
Pune : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बारामती आणि राहुरी या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे गेल्यावर्षी निधन झाल्यामुळे राहुरी मतदारसंघाचीदेखील जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाकडून या दोन्ही विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी असे मत मांडले आहे. सर्वांनी एकमताने याबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली तर आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रणांगणात उतरु, असंदेखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता विरोधक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ. पण अद्याप तरी या संदर्भात कुठला प्रस्ताव सत्ताधारी पक्षांकडून आलेला नाही. याआधी अशा घटना घडल्या तेव्हा आम्ही अनेक ठिकाणी बिनविरोध विचार केला. पण त्यांनी उमेदवार उतरवले. नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी सरसकट बिनविरोध झाल्याचं यापूर्वी निर्णय झाल्याची मला माहिती नाही", अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. "अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. आताच निवडणूक जाहीर झाली आहे. आम्ही सर्वजण चर्चा करुन निर्णय घेऊ", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. "बारामतीचा विषयच नाही. मी आधीही बोलले आहे की, आमच्याकडून सुनेत्रा वहिणी यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. अर्थातच आम्ही पोटनिवडणूक लढणार नाहीत. महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कधीच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली.
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनीदेखील आपल्या पक्षाच्या भूमिका मांडली आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधीमंडळात जाणार आहेत. तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्षांसोबत त्यांची चर्चा होईल. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांचं काय? याचंही उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद न देणं यासारखा मोठा नक्षलवाद नाही", अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




