परकीय चलन मिळवण्याच्या आणि रोजगार निर्माणकरण्याच्या सर्वात वेगवान मार्गांपैकी एक पर्यटन हादेखील आहे, तरीही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.अशा वेळी, जेव्हा जागतिक अनिश्चितता, ऊर्जेच्याकिमतींमधील अस्थिरता, पुरवठा साखळीतील व्यत्ययआणि भू-राजकीय धक्के चालू खात्यावर दबाव आणतआहेत, तेव्हा पर्यटन आपल्या अर्थव्यवस्थेसाठीस्टॅबलायझरचे काम करू शकते. परदेशी पर्यटक थेट आपल्या अर्थव्यवस्थेत डॉलरघेऊन येतात. ते हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, पर्यटन स्थळे,स्मृतिचिन्हे, सांस्कृतिक अनुभव आणि स्थानिकखाद्यपदार्थांवर पैसे खर्च करतात. यातील प्रत्येक क्षेत्रस्वतःच रोजगार निर्मितीचा एक शक्तिशाली स्रोत आहे.पर्यटनाशी जोडला गेलेला प्रत्येक प्रत्यक्ष रोजगार 13अप्रत्यक्ष रोजगारांनाही जन्म देतो. वेटर, शेफ, ड्रायव्हर,गाइड, कारागीर, होमस्टे संचालक, डिजिटल मार्केटरआणि हजारो छोटे स्थानिक उद्योग ही याची केवळ काहीउदाहरणे आहेत. जिथे मॅन्युफॅक्चरिंग-आधार ती थेटपरकीय गुंतवणूक- ज्याला दीर्घकालीन उपाय म्हणूनप्राधान्य दिले जाते- ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक वर्षेलागतात आणि लक्षणीय पातळीवर परकीय चलन निर्माणकरण्यासाठी त्याहूनही अधिक वेळ लागतो, तर दुसरीकडेपर्यटन हे एखाद्या पर्यटकाच्या निर्णयांचे काही महिन्यांतचडॉलरमध्ये रूपांतर करते. भारताच्या एव्हिएशन कंपन्यांनी 2000 हून अधिकनवीन विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यांचा पुरवठा येत्याकाही वर्षांत वेगाने वाढेल. वरवर पाहता ही एव्हिएशनक्षेत्राच्या महत्त्वाकांक्षेची कहाणी वाटते, परंतु जरत्याचवेळी ही विमाने परदेशी पर्यटकांनी भरण्याचे प्रयत्नकेले गेले नाहीत, तर त्याचे उलटे परिणामही मिळूशकतात: भारतीयांसाठी परदेश प्रवास अधिक सोपाआणि स्वस्त होईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मौल्यवान परकीय चलन देशाबाहेर जाईल. गेल्या 4 वर्षांत भारताच्या परदेशी पर्यटन मार्केटिंग बजेटमध्ये जवळपास शून्यापर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याचे परिणामही अपेक्षित आहेत. 2024 या वर्षात भारतात 99 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आले- जे महामारीच्या आधीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 10%कमी आहेत. जिथे भारताचे सर्व प्रमुख प्रतिस्पर्धी देश2019 ची पातळी ओलांडून पुढे गेले आहेत, तिथे आपण आजही त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतआहोत. त्यामुळे आपल्या परदेशी पर्यटन मार्केटिंगबजेटमध्ये केलेली मोठी कपात आश्चर्यकारक आहे. एक परदेशी पर्यटक आपल्या प्रत्येक दौऱ्यात भारताच्या जीडीपीमध्ये 3,000 डॉलरचे योगदान देतो, तर एकादेशांतर्गत पर्यटकाचे योगदान केवळ 75 डॉलर असते- म्हणजे यात 40 पटीचा फरक आहे. मार्केटिंगवर 20 कोटी डॉलरची गुंतवणूक 10 लाख अतिरिक्त परदेशी पर्यटकांना आकर्षित करेल, ज्यातून 3.6 अब्ज डॉलरचे आर्थिकमूल्य निर्माण होईल, 40 कोटी डॉलरची जीएसटी प्राप्तीहोईल आणि 2.83 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. म्हणजेच मार्केटिंगवर खर्च केलेल्या प्रत्येक डॉलरवर 18 पटींनी परतावा मिळेल. केवळ 55,000 अतिरिक्तपर्यटक- जे भारताच्या सध्याच्या टूरिस्ट-बेसच्या फक्त0.5% आहेत- संपूर्ण मार्केटिंग खर्चाची भरपाई करतील.हे कोणतेही अंदाज नाहीत. हे तेच परिणाम आहेत, जेइन्क्रेडिबल इंडिया मोहिमेने प्रत्यक्षरीत्या सिद्ध करूनदाखवले होते. जागतिक पर्यटनामध्ये डिजिटलटेक्नॉलॉजी मोठे बदल घडवून आणत आहे. आणि हेच तेक्षेत्र आहे, ज्यातील भारताची अनुपस्थिती आपल्यासाठीमहागडी ठरत आहे. आज पर्यटनाशी संबंधित एकूणविक्रीपैकी 78% विक्री ऑनलाइन होते, 70% बुकिंगमोबाइल उपकरणांवर पूर्ण केली जाते आणि 45%व्यवहार ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातूनहोतात. स्पर्धेचे मैदान आता यूट्यूब प्री-रोल्स, सोशलमीडिया अल्गोरिदम, प्रोग्रॅमॅटिक डिस्प्ले आणिइन्फ्लुएन्सर नेटवर्कवर स्थलांतरित झाले आहे. हे असेचॅनेल्स आहेत, जिथे खर्चाचे मोजमाप केले जाऊ शकते,टार्गेटिंग अचूक असते आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचाजवळपास रिअल-टाइममध्ये अंदाज घेतला जाऊशकतो. भारताकडे पायाभूत सुविधा तर आहेत, परंतुत्यांचा लाभ उठवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत.इन्क्रेडिबल इंडियाचे फेसबुकवर 19 लाख आणिइन्स्टाग्रामवर केवळ 7.85 लाख फॉलोअर्स आहेत.एवढेच फॉलोअर्स असलेल्या सौदी अरेबियाने जिथेएकाच महिन्यात 2.7 कोटी कंटेंट व्ह्यूज मिळवले, तिथेभारत केवळ 3.88 लाख व्ह्यूजपर्यंतच मर्यादित राहिला.मंच उपलब्ध आहे, परंतु भारत गेल्या एका दशकापासूनजागतिक मार्केटिंगच्या परिदृश्यातून पूर्णपणे गायब आहे.याची मोठी किंमत आपल्या पर्यटन क्षेत्राला मोजावीलागत आहे. केवळ मार्केटिंगही पुरेशी ठरणार नाही.आपल्याला मिशन मोडमध्ये पर्यटन क्षेत्राला डी-रेग्युलेटदेखील करावे लागेल. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, होमस्टे,वाहतूक ऑपरेटर आणि पर्यटन सेवा पुरवठादार हे अनेकपरवाने, प्रक्रिया आणि तपासण्यांच्या ओझ्याखाली कामकरतात. जे प्रकल्प इतर आशियाई देशांमध्ये 18 महिन्यांतपूर्ण होतात, त्यांना भारतात खूप जास्त वेळ लागतो.एकात्मिक परवाना व्यवस्था, डिजिटलायझेशन आणिस्वयंचलित नूतनीकरण लागू केले पाहिजे. आपल्याप्रत्येक राज्याला पर्यटनाचा अग्रदूत बनावे लागेल. प्रत्येकराज्याने 15 प्रमुख पर्यटन स्थळांची ओळख पटवून त्यांचाअशा एका सर्वसमावेशक पर्यटन इको-सिस्टममध्येविकास केला पाहिजे, ज्यामध्ये पोहोच, निवास, अनुभव,आयोजन, सुरक्षा, स्वच्छता, स्थानिक उद्योग आणिमार्केटिंग- या सर्वांचा समावेश असेल. एखादेडेस्टिनेशन केवळ तिथे रस्ते, हॉटेल्स किंवा संकेतकउपलब्ध आहेत म्हणूनच तयार मानले जाऊ शकत नाही.पर्यटन क्षेत्राची स्पर्धात्मकता आता यावरही अवलंबूनअसेल की एखादे डेस्टिनेशन कंटेंट-क्रिएटर्ससाठीअनुकूल आहे की नाही, ते सहजपणे ऑनलाइन शोधलेजाऊ शकते की नाही, ते व्यवहारासाठी तयार आहे कीनाही आणि त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो कीनाही. आपल्याला कंटेंट-क्रिएशन अर्थव्यवस्थेचाहीपर्यटनाची एक रणनीती म्हणून स्वीकार करावा लागेल.सरकारी मोहिमा जागरूकता निर्माण करू शकतात, परंतुविश्वास निर्माण करण्याचे काम कंटेंट-क्रिएटर्स करतात.एक उत्कृष्ट व्हिडिओ जो प्रभाव निर्माण करू शकतो, तोकोणतेही ब्रोशर करू शकत नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) 2.83 लाख नवीन रोजगार...एक परदेशी पर्यटक आपल्या प्रत्येकदौऱ्यात जीडीपीमध्ये 3,000 डॉलरचेयोगदान देतो. मार्केटिंगवर 20 कोटीडॉलरची गुंतवणूक 10 लाख अतिरिक्तपरदेशी पर्यटकांना आकर्षित करेल,ज्यातून 3.6 अब्ज डॉलरचे मूल्यनिर्माण होईल, 40 कोटी डॉलरचीजीएसटी प्राप्ती होईल आणि 2.83 लाखनवीन रोजगार निर्माण होतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



