
Vashi Market : लांबलेला पावसाळा आणि वाढती उष्णता यांचा परिणाम भाज्यांवर दिसत असून बाजारात भाज्यांचे दर वाढलेले आहेत. कांदा ४० रुपयांच्या पार चालला आहे तर बटाट्याच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे.
यात भरासभर म्हणून टोमॅटोच्याही किंमती दुपटीने वाढल्या आहेत. टोमॅटो दर वाढल्याने शेतकऱ्याऱ्यांना चांगला भाव मिळत असला तरी सर्व सामान्यांच्या खिशाला मात्र मोठं भगदाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्यानंतर आता टोमॅटोही सर्वसामान्यांना रडवणार असेच चित्र दिसत आहे.
देशात सध्या अनेक ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे. याचा परिणाम टोमॅटो पिकावर जास्त प्रमाणात होत असून उष्णतेमुळे टोमॅटो लवकर पिकत आहेत. टोमॅटो लवकर पिकून सडत असल्याने बाजारात खराब टोमॅटो फेकून देण्याची वेळ येत आहे. तर दुसरीकडे मुळातच उत्पादन कमी झाल्याने टोमॅटोच्या दरात मोठ्याप्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे
|
|
में महिन्यात टोमॅटो घाऊक बाजारात २० ते २५ रुपये प्रती किलोने विकले होते. वाशीतील एपीएमसी बाजारात शुक्रवारी (१४ जून) १९६१ क्विंटल टोमॅटोची आवक झाली त्यावेळी घाऊक बाजारात टोमॅटोचे दर ३० ते ४० रुपये प्रती किलो झाल्याचे पहायला मिळाले. परंतु, आता हे दर वाढून सरासरी ४० ते ५० रुपये प्रती किलो होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. टोमॅटोच्या भाव वाढीचा परिणाम केवळ मुंबई महाराष्ट्रा पुरताच दिसत नसून दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू या भागांत टोमॅटोचे दर वाढलेले आहेत.
कर्नाटक राज्यात टोमॅटोचे दर ६० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मात्र, उत्तर भारतात याचा इतका परिणाम दिसून येत नसल्याचे व्यापाऱ्याऱ्यांनी सांगितले आहे. उष्णतेच्या प्रभावाखाली असणाऱ्या उत्तरेकडील राज्यामध्ये पिकणारा टोमॅटो झाडांवर लवकर पिकत असल्याने त्याची काढणी देखील लवकर करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार पेठेत लवकर पुरवठा केल्याने तिथे टोमॅटोच्या दरांमध्ये तितकासा परिणाम पहायला मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
"वाढत्या उष्णतेचा परिणाम टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो आहे. उष्णतेमुळे लवकर पिंकून बराचसा टोमॅटो खराब झाल्याने फेकून द्यावा लागत आहे. तसेच जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात टोमॅटोचे दर हे वाढलेलेच असतात. पावसाळा सुरू झाल्यावर टोमॅटो पिकाचे सुद्धा मोठे नुकसान होत असते. त्यामुळे देखील टोमॅटोचे पीक कमी होऊन दर वाढत असतात. टोमॅटोचे नवीन पीक येईपर्यंत ग्राहकांना भाववाढ सोसावी लागेल अशी परिस्थिती सध्या दिसत आहे."
"सर्वच भाज्याचे दर वाढले आहेत. टोमॅटो ही भाजी जवळपास जेवणातल्या प्रत्येक प्रकारात वापरली जाते. त्यामुळे दर वाढल्याने टोमॅटोच्या बाबतीतही काटकसर करावी लागणार आहे. वाढत्या महागाईने आधीच घर खर्च भागत नसताना भाज्यांच्या किंमती वाढल्याने घराचे वजेट पुरते कोलमडून पडले आहे."
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



