
Pune : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारात सहभागी होत एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. पुण्यात महायुतीत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका महायुतीला अडचणीची ठरत आहे. ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.
भारतीय जनता पक्षाबरोबर मित्रपक्ष म्हणून महायुतीत समाविष्ट असतानाही ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’च्या (रिपाइं) शहरातील पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नसल्याने ‘रिपाइं’च्या गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी अद्यापही कायम आहे. भाजपकडून सन्मान मिळत नसल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.
मित्रपक्ष असतानाही ‘रिपाइं’ला सन्मान मिळत नसल्याचा आरोप करून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ या पदाधिकाऱ्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ घेतली आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महायुतीकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्यापही ही नाराजी दूर झालेली नाही.
|
Pune : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…! |
‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे (आठवले गट) प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी यामध्ये पुढाकार घेऊन पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. आठवले यांनी फोनवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतरही पदाधिकारी मतदान न करण्याच्या निर्धारावर ठाम असल्याने महायुतीसमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते आठवले हे केंद्रात मंत्री आहेत. भाजप नेत्यांकडे ते वारंवार रिपाइंला विधानसभा निवडणुकीत किमान १२ जागा द्याव्यात, असे म्हणत होते. पण भाजपने किंवा महायुतीमधील अन्य पक्षांनाही या मागणीकडे लक्ष दिले नाही. जागावाटपात आठवले यांना सामावून घेतले नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मतदान न करण्याची शपथ घेतल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
भाजपला आंबेडकरी विचारांची मते चालतात. मात्र, त्यांना सत्तेत वाटा द्यायचा नाही, हे धोरण योग्य नाही. त्यामुळे महायुतीला मतदान करायचे नाही, हा निर्णय घेतला आहे. त्याला आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा पाठिंबा मिळाला.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



