कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते ती भारत-पाकिस्तान सामन्याची. रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा बहुप्रतिक्षित सामना झाला. टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवून सुपर-8 मधील प्रवेश पक्का केला. सामन्याच्या या निकालाचं कोणालाच आश्चर्य वाटलं नसेल. पण पाकिस्तानी टीमने ज्या पद्धतीने शरणागती पत्करली ते थोडं चक्रावून टाकणारं होतं. भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आपल्या रेकॉर्ड मध्ये सुधारणा केली. या निकालानंतर अनेकांना असं वाटतय की, टीम इंडिया सहज दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावेल. पण या विजयामुळे टीम इंडियाकडून टी20 वर्ल्ड कप तर निसटणार नाही ना?.
वरचा मजकूर वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना?. टीम इंडिया इतकं जबरदस्त प्रदर्शन करतेय, मग तुम्ही अशा निकालाचा कसा काय विचार करु शकता?. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. पण अचानक एक असा योगायोग बनतोय, त्यामुळे चिंता थोडी वाढली आहे. त्याचं कारण पाकिस्तान विरुद्ध मिळालेला हा विजय आहे. हा योगायोग काय आहे? त्याचं पाकिस्तानशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या.
15 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये हा सामना 15 फेब्रुवारीला खेळला गेला. टीम इंडियाने सहजतेने हा सामना जिंकला. पण ही पहिली वेळ नव्हती, जेव्हा कुठल्या वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं असेल. याआधी वर्ल्ड कप 2015 मध्ये सुद्धा भारतीय टीमने 15 फेब्रुवारीलाच पाकिस्तानला हरवलं होतं.
22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या
इतकचं नाही, रविवारी देशभरात महाशिवरात्री साजरी झाली. टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून शिव भक्तांना आणि संपूर्ण देशाला या प्रसंगी सुंदर गिफ्ट दिलं. याने 22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. याआधी 2003 साली भारत-पाकिस्तान सामना महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यावेळी सुद्धा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला.
वर्ल्ड कप फायनलशी काय संबंध?
आता हा संयोग काय आहे ते समजून घ्या. टीम इंडियाचा 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियानेच वर्ल्ड कपच जेतेपद पटकावलं होतं. त्याआधी 2003 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाला हरवलं होतं. यावर्षी 15 फेब्रुवारी आणि महाशिवरात्री एकाचदिवशी होते. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फरकाने हरवलय. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड कपपासून वंचित रहावं लागणार का? की, सूर्यकुमार यादवची टीम इतिहास बदलणार? पुढच्या काही दिवसात या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
शहर
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
महाराष्ट्र
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
गुन्हा
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel


