
Mumbai : अॅक्वा लाइनच्या ( Aqua Line ) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या फीडर बस सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही सेवा आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाइन 3 च्या प्रवाशांना लास्ट माइल कनेकटीव्हीटी मिळावी यासाठी ही बस सेवा सुरू केली होती. परंतु, अनेक महिने उलटूनही प्रवासी संख्येत वाढ झाली नसल्याने ही सेवा कमी करण्यात आली आहे.
CityFlo आणि नवकारकडून सेवा
मेट्रो मार्गिका 3 सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2025मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. मेट्रो लाइन 3च्या सात महत्त्वपूर्ण स्थानकांवरून ही सेवा सुरू केली होती. मेट्रोमधून बाहेर पडताच प्रवाशांना वाहतूक कोंडीशिवाय घरी पोहचवून त्यांचा प्रवास आरामदायी करणं या सेवेचं उद्दिष्ट होतं. यासाठी सिटीफ्लो आणि नवकार ट्रॅव्हल्स या खासगी कंपन्यांसोबत बस सेवा देण्यात आली. परंतु, अनेक स्थानकांवर गर्दीच्या वेळीही या बस मोकळ्याच राहत आहेत. त्यामुळे आता सात ऐवजी केवळ मुख्य तीन स्थानकांवर ही सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
नोव्हेंबर 2025पासून मुंबई मेट्रो 3च्या वांद्रे कुर्ला संकुल, वरळी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), विद्यानगरी, सिद्धिविनायक, कफ परेड आणि सीप्झ या सात स्थानकांवर या बस सेवा उपलब्ध होत्या. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान बस सेवा सुरू असायची. यावेळी ऑफिस व शाळा, महाविद्यालयात जाणारे प्रवासी सर्वाधिक संख्येत प्रवास करतात. यावेळी लोकलला गर्दी असून, मुंबईतील रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे मेट्रोमधून उतरून पुढच्या प्रवासात नागरिकांना गर्दी वर कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्या साठी फीडर बस सुरू केल्या. या बस दर 10 मिनिटांनी उपलब्ध होत्या. प्रवासी आसापासच्या व्यावसायिक केंद्र आणि कार्यालयांपर्यंत आरामात व वेळेत पोहचू शकतात.
प्रतिसाद का मिळाला नाही?
पण या फीडर बसला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता वांद्रे कुर्ला संकुल, सीएसएमटी व कफ परेड या तीन महत्त्वाच्या स्थानकांवरच ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय MMRCL ने घेतला आहे. या फीडर बसमध्ये एका फेरीसाठी 29 रुपये तिकिट असून मासिक पास 499 रुपये आहे. मेट्रोचे तिकिट काढल्यानंतर काही प्रवाशांना ही किंमत मोठी वाटू शकते. दरम्यान, या परिसरातील बरेच कामगार मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून लोकलने प्रवास करतात. अशा नागरिकांना लोकल, मेट्रो नंतर आणखी एका बस सेवेचे तिकिट काढणे शक्य होत नसावे असा अंदाज आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



