
Imphal :मणिपूर गेल्या वर्षभरापासून प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहे. कुकी आणि मैतेई समाजातील रक्तरंजित संघर्षामुळं हे राज्य अद्यापही धुमसत आहे. याचाच परिणाम आता लोकसभा निवणुकीच्या प्रचारावरही दिसून आलं आहे.
एकीकडं देशभरात सर्व राजकीय पक्षांचा सार्वजनिक सभांचा धडाका सुरु असताना दुसरीकडं मणिपूरमध्ये फक्त इन कॅमेरा बैठका होत आहेत. सार्वजनिक सभांना अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.
उमेदवारांचे हे प्रमुख चेहरे
मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. यांपैकी एक अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघ तर दुसरा बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ हे आहेत. यांपैकी अंतर्गत मणिपूरमध्ये सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मैतेई समाजाचं प्राबल्य आहेत. सहा जणांमध्ये प्रमुख चेहऱ्यांपैकी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि माजी आयपीएस अधिकारी थोउनाओजम बसंता सिंह हे भाजपकडून तर जेएनयूचे प्राध्यापक बिमोल अकोईजोम हे नुकतेच राजकारणात दाखल झाले असून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर माहेश्वर थोनाऊजोम हे आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीचे तर आर के सोमेंद्र हे मणिपूर पिपल्स पार्टीचे उमेदवार आहेत. माहेश्वर आणि सोमेंद्र हे मणिपूरमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
|
|
जाहीर प्रचार नाहीच
दरम्यान, मणिपूरमधील सध्याच्या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या राज्यात प्रचारासाठी कुठल्याही सार्वजनिक सभा, पदयात्रा निघताना दिसत नाहीत. त्याचबरोबर राजकीय पक्षांची प्रचाराची पोस्टर्सही दिसत नाहीत. गर्दी करणाऱ्या या सर्व पारंपारिक प्रचाराच्या साधनांवर जणू अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.
पण उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इन कॅमेरा बैठकांचा आधार घेत आहेत. यामध्ये २० ते ५० जणांच्या गटाला घरातून किंवा पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या खासगी कार्यालयांमधून उमेदवारांशी चर्चा घडवून आणल्या जात आहेत. उमेदवारही विविध भागात कुलदैवतांची पूजा करून या इन कॅमेरा बैठकांना आपली उपस्थिती लावत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.
मोदी-शहांचा प्रचार नाहीच
भाजपकडून देशभरात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांच्या सभांचा धडाका लावला इथंही यांनी यापूर्वी अशा पद्धतीच्या सभा घेतल्या आहेत. पण सध्या असं काहीही इथं पहायला मिळणार नाही. त्याऐवजी आम्ही इन कॅमेरा बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहोत, इथं सध्या कोणीही राष्ट्रीय नेते नाहीत, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहेत.
यंदाची परिस्थिती विचित्र
पातसोई भागातील स्थानिक लोक यंदाच्या निवडणुकीबाबत सांगतात की, सर्वसाधारणपणे आम्हाला कधीही लोकसभा निवडणुकीवेळी अशा प्रकारची चिंता वाटली नाही. विधानसभा निवडणुकांच्यावेळी खरी मजा असते. पण यावेळी सर्वचजण या निवडणुकांबाबत दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. एकही उमेदवार आमच्या भागात अद्याप प्रचारासाठी आलेला नाही. इथली जनता केवळ स्थानिक मीडियाच नव्हे तर राष्ट्रीय मीडिया बारकाईनं लक्ष ठेवून आहे, यामध्ये विशेषतः सोशल मीडियावर लोकांचं अधिक लक्ष आहे.
रात्रीच्या सुरु होतात बैठका
मीरा पायबिस या मणिपूरमधील मैतेई समाजाच्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्या इम्फाळच्या चंगामाखा भागात नाईट गार्ड म्हणून काम करत आहेत. रात्री ९ वाजता त्यांची ड्युटी सुरु होते. याच वेळेत ते रात्री साडेनऊ दहा नंतर काँग्रेस उमेदवारासाठी काम करणाऱ्या काही महिला त्यांना येऊन भेटतात. त्यानंतर पुढचे तास दोन तास स्थानिक महिलांच्या भेटी घेत, त्यांच्या शेजाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. याद्वारे त्या आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असून याद्वारे आम्हाला आमच्या उमेदवाराबाबत अधिक चांगल्या प्रकारे माहिती देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली





























Subscribe to my channel




