
Sangli : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीच्या ऊरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे,तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तर याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवाराचे आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि इतर विरोधक एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत आहे.या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात उमेदवारांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शकील सय्यद आणि गीता बेलवलकर यांच्याकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचार सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार थांबवत,जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक शकील सय्यद यांनी केला.
|
Dhule : शिवसेना विरुद्ध भाजप; महायुतीत उफाळलेले अंतर्गत वाद, 4 पैकी 3 ठिकाणी युतीत गंभीर बिघाडी |
वादावादी व धमकीनंतर ईश्वरपूर मधील महायुतीतल्या नेत्यांनी एकत्र येत थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार खंडेराव जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.तर दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आरोप फेटाळून लावत,जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे आक्षेप घेतल्यावर हा प्रकार घडला. मात्र याला महायुतीकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. सदर प्रकरणी निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केल्याचं खंडेराव जाधव यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीचा प्रचारा दरम्यान घडलेल्या या वादाच्या प्रकारामुळे ऊरुण ईश्वरपुर मध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



