
Imphal :मणिपूर गेल्या वर्षभरापासून प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहे. कुकी आणि मैतेई समाजातील रक्तरंजित संघर्षामुळं हे राज्य अद्यापही धुमसत आहे. याचाच परिणाम आता लोकसभा निवणुकीच्या प्रचारावरही दिसून आलं आहे.
एकीकडं देशभरात सर्व राजकीय पक्षांचा सार्वजनिक सभांचा धडाका सुरु असताना दुसरीकडं मणिपूरमध्ये फक्त इन कॅमेरा बैठका होत आहेत. सार्वजनिक सभांना अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.
उमेदवारांचे हे प्रमुख चेहरे
मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. यांपैकी एक अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघ तर दुसरा बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ हे आहेत. यांपैकी अंतर्गत मणिपूरमध्ये सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मैतेई समाजाचं प्राबल्य आहेत. सहा जणांमध्ये प्रमुख चेहऱ्यांपैकी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि माजी आयपीएस अधिकारी थोउनाओजम बसंता सिंह हे भाजपकडून तर जेएनयूचे प्राध्यापक बिमोल अकोईजोम हे नुकतेच राजकारणात दाखल झाले असून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर माहेश्वर थोनाऊजोम हे आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीचे तर आर के सोमेंद्र हे मणिपूर पिपल्स पार्टीचे उमेदवार आहेत. माहेश्वर आणि सोमेंद्र हे मणिपूरमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
|
|
जाहीर प्रचार नाहीच
दरम्यान, मणिपूरमधील सध्याच्या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या राज्यात प्रचारासाठी कुठल्याही सार्वजनिक सभा, पदयात्रा निघताना दिसत नाहीत. त्याचबरोबर राजकीय पक्षांची प्रचाराची पोस्टर्सही दिसत नाहीत. गर्दी करणाऱ्या या सर्व पारंपारिक प्रचाराच्या साधनांवर जणू अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.
पण उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इन कॅमेरा बैठकांचा आधार घेत आहेत. यामध्ये २० ते ५० जणांच्या गटाला घरातून किंवा पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या खासगी कार्यालयांमधून उमेदवारांशी चर्चा घडवून आणल्या जात आहेत. उमेदवारही विविध भागात कुलदैवतांची पूजा करून या इन कॅमेरा बैठकांना आपली उपस्थिती लावत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.
मोदी-शहांचा प्रचार नाहीच
भाजपकडून देशभरात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांच्या सभांचा धडाका लावला इथंही यांनी यापूर्वी अशा पद्धतीच्या सभा घेतल्या आहेत. पण सध्या असं काहीही इथं पहायला मिळणार नाही. त्याऐवजी आम्ही इन कॅमेरा बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहोत, इथं सध्या कोणीही राष्ट्रीय नेते नाहीत, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहेत.
यंदाची परिस्थिती विचित्र
पातसोई भागातील स्थानिक लोक यंदाच्या निवडणुकीबाबत सांगतात की, सर्वसाधारणपणे आम्हाला कधीही लोकसभा निवडणुकीवेळी अशा प्रकारची चिंता वाटली नाही. विधानसभा निवडणुकांच्यावेळी खरी मजा असते. पण यावेळी सर्वचजण या निवडणुकांबाबत दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. एकही उमेदवार आमच्या भागात अद्याप प्रचारासाठी आलेला नाही. इथली जनता केवळ स्थानिक मीडियाच नव्हे तर राष्ट्रीय मीडिया बारकाईनं लक्ष ठेवून आहे, यामध्ये विशेषतः सोशल मीडियावर लोकांचं अधिक लक्ष आहे.
रात्रीच्या सुरु होतात बैठका
मीरा पायबिस या मणिपूरमधील मैतेई समाजाच्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्या इम्फाळच्या चंगामाखा भागात नाईट गार्ड म्हणून काम करत आहेत. रात्री ९ वाजता त्यांची ड्युटी सुरु होते. याच वेळेत ते रात्री साडेनऊ दहा नंतर काँग्रेस उमेदवारासाठी काम करणाऱ्या काही महिला त्यांना येऊन भेटतात. त्यानंतर पुढचे तास दोन तास स्थानिक महिलांच्या भेटी घेत, त्यांच्या शेजाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. याद्वारे त्या आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असून याद्वारे आम्हाला आमच्या उमेदवाराबाबत अधिक चांगल्या प्रकारे माहिती देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



