कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते ती भारत-पाकिस्तान सामन्याची. रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा बहुप्रतिक्षित सामना झाला. टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवून सुपर-8 मधील प्रवेश पक्का केला. सामन्याच्या या निकालाचं कोणालाच आश्चर्य वाटलं नसेल. पण पाकिस्तानी टीमने ज्या पद्धतीने शरणागती पत्करली ते थोडं चक्रावून टाकणारं होतं. भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आपल्या रेकॉर्ड मध्ये सुधारणा केली. या निकालानंतर अनेकांना असं वाटतय की, टीम इंडिया सहज दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावेल. पण या विजयामुळे टीम इंडियाकडून टी20 वर्ल्ड कप तर निसटणार नाही ना?.
वरचा मजकूर वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना?. टीम इंडिया इतकं जबरदस्त प्रदर्शन करतेय, मग तुम्ही अशा निकालाचा कसा काय विचार करु शकता?. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. पण अचानक एक असा योगायोग बनतोय, त्यामुळे चिंता थोडी वाढली आहे. त्याचं कारण पाकिस्तान विरुद्ध मिळालेला हा विजय आहे. हा योगायोग काय आहे? त्याचं पाकिस्तानशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या.
15 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये हा सामना 15 फेब्रुवारीला खेळला गेला. टीम इंडियाने सहजतेने हा सामना जिंकला. पण ही पहिली वेळ नव्हती, जेव्हा कुठल्या वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं असेल. याआधी वर्ल्ड कप 2015 मध्ये सुद्धा भारतीय टीमने 15 फेब्रुवारीलाच पाकिस्तानला हरवलं होतं.
22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या
इतकचं नाही, रविवारी देशभरात महाशिवरात्री साजरी झाली. टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून शिव भक्तांना आणि संपूर्ण देशाला या प्रसंगी सुंदर गिफ्ट दिलं. याने 22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. याआधी 2003 साली भारत-पाकिस्तान सामना महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यावेळी सुद्धा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला.
वर्ल्ड कप फायनलशी काय संबंध?
आता हा संयोग काय आहे ते समजून घ्या. टीम इंडियाचा 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियानेच वर्ल्ड कपच जेतेपद पटकावलं होतं. त्याआधी 2003 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाला हरवलं होतं. यावर्षी 15 फेब्रुवारी आणि महाशिवरात्री एकाचदिवशी होते. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फरकाने हरवलय. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड कपपासून वंचित रहावं लागणार का? की, सूर्यकुमार यादवची टीम इतिहास बदलणार? पुढच्या काही दिवसात या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




