मध्य प्रदेशातील भोजशाला संकुलाच्या वादात सर्वोच्चन्यायालयाने उच्च न्यायालयाला तीन आठवड्यांतसुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 एप्रिलला होईल.भोजशाला हे 11 व्या शतकातील एक संरक्षित स्मारकआहे. हिंदू समुदाय याला देवी सरस्वतीचे मंदिर मानतोतर मुस्लिम समुदाय याला कमल मौला मशीद म्हणूनओळखतो. 2003 मध्ये दोन्ही समुदायांच्या दाव्यांवरतोडगा काढण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनेमुस्लिम समुदायाला शुक्रवारच्या दुपारी 1 ते 3 या वेळेत नमाजासाठी संकुलात प्रवेश करण्याची परवानगी दिलीतर हिंदूंना वसंत पंचमीच्या निमित्ताने धार्मिक विधी करण्याची परवानगी दिली होती. यावर्षी वसंत पंचमी शुक्रवारी आली होती. त्यामुळे न्यायालयाकडे धावघेण्यात आली. न्यायालयाने दोन्ही समुदायांना एकाच दिवशी प्रार्थना करण्याची परवानगी दिली व त्याचे वेळापत्रक व प्रवेशाची व्यवस्था ठरवली. एका पातळीवर हा हस्तक्षेप व्यावहारिक वाटतो. परंतु हेप्रकरण सामायिक धार्मिक स्थळांशी संबंधित वादांमध्येन्यायालयीन भूमिकेच्या व्याप्तीबद्दल एक घटनात्मकप्रश्न उपस्थित करते. भोजशाला प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. हा एका व्यापक प्रवाहाचा भाग आहे. त्यातधार्मिक व्यवस्थांच्या देखरेखीसाठी न्यायालयांकडेअधिकाधिक प्रमाणात धाव घेतली जात आहे.न्यायालयासमोर झालेल्या चर्चेतून हे स्पष्टपणे दिसून येतेकी मुख्य मुद्दे प्रशासकीय स्वरूपाचे होते—वेळेचेव्यवस्थापन, प्रवेशाचे नियमन, गटांमधील समन्वय.सण, मिरवणुका किंवा सार्वजनिक जागांच्या सामायिकवापरादरम्यान या बाबी सामान्यतः जिल्हा प्रशासनाकडूनहाताळल्या जातात. अशा व्यवस्थापकीय व प्रशासकीयप्रश्नांना वारंवार न्यायालयीन देखरेखीची आवश्यकताभासते तेव्हा ते एका संरचनात्मक बदलाचे संकेत देते.1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या पार्श्वभूमीवर हीबदलती प्रथा अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. वाढत्या जातीयतणावाच्या पार्श्वभूमीवर संमत झालेल्या या कायद्याने15 ऑगस्ट, 1947 रोजी अस्तित्वात असलेले धार्मिकस्वरूप स्थिर केले आणि त्यात बदल करण्यास मनाईकेली. त्याचा उद्देश स्पष्ट होता : ऐतिहासिक धार्मिकदाव्यांची न्यायालयीन पुनर्तपासणी रोखणे आणि देशभूतकाळातील वादांमध्ये अडकणार नाही याची खात्रीकरणे. परंतु अलीकडील घडामोडींनी या कायदेशीरतडजोडीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी जिल्हा न्यायालयाने मशीदसंकुलाचे स्थान निश्चित करण्याचे आदेश भारतीयपुरातत्व सर्वेक्षणला दिले. त्या निर्णयाला उच्च न्यायालयव सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले.याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, असेसर्वेक्षण 1991 च्या कायद्याचे उल्लंघन करेल. अशासर्वेक्षणांमुळे निराधार दाव्यांना प्रोत्साहन मिळू शकते. याभीतीला उत्तर देताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टिप्पणीकेली की, तुम्हाला निराधार वाटते ती दुसऱ्या पक्षासाठीश्रद्धा असू शकते. धार्मिक सहअस्तित्वासाठी कोर्टाचावारंवार घेतला जाणार आधार हा संस्थात्मक चिंतेचेद्योतक आहे. हे केवळ निःपक्षपाती मध्यस्थीसाठीकार्यकारी मंडळावरील विश्वासाचा अभावच दर्शवतनाही तर समुदायांमधील स्थानिक संवादाची कमजोरीहीउघड करते. भोजशाला प्रकरणात न्यायालयासमोरीलचर्चेतून असे दिसते की दोन्ही पक्ष व्यवहार्य तोडग्यांवरविचार करू शकले. असा सलोखा स्वागतार्ह आहे.अशा प्रशासकीय व्यवस्था सहसा सण आणि इतर प्रसंगीजिल्हा स्तरावर केल्या जातात. मात्र त्यासाठीन्यायालयांच्या मंजुरीची गरज भासते तेव्हा ते प्रशासकीयविश्वासार्हतेवरील विश्वास कमी होत असल्याचे लक्षणअसू शकते. (ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत) भोजशाला येथील प्रकरण ही एक वेगळीघटना नाही. केवळ हक्क निश्चितकरण्यासाठीच नव्हे तर धार्मिकव्यवस्थेच्या देखरेखीसाठीहीन्यायालयाकडे धाव घेतली जात आहे.अशा प्रवाहाचा हा भाग म्हणावा लागेल.
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




