
बेळगाव : पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे कारण देत आलमट्टी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीनपासून धरणातून विसर्ग १ लाख २५ हजार क्युसेक करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्य पाटबंधारे खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २७) धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. सकाळी सहा वाजता जलाशयातून १ लाख २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी बारा वाजता विसर्ग १ लाख ५० हजार क्युसेक झाला. तर, सायंकाळी सहा वाजता विसर्ग तब्बल १ लाख ७५ हजार क्युसेक इतका केला होता; पण गुरुवारी सायंकाळपासून आलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणने आहे. त्यामुळेच धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटबंधारे खात्याने धरणाची क्षमता १२३.०१ टीएमसी इतकी आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा ८८.५०३ टीएमसी इतका होता. म्हणजे धरण ७१.०९ टक्के इतके भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दीड लाख क्युसेकपर्यंत झाल्यानंतर विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी होत होती. धरणातील पाण्याची आवक व विसर्ग यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याकडून वरिष्ठ अधिकारी आलमट्टीत नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून याबाबतची माहिती वारंवार महाराष्ट्र शासनाला दिली जात आहे.
दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे खात्याने गतवर्षीपासून समन्वय ठेवल्याने आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग नियमितपणे केला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल धरणाची पाण्याची पातळीही वाढली आहे. हिडकल धरणाची क्षमता ५१ टीएमसी आहे.
शुक्रवारी (ता. २८) धरणातील एकूण पाणीसाठा ३१.६५८ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा २९.६३८ टीएमसी इतका होता. पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी २८ जुलै रोजी हिडकल धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८२६ टीएमसी होता तर जिवंत पाणीसाठा ३४.८०६ टीएमसी इतका होता.
|
|
हिडकलमधून विसर्ग नाही’
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाण्याची आवक मात्र जास्त आहे. गतवर्षी २८ जुलैला धरणातील पाण्याची आवक ४,७१२ क्युसेक्स होती. यंदा मात्र तब्बल २९ हजार ४१५ क्युसेक्स आवक आहे. हिडकल अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे धरणातून अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



