परकीय चलन मिळवण्याच्या आणि रोजगार निर्माणकरण्याच्या सर्वात वेगवान मार्गांपैकी एक पर्यटन हादेखील आहे, तरीही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.अशा वेळी, जेव्हा जागतिक अनिश्चितता, ऊर्जेच्याकिमतींमधील अस्थिरता, पुरवठा साखळीतील व्यत्ययआणि भू-राजकीय धक्के चालू खात्यावर दबाव आणतआहेत, तेव्हा पर्यटन आपल्या अर्थव्यवस्थेसाठीस्टॅबलायझरचे काम करू शकते. परदेशी पर्यटक थेट आपल्या अर्थव्यवस्थेत डॉलरघेऊन येतात. ते हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, पर्यटन स्थळे,स्मृतिचिन्हे, सांस्कृतिक अनुभव आणि स्थानिकखाद्यपदार्थांवर पैसे खर्च करतात. यातील प्रत्येक क्षेत्रस्वतःच रोजगार निर्मितीचा एक शक्तिशाली स्रोत आहे.पर्यटनाशी जोडला गेलेला प्रत्येक प्रत्यक्ष रोजगार 13अप्रत्यक्ष रोजगारांनाही जन्म देतो. वेटर, शेफ, ड्रायव्हर,गाइड, कारागीर, होमस्टे संचालक, डिजिटल मार्केटरआणि हजारो छोटे स्थानिक उद्योग ही याची केवळ काहीउदाहरणे आहेत. जिथे मॅन्युफॅक्चरिंग-आधार ती थेटपरकीय गुंतवणूक- ज्याला दीर्घकालीन उपाय म्हणूनप्राधान्य दिले जाते- ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक वर्षेलागतात आणि लक्षणीय पातळीवर परकीय चलन निर्माणकरण्यासाठी त्याहूनही अधिक वेळ लागतो, तर दुसरीकडेपर्यटन हे एखाद्या पर्यटकाच्या निर्णयांचे काही महिन्यांतचडॉलरमध्ये रूपांतर करते. भारताच्या एव्हिएशन कंपन्यांनी 2000 हून अधिकनवीन विमानांची ऑर्डर दिली आहे, ज्यांचा पुरवठा येत्याकाही वर्षांत वेगाने वाढेल. वरवर पाहता ही एव्हिएशनक्षेत्राच्या महत्त्वाकांक्षेची कहाणी वाटते, परंतु जरत्याचवेळी ही विमाने परदेशी पर्यटकांनी भरण्याचे प्रयत्नकेले गेले नाहीत, तर त्याचे उलटे परिणामही मिळूशकतात: भारतीयांसाठी परदेश प्रवास अधिक सोपाआणि स्वस्त होईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मौल्यवान परकीय चलन देशाबाहेर जाईल. गेल्या 4 वर्षांत भारताच्या परदेशी पर्यटन मार्केटिंग बजेटमध्ये जवळपास शून्यापर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याचे परिणामही अपेक्षित आहेत. 2024 या वर्षात भारतात 99 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आले- जे महामारीच्या आधीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 10%कमी आहेत. जिथे भारताचे सर्व प्रमुख प्रतिस्पर्धी देश2019 ची पातळी ओलांडून पुढे गेले आहेत, तिथे आपण आजही त्या स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतआहोत. त्यामुळे आपल्या परदेशी पर्यटन मार्केटिंगबजेटमध्ये केलेली मोठी कपात आश्चर्यकारक आहे. एक परदेशी पर्यटक आपल्या प्रत्येक दौऱ्यात भारताच्या जीडीपीमध्ये 3,000 डॉलरचे योगदान देतो, तर एकादेशांतर्गत पर्यटकाचे योगदान केवळ 75 डॉलर असते- म्हणजे यात 40 पटीचा फरक आहे. मार्केटिंगवर 20 कोटी डॉलरची गुंतवणूक 10 लाख अतिरिक्त परदेशी पर्यटकांना आकर्षित करेल, ज्यातून 3.6 अब्ज डॉलरचे आर्थिकमूल्य निर्माण होईल, 40 कोटी डॉलरची जीएसटी प्राप्तीहोईल आणि 2.83 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. म्हणजेच मार्केटिंगवर खर्च केलेल्या प्रत्येक डॉलरवर 18 पटींनी परतावा मिळेल. केवळ 55,000 अतिरिक्तपर्यटक- जे भारताच्या सध्याच्या टूरिस्ट-बेसच्या फक्त0.5% आहेत- संपूर्ण मार्केटिंग खर्चाची भरपाई करतील.हे कोणतेही अंदाज नाहीत. हे तेच परिणाम आहेत, जेइन्क्रेडिबल इंडिया मोहिमेने प्रत्यक्षरीत्या सिद्ध करूनदाखवले होते. जागतिक पर्यटनामध्ये डिजिटलटेक्नॉलॉजी मोठे बदल घडवून आणत आहे. आणि हेच तेक्षेत्र आहे, ज्यातील भारताची अनुपस्थिती आपल्यासाठीमहागडी ठरत आहे. आज पर्यटनाशी संबंधित एकूणविक्रीपैकी 78% विक्री ऑनलाइन होते, 70% बुकिंगमोबाइल उपकरणांवर पूर्ण केली जाते आणि 45%व्यवहार ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातूनहोतात. स्पर्धेचे मैदान आता यूट्यूब प्री-रोल्स, सोशलमीडिया अल्गोरिदम, प्रोग्रॅमॅटिक डिस्प्ले आणिइन्फ्लुएन्सर नेटवर्कवर स्थलांतरित झाले आहे. हे असेचॅनेल्स आहेत, जिथे खर्चाचे मोजमाप केले जाऊ शकते,टार्गेटिंग अचूक असते आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचाजवळपास रिअल-टाइममध्ये अंदाज घेतला जाऊशकतो. भारताकडे पायाभूत सुविधा तर आहेत, परंतुत्यांचा लाभ उठवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत.इन्क्रेडिबल इंडियाचे फेसबुकवर 19 लाख आणिइन्स्टाग्रामवर केवळ 7.85 लाख फॉलोअर्स आहेत.एवढेच फॉलोअर्स असलेल्या सौदी अरेबियाने जिथेएकाच महिन्यात 2.7 कोटी कंटेंट व्ह्यूज मिळवले, तिथेभारत केवळ 3.88 लाख व्ह्यूजपर्यंतच मर्यादित राहिला.मंच उपलब्ध आहे, परंतु भारत गेल्या एका दशकापासूनजागतिक मार्केटिंगच्या परिदृश्यातून पूर्णपणे गायब आहे.याची मोठी किंमत आपल्या पर्यटन क्षेत्राला मोजावीलागत आहे. केवळ मार्केटिंगही पुरेशी ठरणार नाही.आपल्याला मिशन मोडमध्ये पर्यटन क्षेत्राला डी-रेग्युलेटदेखील करावे लागेल. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, होमस्टे,वाहतूक ऑपरेटर आणि पर्यटन सेवा पुरवठादार हे अनेकपरवाने, प्रक्रिया आणि तपासण्यांच्या ओझ्याखाली कामकरतात. जे प्रकल्प इतर आशियाई देशांमध्ये 18 महिन्यांतपूर्ण होतात, त्यांना भारतात खूप जास्त वेळ लागतो.एकात्मिक परवाना व्यवस्था, डिजिटलायझेशन आणिस्वयंचलित नूतनीकरण लागू केले पाहिजे. आपल्याप्रत्येक राज्याला पर्यटनाचा अग्रदूत बनावे लागेल. प्रत्येकराज्याने 15 प्रमुख पर्यटन स्थळांची ओळख पटवून त्यांचाअशा एका सर्वसमावेशक पर्यटन इको-सिस्टममध्येविकास केला पाहिजे, ज्यामध्ये पोहोच, निवास, अनुभव,आयोजन, सुरक्षा, स्वच्छता, स्थानिक उद्योग आणिमार्केटिंग- या सर्वांचा समावेश असेल. एखादेडेस्टिनेशन केवळ तिथे रस्ते, हॉटेल्स किंवा संकेतकउपलब्ध आहेत म्हणूनच तयार मानले जाऊ शकत नाही.पर्यटन क्षेत्राची स्पर्धात्मकता आता यावरही अवलंबूनअसेल की एखादे डेस्टिनेशन कंटेंट-क्रिएटर्ससाठीअनुकूल आहे की नाही, ते सहजपणे ऑनलाइन शोधलेजाऊ शकते की नाही, ते व्यवहारासाठी तयार आहे कीनाही आणि त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो कीनाही. आपल्याला कंटेंट-क्रिएशन अर्थव्यवस्थेचाहीपर्यटनाची एक रणनीती म्हणून स्वीकार करावा लागेल.सरकारी मोहिमा जागरूकता निर्माण करू शकतात, परंतुविश्वास निर्माण करण्याचे काम कंटेंट-क्रिएटर्स करतात.एक उत्कृष्ट व्हिडिओ जो प्रभाव निर्माण करू शकतो, तोकोणतेही ब्रोशर करू शकत नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) 2.83 लाख नवीन रोजगार...एक परदेशी पर्यटक आपल्या प्रत्येकदौऱ्यात जीडीपीमध्ये 3,000 डॉलरचेयोगदान देतो. मार्केटिंगवर 20 कोटीडॉलरची गुंतवणूक 10 लाख अतिरिक्तपरदेशी पर्यटकांना आकर्षित करेल,ज्यातून 3.6 अब्ज डॉलरचे मूल्यनिर्माण होईल, 40 कोटी डॉलरचीजीएसटी प्राप्ती होईल आणि 2.83 लाखनवीन रोजगार निर्माण होतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




