
Mumbai : गॅस सिलिंडरची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असल्याने शहर आणि उपनगरांतील सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यापूर्वी कधी सिलिंडर संपला तर शेजारधर्माचे पालन करून तो हक्काने दिला-घेतला जायचा. आता अनेक ठिकाणी त्यात 'ब्लॅक'चे व्यवहार सुरू झाले आहेत.
सिलिंडरच्या मूळ किंमतीपेक्षा दुप्पट पैसे दिले तर सिलिंडरची उपलब्धता करून देऊ असे स्पष्टपणे सांगितले जात आहे. ज्या कुटुंबामध्ये पाचपेक्षा अधिक सदस्य आहेत त्यांना सिलिंडरची उपलब्धता मिळताना विलंब होतो तर ज्या कुटुंबामध्ये तुलनेने कमी सदस्य आहेत त्यांना किमान २५ दिवसांनी सिलिंडर मिळण्याची खात्री वाटते. इतरांना ती शाश्वतीही नाही. त्यामुळे अचानक सिलिंडरची उपलब्धता संपली तर काय करायचे या प्रश्नाने मुंबईसह उपनगरांतील स्थानिक बेहाल झाले आहेत.
वाशीनाका येथे राहणाऱ्या स्मिता पवार यांच्या घरात सात सदस्य आहेत. त्यांना एक सिलिंडर किमान २५ दिवस जातो. किंमती वाढल्यापासून त्या सिलिंडर संपण्यापूर्वी एखादा आठवडा बुकिंग करतात. मात्र यावेळी त्यांनी २० दिवस आधीच बुकिंग केले असले तरीही सिलिंडर कधी येईल याची खात्री नाही. कॉलसेंटरला फोन केल्यानंतर तिथून कोणताही प्रतिसाद मिळत नाही तसेच बुकिंगही त्वरित होत नाही. फोन लगेच कट होतो, असे त्या सांगतात. ज्यांचे ऑनलाइन किंवा फोनवर बुकिंग होत नाही त्यांनी रिकामे सिलिंडर घेऊन गॅस सिलेंडरच्या नोंदणी केंद्रांकडे धाव घेतली आहे. तिथे गेल्यानंतर ऑनलाइन नोंदणी केली का, अशी विचारणा होत असल्याने या संभ्रमात भर पडली आहे.
तीस टक्के हॉटेल, उपाहारगृहे बंद
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईचा फटका आता मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसू लागला आहे. शहरातील जवळपास ३० टक्के हॉटेल आणि उपाहारगृहे बंद ठेवावी लागली असून अनेक ठिकाणी मर्यादित वेळ आणि कमी मेन्यूसह सेवा सुरू ठेवली जात आहे. तर छोट्या खाणावळींनी कोळशाचा पर्याय निवडत या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजीच्या सरासरी मासिक गरजेपैकी सुमारे २० टक्के गॅस उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे काहीसा दिलासा मिळण्याची आशा असली तरी हा गॅस प्रत्यक्षात बाजारात किती लवकर उपलब्ध होतो, याकडे व्यवसायिकांचे लक्ष लागले आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांनी सदस्यांना काही तात्पुरत्या उपाययोजना सुचवल्या आहेत. उपलब्ध गॅसचा काटकसरीने वापर करणे, जास्त गॅस लागणारे पदार्थ तात्पुरते मेन्यूमधून कमी करणे, शक्य असल्यास इंडक्शन कुकर किंवा विजेवर चालणारी उपकरणे वापरणे आणि गर्दीच्या वेळांवर लक्ष केंद्रित करून कामकाजाची वेळ ठरवणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घाबरून मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. अशा प्रकारची साठेबाजी केल्यास बाजारातील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




