45 तास चौकशी करण्यात आली. तीन दिवसांच्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. यानंतर जळगाव येथील सोने व्यावसायिकांनी या कारवाई आक्षेप घेत ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. त्यांनी संपूर्ण देशभर लोकांच्या विश्वास कमावला आहे. त्यांनी काही गैर कृत्य केले असे वाटत नाही, त्यांच्यासोबत झालेली कारवाई दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया सराफ असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.
जळगावमधील जळगाव जिल्हा सुवर्ण असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी म्हटलं आहे की, आरएल गृपवर झालेली कारवाई कायद्याला धरुन असायला हवी. आरएल ग्रुपने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात बँकेने चार टक्के ऐवजी सोळा टक्के व्याज आकारणी केली आणि त्यातून हा वाद निर्माण झाला. या वादातून ईडी किंवा सीबीआयसारख्या यंत्रणा लावण्याऐवजी हा वाद आपसात सोडवायला पाहिजे होता. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या कारवाईमुळे आर एल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
![]() |
या घटनेत आरएल (R L Jwellers) ज्वेलर्सबाबत सीबीआय, इन्कम टॅक्स,ईडीसारख्या यंत्रणा वापरल्या गेल्या, हे व्हायला नको होते. त्यांच्या या कारवाईनंतर ज्वेलर्समधील सगळा माल घेऊन गेल्याने जळगाव सुवर्ण नगरीत एखाद्या दुकानातून संपूर्ण माल घेऊन जाणे ही कारवाई शंभर टक्के अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया स्वरूप लूंकड यांनी दिली आहे. व्यापारी म्हणून याकडे पाहिले की ईडीने केलेली कारवाईमध्ये संपूर्ण माल घेऊन जाणे. ज्या फर्मशी वाद आहे, ती फर्म सोडून दुसऱ्या फर्मचा माल जप्त करून घेऊन जाणे, त्यांचा व्यवसाय ठप्प करणे, हे दंडूकशाही आणि अन्यायकारक आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले अडीचशे कर्मचारी व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांचा जगण्याचा प्रश्न या कारवाईने निर्माण झाला आहे. यामध्ये कायदेशीररित्या यांची चूक असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया सराफ असोसिएशनचे विजय वर्मा यांनी दिली.
1.11 कोटी रुपयांची रक्कम जप्त
ईडीने केलेल्या कारवाईत राजमल लखीचंद ग्रुपच्या 60 मालमत्तेचा तपशील हाती लागला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जळगाव,नाशिक आणि ठाण्यात 13 ठिकाणी शोधमोहीम राबवली. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या तीन दिवसात मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि त्याचा साथीदारांच्या जवळपास 13 ठिकाणांची झडती घेतली. ईडीने गेल्या तीन दिवसांत टाकलेल्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय, ईडीला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला



























Subscribe to my channel




