Mumbai : एशियाटिकची निवडणूक स्थगित; पात्र उमेदवारांची यादी तयार करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

Mumbai : आज, शनिवारी होणारी द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक अवघ्या १६ तासांवर असताना धर्मादाय आयुक्तांकडून निवडणूक स्थगित करण्याबाबत निर्णय आल्याचे एशियाटिकच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांना प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातून हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीनंतर संकेतस्थळावर याद्याही करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला होता. मात्र, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धर्मादाय आयुक्तांकडून काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांनी दिली. या निवडणुकीसाठी के. डी. तळोकर यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तळोकर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२७च्या कालावधीसाठी निवडले गेलेले द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेचे पदाधिकारी मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी आणि प्रा. सूरज पंडित दैनंदिन प्रशासकीय कारभार पाहतील. केतकर आणि गणपुले निवडणुकीला उभे असल्याने मतदारयाद्या तयार करण्याच्या कामात हे दोघेही सहभागी नसतील, असेही या निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तळोकर, भारदे, कुलकर्णी आणि प्रा. पंडित यांची उपसमिती २०२५च्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करतील, असेही सांगण्यात आले आहे.

धर्मादाय आयुक्तांनी या निर्देशांमध्ये काही मुद्दे नमूद केले आहेत. ६ ऑगस्ट २०२५ रोजी व्यवस्थापकीय समितीने दिलेला चेंज रिपोर्ट नाकारण्यात आला होता. अर्ज छाननी समितीची मुदत २७ सप्टेंबर २०२५ रोजी संपली होती. त्यामुळे या समितीने त्यानंतरचे अर्ज स्वीकारणे हे नियमांच्या विरोधात होते, असे सांगत या मुद्द्यांच्या आधारे या उपसमितीने मतदारयाद्या तयार कराव्यात, असे धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशात म्हटले आहे. यापूर्वीही नोव्हेंबरमध्ये धर्मादाय आयुक्तांनी याद्यांसंदर्भात निर्देश दिले होते.

'कायदेशीर मार्गाने जाणार'
'निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्यातील कलम ४१ अन्वये धर्मादाय आयुक्तांना त्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारा आदेश देता येत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी साहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा आदेश बेकायदा ठरवून रद्दबातल केला होता. आता पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आणि अक्षरशः आयुक्तांनी मतदानाचा दिवस (१४ मार्च) तोंडावर असताना १३ मार्च रोजी धर्मादाय आयुक्तांनी निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कायदेशीर तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याने याविषयी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन पुढचा कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत', असे यापूर्वी निवडणूकप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका करणारे विश्वास उटगी यांनी सांगितले.



हे पण वाचा-
हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated

शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

3 thoughts on “Mumbai : एशियाटिकची निवडणूक स्थगित; पात्र उमेदवारांची यादी तयार करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *