
Imphal :मणिपूर गेल्या वर्षभरापासून प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहे. कुकी आणि मैतेई समाजातील रक्तरंजित संघर्षामुळं हे राज्य अद्यापही धुमसत आहे. याचाच परिणाम आता लोकसभा निवणुकीच्या प्रचारावरही दिसून आलं आहे.
एकीकडं देशभरात सर्व राजकीय पक्षांचा सार्वजनिक सभांचा धडाका सुरु असताना दुसरीकडं मणिपूरमध्ये फक्त इन कॅमेरा बैठका होत आहेत. सार्वजनिक सभांना अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.
उमेदवारांचे हे प्रमुख चेहरे
मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. यांपैकी एक अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघ तर दुसरा बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ हे आहेत. यांपैकी अंतर्गत मणिपूरमध्ये सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मैतेई समाजाचं प्राबल्य आहेत. सहा जणांमध्ये प्रमुख चेहऱ्यांपैकी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि माजी आयपीएस अधिकारी थोउनाओजम बसंता सिंह हे भाजपकडून तर जेएनयूचे प्राध्यापक बिमोल अकोईजोम हे नुकतेच राजकारणात दाखल झाले असून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. तर माहेश्वर थोनाऊजोम हे आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीचे तर आर के सोमेंद्र हे मणिपूर पिपल्स पार्टीचे उमेदवार आहेत. माहेश्वर आणि सोमेंद्र हे मणिपूरमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.
|
|
जाहीर प्रचार नाहीच
दरम्यान, मणिपूरमधील सध्याच्या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या राज्यात प्रचारासाठी कुठल्याही सार्वजनिक सभा, पदयात्रा निघताना दिसत नाहीत. त्याचबरोबर राजकीय पक्षांची प्रचाराची पोस्टर्सही दिसत नाहीत. गर्दी करणाऱ्या या सर्व पारंपारिक प्रचाराच्या साधनांवर जणू अघोषित बंदीच घालण्यात आली आहे.
पण उमेदवार हे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इन कॅमेरा बैठकांचा आधार घेत आहेत. यामध्ये २० ते ५० जणांच्या गटाला घरातून किंवा पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांच्या खासगी कार्यालयांमधून उमेदवारांशी चर्चा घडवून आणल्या जात आहेत. उमेदवारही विविध भागात कुलदैवतांची पूजा करून या इन कॅमेरा बैठकांना आपली उपस्थिती लावत आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.
मोदी-शहांचा प्रचार नाहीच
भाजपकडून देशभरात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांच्या सभांचा धडाका लावला इथंही यांनी यापूर्वी अशा पद्धतीच्या सभा घेतल्या आहेत. पण सध्या असं काहीही इथं पहायला मिळणार नाही. त्याऐवजी आम्ही इन कॅमेरा बैठका आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देत आहोत, इथं सध्या कोणीही राष्ट्रीय नेते नाहीत, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत आहेत.
यंदाची परिस्थिती विचित्र
पातसोई भागातील स्थानिक लोक यंदाच्या निवडणुकीबाबत सांगतात की, सर्वसाधारणपणे आम्हाला कधीही लोकसभा निवडणुकीवेळी अशा प्रकारची चिंता वाटली नाही. विधानसभा निवडणुकांच्यावेळी खरी मजा असते. पण यावेळी सर्वचजण या निवडणुकांबाबत दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. एकही उमेदवार आमच्या भागात अद्याप प्रचारासाठी आलेला नाही. इथली जनता केवळ स्थानिक मीडियाच नव्हे तर राष्ट्रीय मीडिया बारकाईनं लक्ष ठेवून आहे, यामध्ये विशेषतः सोशल मीडियावर लोकांचं अधिक लक्ष आहे.
रात्रीच्या सुरु होतात बैठका
मीरा पायबिस या मणिपूरमधील मैतेई समाजाच्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्या इम्फाळच्या चंगामाखा भागात नाईट गार्ड म्हणून काम करत आहेत. रात्री ९ वाजता त्यांची ड्युटी सुरु होते. याच वेळेत ते रात्री साडेनऊ दहा नंतर काँग्रेस उमेदवारासाठी काम करणाऱ्या काही महिला त्यांना येऊन भेटतात. त्यानंतर पुढचे तास दोन तास स्थानिक महिलांच्या भेटी घेत, त्यांच्या शेजाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. याद्वारे त्या आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असून याद्वारे आम्हाला आमच्या उमेदवाराबाबत अधिक चांगल्या प्रकारे माहिती देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



