माल्टा येथे जन्मलेले अमेरिकन व्यंगचित्रकार जो सॅकोयांनी त्यांच्या अनोख्या ‘कॉमिक्स जर्नलिझम’च्या जोरावरजगभरात लोकप्रियता मिळवली आहेच, पण आता त्यांनीआपल्या समृद्ध बायोडाटात ‘द वन्स अँड फ्युचर रायट’ याताज्या पुस्तकाची भर घातली आहे. मात्र, प्रकाशकाने यापुस्तकाचे वितरण थांबवले आहे. हे पुस्तक 2002 च्यागुजरात दंगलींनंतर झालेल्या सर्वात मोठ्या मुझफ्फरनगरदंगलीवर आधारित आहे. प्रथम आपण तथ्यांवर नजर टाकूया. भारतात पुस्तकांवरबंदी येण्याचा दुर्दैवी इतिहास आहे. पण, सॅको यांच्यापुस्तकावर सरकारने बंदी घातलेली नाही. प्रकाशकानेच हेपाऊल उचलले आहे. त्यांनी पुस्तक रोखून त्यात काहीसुधारणा सुचवणारी पाच पानांची एक नोंद पाठवली होती,जी सॅको यांनी फेटाळून लावली. आता अनेक भारतीयप्रकाशक सॅको यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतआहेत. सॅको यांचे म्हणणे आहे की, हे पुस्तक भारतीयवाचकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा आहे. 155 पानांच्या या पुस्तकात कॉमिक्स-पत्रकारितेचे उस्तादसॅको यांनी आपल्या शानदार स्केचेसच्या माध्यमातून एकगुंतागुंतीची कथा सांगितली आहे. मजकूर केवळ‘ब्लर्ब्स’मध्ये आहे, जो वाचायला दोन तासांपेक्षा जास्तवेळ लागणार नाही, जर तुम्ही त्यांच्या रेखाचित्रांच्यामोहपाशात अडकला नाहीत तरच. पुस्तकावर बंदी नाहीआणि कोणताही कायदा पुस्तक वाचण्यापासून रोखत नाही.सॅको यांनी 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीची जी कथामांडली आहे, ती सरळ, मुख्यत्वे एका रेषेत चालणारी,तथ्यपूर्ण आहे आणि भारतीय पत्रकारितेत ती शंभर नाही तरअनेकदा सांगितली गेली आहे. पुस्तकात कोणतीही आश्चर्यकारक गोष्ट सांगितलेली नाही, कोणताही नवीन खुलासा झालेला नाही किंवा कशाचेही अतिरंजित वर्णनकेलेले नाही. भारतीय संदर्भाचा विचार करता सॅको यांनी दंगलीला ‘लहान’ असेच म्हटले आहे. मग सॅको यांनी यावर अखेर संपूर्ण पुस्तक का लिहिले, ज्या अर्थी बोस्निया आणि गाझा येथील नरसंहारावर लिहिलेल्या कृतींमुळे त्यांना खूप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळालेआहेत? ज्या दंगलीला ते ‘लहान’ म्हणत आहेत, ज्यात 52 मुसलमान आणि 20 हिंदू मिळून एकूण 62 लोक मारले गेले, त्यामध्ये त्यांना इतका रस का वाटला? नवी दिल्लीपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर 62 लोकांचा बळी जाणेही नक्कीच छोटी गोष्ट नाही. पण, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जातीय दंगलींच्या आकाराचेही एक प्रमाण ठरले आहे. सॅको यांचे ‘रिपोर्टिंग’ अविश्वसनीयरीत्या सूक्ष्म आहे, परंतु काही बाबतीत ते चुकले आहेत असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, फाळणीच्या वेळी झालेल्या भीषण कत्तलींनंतर भारतात जातीय दंगली 1992 मधील बाबरी मशीदविध्वंसानंतरच झाल्या, हा त्यांचा समज चुकीचा आहे. गुजरातमध्ये तर 1992 च्या आधीपासूनच दंगलींचा इतिहासराहिला आहे, विशेषतः 1969 च्या अहमदाबाद दंगलीत 612लोक मारले गेले होते. मोठी आकडेवारी खूप काही सांगते.जातीय हिंसाचारावरील संशोधन ‘वार्ष्णेय-विल्किन्स न’डेटासेटवर आधारित आहे. हा डेटासेट ब्राउन युनिव्हर्सिटीचेप्राध्यापक आशुतोष वार्ष्णेय आणि येल युनिव्हर्सिटीचेप्राध्यापक स्टीव्हन विल्किन्सन यांच्या नावाने ओळखलाजातो. यामध्ये भारतात 1960 ते 1996 दरम्यान झालेल्या1,195 उल्लेखनीय जातीय दंगलींची आकडेवारीनोंदवलेली आहे. त्यापैकी 72 टक्के म्हणजेच 871 दंगलीनेहरू, इंदिरा आणि राजीव गांधींच्या सरकारच्या काळातझाल्या. भारतात जातीय दंगलींचा सिलसिला बाबरी मशीदपाडल्यानंतर सुरू झाला नाही, परंतु विडंबना ही की सॅकोयांनी हा तर्क स्वीकारला. जातीय दंगलींच्या रूपातअसलेल्या आपल्या राष्ट्रीय लाजिरवाण्या गोष्टीबद्दलअधिक जाणून घ्यायचे असेल, तर ‘पब्लिक पॉलिसी रिसर्चसेंटर’च्या वेबसाइटवरील ‘अ फॅक्ट शीट ऑन कम्युनलरायट्स’ नक्की पाहा. परंतु, यामुळे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये ज्यावरसॅको यांनी भर दिला आहे. स्थानिक वाद कशा प्रकारेदंगलींचे रूप घेतात, जिथे नेतृत्वहीन आणि सुरुवातीलाराजकारणापासून दूर असलेली गर्दी वरचढ ठरते. संधीचाफायदा घेऊन राजकारणी आणि सिद्धांतवादीदेखील त्यातउडी घेतात. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्ये हेचघडले. ते याचीदेखील आठवण करून देतात की, त्या वेळीसूत्रे कुणाच्या हाती होती. तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेशयादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे वडील मुलायमसिंह यादवयांची समाजवादी पार्टी सत्तेत होती आणि देशाची सूत्रे यूपीएसरकारकडे होती. दोन्ही ‘सेक्युलर’ शक्ती! बाबरी विध्वंस (1992) आणि गुजरात दंगली (2002) नंतरसार्वजनिक चर्चेचे ज्या प्रकारे ध्रुवीकरण झाले आहे, तेपाहता कधी-कधी परकीय दृष्टिकोन तुम्हाला अधिक स्पष्टचित्र दाखवतो. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्येछोट्या-छोट्या घटनांकडे कसे दुर्लक्ष केले गेले. जसे कीएका मुस्लिम मुलीवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न, एकाहिंदू मुलीला त्रास दिल्याच्या संशयावरून एका मुस्लिममुलाची हत्या आणि त्याचा बदला घेण्यासाठी हिंदू गटाकडूनदोन चुलत भावांची हत्या, जाट समुदायाच्या मिरवणुकीवरमुस्लिम गर्दीचा हल्ला... अशा सर्व घटना गांभीर्याने घेतल्यागेल्या नाहीत. सॅको सांगतात की दोन मुलांच्या हत्येप्रकरणीपोलिसांनी अनेक मुस्लिमांना अटक केली होती, ज्यांच्याशर्टवर रक्ताचे डाग होते. त्या सर्वांना दुसऱ्याच दिवशीसकाळी सोडून देण्यात आले आणि एसएसपी तसेच जिल्हादंडाधिकाऱ्यांची बदलीही करण्यात आली. सॅको यांनीलिहिले आहे की, यूपीमधील जाटांना या मुस्लिमांना संतुष्टकरण्याचा प्रयत्न वाटला असावा. सॅको यांनी ‘दि फ्युचररायट’ (भविष्यातील दंगल) शीर्षकाच्या 17 पानांच्यानिष्कर्षामध्ये लिहिले आहे की, या दंगलींमुळे भाजपला त्याराज्यात 2017 आणि 2022 च्या निवडणुका जिंकण्यासमदत झाली. पण, अशा गोष्टी सांगणाऱ्या पुस्तकावर कोणतेही सरकारबंदी घालणार नाही. अशा गोष्टी गेल्या एका दशकातप्रकाशित झालेल्या दोन डझन पुस्तकांमध्ये आढळूशकतात. हो, प्रकाशकाचे हे म्हणणे खरे आहे की, पुस्तकातभारताचा जो नकाशा दिला आहे, तो प्रकाशित करणेकायद्याचे उल्लंघन ठरेल. पण, अशा प्रकरणांना कसेहाताळायचे हे सर्वांना ठाऊक आहे. परदेशी प्रकाशनांमध्येअशा नकाशांवर ते चुकीचे असल्याची खूण केली जातेकिंवा ते काढून टाकले जातात. मात्र, याचे निमित्त करूनएखादे पुस्तक वितरित न करणे ही क्रूर थट्टाच असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) स्वातंत्र्यानंतर भारतात जातीय दंगलींचाप्रदीर्घ इतिहास राहिला आहे.भारतात 1960 ते 1996 या काळात 1,195 उल्लेखनीयजातीय दंगलींची नोंद झाली आहे. यापैकी 72 % म्हणजे871 दंगली या नेहरू, इंदिरा व राजीव गांधी सरकारच्याकार्यकाळात झाल्या. भारतात दंगलींचा सिलसिला बाबरीमशीद पतनानंतर सुरू झाला, असे नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
- मुंबईत पावसाचा जोर! पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला; सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
- टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! सूत्रधार बिजेंद्र गुप्ताची पत्नी बिहारमधून अटकेत
- मुंबईत पावसाचा जोर! पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला; सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
गुन्हा
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!

























Subscribe to my channel


