मी दोन अशा व्यक्तींना ओळखतो, एक -ज्यांनी या मार्चमध्ये एआयच्या मदतीने युरोप आणि अमेरिकेच्या संपूर्ण ट्रिपचे नियोजन केले. दुसरी -त्यांची मुलगी, जिने अलीकडेच 12 वीची परीक्षा दिली आणि एआयच्या मदतीनेच कॉलेज प्रवेशाची योजना आखली. साहजिकच वेगवेगळे पर्याय देण्याच्या बाबतीत हे तंत्रज्ञान कोणत्याही ट्रॅव्हल एजंट किंवा समुपदेशकापेक्षा अधिक वेगवान होते. इतक्या वेगाने व इतके जास्त पर्याय पाहून दोघेही इतके प्रभावित झाले की त्यांनी एआयच्या अंतिम सूचनांच्याच पालनाचा निर्णय घेतला. कोर्स आणि कॉलेजची निवड करून दोघेही ट्रिपवर निघाले आणि त्यांना पहिला धक्का तेव्हा बसला, जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर स्टेशनवर त्यांची ट्रेन चुकली. डब्ल्यूटीसी स्टेशन हे खरं तर एक ट्रान्सपोर्टेशन हब आहे, जिथून न्यूजर्सी आणि मॅसाच्युसेट्ससारख्या राज्यांसाठी थेट ट्रेन मिळतात. यांना पाथ ट्रेन म्हणतात. मुलीने तिची तिकिटे पुन्हा तपासली नसल्याने केवळ तिची ट्रेनच सुटली नाही तर तिचे कनेक्टिंग स्टेशनही वेगळे होते. एआय ट्रॅव्हल प्लॅनिंगबाबतच्या सर्वत्र सुरू असलेल्या चर्चेदरम्यान तिची इच्छा होती की, आपल्या संपूर्ण ट्रिपसाठी एआयव्यतिरिक्त इतर कुठेही संशोधन करू नये. तिची सर्वात मोठी चूक ही होती की, तिने हा प्रयोग अशा ठिकाणासाठी केला, जिथे ती आधी कधीही गेली नव्हती. ट्रेन सुटल्यानंतर जेव्हा तिने मला स्टेशनवरून फोन केला तेव्हा माझ्या लक्षात आले की ती चुकीच्या ठिकाणी उभी होती. याआधी तिने हॉटेलवरही पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण एआयने सांगितले होते की टॅक्सी महाग पडेल आणि हॉटेल फक्त ६०० मीटर अंतरावर आहे. पण एआयला हे माहीत नव्हते की त्या दिवशी मुसळधार पाऊस पडेल आणि भारतीय लोक केवळ दोन सुटकेस नाही, तर हँडबॅग आणि लॅपटॉपही सोबत ठेवतात. मुसळधार पावसात सामान घेऊन चालताना दोघेही पूर्णपणे भिजले, ज्यामुळे पुढचे दोन दिवस त्यांना ताप आला आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी वेळच मिळाला नाही. तेव्हा त्यांना जाणीव झाली की, मुलीच्या एआय-आधारित कॉलेज ॲडमिशन कौन्सिलरचा सल्लाही अमेरिकेत कॉलेज निवडताना चुकीचा ठरू शकतो. त्यानंतर त्यांनी पैसे खर्च करून मानवी सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तेव्हाच चांगले मार्गदर्शन मिळते, जेव्हा त्यात माणसाचा सहभाग असतो. कारण समुपदेशक बॉट्सची माहिती फिल्टर करून विद्यार्थ्यांना सल्ला देतात. विशेषतः जेव्हा त्यांना अर्ज भरण्यासाठी स्पष्टतेची गरज असते. शाळांमध्ये एआयच्या वापराचे समर्थक राहिलेले मॅसाच्युसेट्स स्कूल कौन्सिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अली रोबिडॉक्सही मानतात की, विद्यार्थ्यांवर समुपदेशकांचा जो प्रभाव असतो, तंत्रज्ञान त्याची बरोबरी करू शकत नाही. असे का, तर माणसाला माहीत असते की त्यांच्या खासगी आयुष्यातील बारकावे कसे समजून घ्यावेत. चॅटबॉट फक्त विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी पाहतो आणि त्यांना त्या देशातील अधिक स्पर्धात्मक कॉलेजांमध्ये अर्ज करण्यापासून परावृत्त करू शकतो. कुणाच्या घरी निधन झाले असल्यास चॅटबॉट्स अशा विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आकलन करू शकत नाहीत. एका समुपदेशकानुसार, ‘एआय तुम्हाला ओळखत नसल्याने ते तुम्हाला फक्त तेच सांगतात, जे पब्लिक डोमेन उपलब्ध आहे.’ चॅटबॉट्स बनवणाऱ्या कंपन्याही याच्याशी सहमत आहेत की, पदवीसाठी योग्य कॉलेज निवडण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोठ्यांचा सल्ला आवश्यक असतो. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी मदत करण्यासाठी एआयचा वापर करणाऱ्या ‘मेनस्टे’ प्लॅटफॉर्मचे संस्थापक अँड्य्रू मॅग्लियोज्जी म्हणतात की, ‘या प्रक्रियेत माणसांचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एआय अजूनही विकसित होत आहे.’ फंडा असा की, आपण वेग आणि विश्वासार्हता यामध्ये अडकून असा विचार करू लागतो की एआय आपल्यापेक्षा सरस आहे. सध्या एआय वापरण्याचा सर्वात योग्य मार्ग हाच की, त्याच्या वेगाचा फायदा घ्यावा आणि नंतर अनुभवी माणसांना सांगावे की त्यांनी या माहितीचे विश्लेषण आपल्या बुद्धीने करावे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



