
Mumbai : गॅस सिलिंडरची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असल्याने शहर आणि उपनगरांतील सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यापूर्वी कधी सिलिंडर संपला तर शेजारधर्माचे पालन करून तो हक्काने दिला-घेतला जायचा. आता अनेक ठिकाणी त्यात 'ब्लॅक'चे व्यवहार सुरू झाले आहेत.
सिलिंडरच्या मूळ किंमतीपेक्षा दुप्पट पैसे दिले तर सिलिंडरची उपलब्धता करून देऊ असे स्पष्टपणे सांगितले जात आहे. ज्या कुटुंबामध्ये पाचपेक्षा अधिक सदस्य आहेत त्यांना सिलिंडरची उपलब्धता मिळताना विलंब होतो तर ज्या कुटुंबामध्ये तुलनेने कमी सदस्य आहेत त्यांना किमान २५ दिवसांनी सिलिंडर मिळण्याची खात्री वाटते. इतरांना ती शाश्वतीही नाही. त्यामुळे अचानक सिलिंडरची उपलब्धता संपली तर काय करायचे या प्रश्नाने मुंबईसह उपनगरांतील स्थानिक बेहाल झाले आहेत.
वाशीनाका येथे राहणाऱ्या स्मिता पवार यांच्या घरात सात सदस्य आहेत. त्यांना एक सिलिंडर किमान २५ दिवस जातो. किंमती वाढल्यापासून त्या सिलिंडर संपण्यापूर्वी एखादा आठवडा बुकिंग करतात. मात्र यावेळी त्यांनी २० दिवस आधीच बुकिंग केले असले तरीही सिलिंडर कधी येईल याची खात्री नाही. कॉलसेंटरला फोन केल्यानंतर तिथून कोणताही प्रतिसाद मिळत नाही तसेच बुकिंगही त्वरित होत नाही. फोन लगेच कट होतो, असे त्या सांगतात. ज्यांचे ऑनलाइन किंवा फोनवर बुकिंग होत नाही त्यांनी रिकामे सिलिंडर घेऊन गॅस सिलेंडरच्या नोंदणी केंद्रांकडे धाव घेतली आहे. तिथे गेल्यानंतर ऑनलाइन नोंदणी केली का, अशी विचारणा होत असल्याने या संभ्रमात भर पडली आहे.
तीस टक्के हॉटेल, उपाहारगृहे बंद
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या टंचाईचा फटका आता मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसू लागला आहे. शहरातील जवळपास ३० टक्के हॉटेल आणि उपाहारगृहे बंद ठेवावी लागली असून अनेक ठिकाणी मर्यादित वेळ आणि कमी मेन्यूसह सेवा सुरू ठेवली जात आहे. तर छोट्या खाणावळींनी कोळशाचा पर्याय निवडत या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजीच्या सरासरी मासिक गरजेपैकी सुमारे २० टक्के गॅस उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे काहीसा दिलासा मिळण्याची आशा असली तरी हा गॅस प्रत्यक्षात बाजारात किती लवकर उपलब्ध होतो, याकडे व्यवसायिकांचे लक्ष लागले आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांनी सदस्यांना काही तात्पुरत्या उपाययोजना सुचवल्या आहेत. उपलब्ध गॅसचा काटकसरीने वापर करणे, जास्त गॅस लागणारे पदार्थ तात्पुरते मेन्यूमधून कमी करणे, शक्य असल्यास इंडक्शन कुकर किंवा विजेवर चालणारी उपकरणे वापरणे आणि गर्दीच्या वेळांवर लक्ष केंद्रित करून कामकाजाची वेळ ठरवणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घाबरून मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. अशा प्रकारची साठेबाजी केल्यास बाजारातील परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




