छत्रपती संभाजीनगर / परभणी: संपूर्ण महाराष्ट्र सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईचा (Fuel Crisis) सामना करत आहे. विशेषतः मराठवाड्यात ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. एकीकडे सामान्य शेतकरी आणि नागरिक पंपांवर तासनतास रांगा लावून उभे आहेत, तर दुसरीकडे मात्र बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या वाळू माफियांच्या गाड्यांना इंधनाचा कोणताही तुटवडा भासत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
परभणीत डिझेलसाठी तुंबळ हाणामारी आणि रांगा
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेलचा साठा संपत आल्याने अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. ज्या मोजक्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. मान्सूनपूर्व शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल आवश्यक असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अशाच एका पंपावर डिझेल भरण्याच्या आणि रांगेत पुढे जाण्याच्या किरकोळ कारणावरून वाहनधारकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे थेट लाथाबुक्क्यांनी आणि रिकाम्या कॅनने मारामारी करण्यात झाले. या हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमधील संयम सुटत चालल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे.
वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या मात्र 'फुल्ल'
एकीकडे अन्नदाता शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसाठी अवघ्या काही लीटर डिझेल मिळावे म्हणून रात्र-रात्र पंपांवर मुक्कामी थांबला आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक वेगळेच आणि संतापजनक चित्र पाहायला मिळत आहे. वैजापूर परिसरातील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या शेकडो हायवा आणि ट्रकला डिझेलचा कोणताही तुटवडा जाणवत नाहीये. वाळू माफियांच्या गाड्या कोणत्याही रांगेत न उभे राहता रात्रीच्या अंधारात फुल्ल डिझेल भरून धावत आहेत.
प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना ड्रम किंवा बाटल्यांमध्ये डिझेल देण्यास प्रशासनाने कायद्याचा धाक दाखवत बंदी घातली आहे. मात्र, वाळू माफियांच्या बेकायदेशीर गाड्यांना आणि डंपरला खुलेआम हजारो लीटर डिझेल कसे उपलब्ध होत आहे? पेट्रोल पंप चालकांवर माफियांचा दबाव आहे की प्रशासनाचे या काळ्याबाजाराला मूक समर्थन आहे? असा संतप्त सवाल आता मराठवाड्यातील शेतकरी विचारत आहेत. या इंधन टंचाईमुळे ग्रामीण भागात ट्रॅक्टर बंद पडल्याने शेतकऱ्यांना पुन्हा जुन्या पद्धतीने बैलांच्या साहाय्याने नांगरणी करावी लागत आहे, ज्यामुळे वेळेचा आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे.
शहर
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- पुणे: रेल्वे यार्डात २ ऑगस्टला नऊ तासांचा ब्लॉक; ७ गाड्या रद्द, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल
महाराष्ट्र
- राज्य सरकारचा मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे छापील पेपर बंद, आता फक्त ई-पेपर व ऑनलाइन बातम्या!
- मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
- पुण्यात पावसाचा जोर वाढला! खडकवासला धरणातून २२,८८० क्युसेकने विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्ट
- हिंगोली: कळमनुरीत कयाधू नदीला महापूर; सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे ६ गावांचा संपर्क तुटला, शेकडो हेक्टरमधील पिके पाण्याखाली
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




