
Mumbai : अॅक्वा लाइनच्या ( Aqua Line ) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या फीडर बस सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही सेवा आता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाइन 3 च्या प्रवाशांना लास्ट माइल कनेकटीव्हीटी मिळावी यासाठी ही बस सेवा सुरू केली होती. परंतु, अनेक महिने उलटूनही प्रवासी संख्येत वाढ झाली नसल्याने ही सेवा कमी करण्यात आली आहे.
CityFlo आणि नवकारकडून सेवा
मेट्रो मार्गिका 3 सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2025मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती. मेट्रो लाइन 3च्या सात महत्त्वपूर्ण स्थानकांवरून ही सेवा सुरू केली होती. मेट्रोमधून बाहेर पडताच प्रवाशांना वाहतूक कोंडीशिवाय घरी पोहचवून त्यांचा प्रवास आरामदायी करणं या सेवेचं उद्दिष्ट होतं. यासाठी सिटीफ्लो आणि नवकार ट्रॅव्हल्स या खासगी कंपन्यांसोबत बस सेवा देण्यात आली. परंतु, अनेक स्थानकांवर गर्दीच्या वेळीही या बस मोकळ्याच राहत आहेत. त्यामुळे आता सात ऐवजी केवळ मुख्य तीन स्थानकांवर ही सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
नोव्हेंबर 2025पासून मुंबई मेट्रो 3च्या वांद्रे कुर्ला संकुल, वरळी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), विद्यानगरी, सिद्धिविनायक, कफ परेड आणि सीप्झ या सात स्थानकांवर या बस सेवा उपलब्ध होत्या. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान बस सेवा सुरू असायची. यावेळी ऑफिस व शाळा, महाविद्यालयात जाणारे प्रवासी सर्वाधिक संख्येत प्रवास करतात. यावेळी लोकलला गर्दी असून, मुंबईतील रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे मेट्रोमधून उतरून पुढच्या प्रवासात नागरिकांना गर्दी वर कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांच्या साठी फीडर बस सुरू केल्या. या बस दर 10 मिनिटांनी उपलब्ध होत्या. प्रवासी आसापासच्या व्यावसायिक केंद्र आणि कार्यालयांपर्यंत आरामात व वेळेत पोहचू शकतात.
प्रतिसाद का मिळाला नाही?
पण या फीडर बसला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता वांद्रे कुर्ला संकुल, सीएसएमटी व कफ परेड या तीन महत्त्वाच्या स्थानकांवरच ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय MMRCL ने घेतला आहे. या फीडर बसमध्ये एका फेरीसाठी 29 रुपये तिकिट असून मासिक पास 499 रुपये आहे. मेट्रोचे तिकिट काढल्यानंतर काही प्रवाशांना ही किंमत मोठी वाटू शकते. दरम्यान, या परिसरातील बरेच कामगार मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधून लोकलने प्रवास करतात. अशा नागरिकांना लोकल, मेट्रो नंतर आणखी एका बस सेवेचे तिकिट काढणे शक्य होत नसावे असा अंदाज आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



