
Devendra Fadanvis : अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम हटवण्याची मागणी केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पण ज्यावेळी मोदी हे स्वप्न पूर्ण करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांची भूमिका राज्य सभेत वेगळी, इतर ठिकाणी वेगळी होती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारी लोकं आहोत, ते असंभव होतं, ते मोदींनी संभव करुन दाखवलं त्यामुळे आपण येत्या काळाची वाट पाहावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला वैध ठरवलं. त्यानंतर या निर्णयावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान कोर्टाच्या निर्णयाने कोणलाही आता शंका येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
देशाच्या इतिहासात आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मोहर उमटवली. आज भारताचा आणि जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झाला. जम्मू काश्मीर एक विकासाचा आगार होण्याऐवजी दहशतवादी आगार झालं होतं पण 370 रद्द केल्यानंतर विकासाचा आगार होणार आहे. आज कोर्टाने मोहोर उमटवली त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाची मोहोर उमटवली असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
|
|
त्यांना या संबंधी बोलण्याची अधिकार नाही - देवेंद्र फडणवीस
कलम 370 चा मुद्दा देखील जेव्हा आला होता, तेव्हाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली होती. ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना विरोध केला त्यांच्याच विचारांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे त्यांना या संदर्भात काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय.
जो न्याय मलिकांना तोच इतरांना - देवेंद्र फडणवीस
मलिकांनी अजित पवारांसोबतची भूमिका जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. जोपर्यंत त्यांच्यवरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना सत्तेत सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. यावर बोलताना फडणवीसांनी म्हटलं की, जो न्याय मलिकांना दिलाय,त्यांच्यावर जे आरोप झालेत तसे इतर कोणावर झाले असते, तरी तोच न्याय केला असता.
विकास कामांना विरोध करणारे हीच उद्धव ठाकरेंची निती - देवेंद्र फडणवीस
धरावीचे टेंडर रद्द करण्याचे काम कोणी केले. विकास कामांना नेहमी विरोध करायची हीच उद्धव ठाकरेंची निती आहे. लोकांना घरं मिळू नये असं त्यांना वाटतं. उद्धव ठाकरे यांचा मूळ स्वभाव हा विरोध करणारा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



