
Pune : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी होत एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. पुण्यात महायुतीत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका महायुतीला अडचणीची ठरत आहे. ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.
भारतीय जनता पक्षाबरोबर मित्रपक्ष म्हणून महायुतीत समाविष्ट असतानाही ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या (रिपाइं) शहरातील पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नसल्याने ‘रिपाइं’च्या गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी अद्यापही कायम आहे. भाजपकडून सन्मान मिळत नसल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.
मित्रपक्ष असतानाही ‘रिपाइं’ला सन्मान मिळत नसल्याचा आरोप करून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घेतली आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्यापही ही नाराजी दूर झालेली नाही.
|
Pune : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…! |
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (आठवले गट) प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी यामध्ये पुढाकार घेऊन पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. आठवले यांनी फोनवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पदाधिकारी मतदान न करण्याच्या निर्धारावर ठाम असल्याने महायुतीसमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते आठवले हे केंद्रात मंत्री आहेत. भाजप नेत्यांकडे ते वारंवार रिपाइंला विधानसभा निवडणुकीत किमान १२ जागा द्याव्यात, असे म्हणत होते. पण भाजपने किंवा महायुतीमधील अन्य पक्षांनाही या मागणीकडे लक्ष दिले नाही. जागावाटपात आठवले यांना सामावून घेतले नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ घेतल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
भाजपला आंबेडकरी विचारांची मते चालतात. मात्र, त्यांना सत्तेत वाटा द्यायचा नाही, हे धोरण योग्य नाही. त्यामुळे महायुतीला मतदान करायचे नाही, हा निर्णय घेतला आहे. त्याला आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा पाठिंबा मिळाला.
शहर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
- भिवंडी दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणारा TDRF जवान खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात जागीच गतप्राण; ठाण्यातील घटनेने हळहळ
महाराष्ट्र
- लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी हंगाम ठरला अत्यंत फायदेशीर
- पुणे: केडगाव परिसरातील डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला; अडीच हजार किलो डाळिंब लांबवले, शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान
- पुणे: जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळल्याची थरारक घटना; धाडसी मुलाने जिवाची पर्वा न करता आईला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले
- पुणे: मुसळधार पाऊस आणि अभूतपूर्व उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासात नीरा नदीत पवित्र पादुकांचे स्नान संपन्न!
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त



























Subscribe to my channel




