माल्टा येथे जन्मलेले अमेरिकन व्यंगचित्रकार जो सॅकोयांनी त्यांच्या अनोख्या ‘कॉमिक्स जर्नलिझम’च्या जोरावरजगभरात लोकप्रियता मिळवली आहेच, पण आता त्यांनीआपल्या समृद्ध बायोडाटात ‘द वन्स अँड फ्युचर रायट’ याताज्या पुस्तकाची भर घातली आहे. मात्र, प्रकाशकाने यापुस्तकाचे वितरण थांबवले आहे. हे पुस्तक 2002 च्यागुजरात दंगलींनंतर झालेल्या सर्वात मोठ्या मुझफ्फरनगरदंगलीवर आधारित आहे. प्रथम आपण तथ्यांवर नजर टाकूया. भारतात पुस्तकांवरबंदी येण्याचा दुर्दैवी इतिहास आहे. पण, सॅको यांच्यापुस्तकावर सरकारने बंदी घातलेली नाही. प्रकाशकानेच हेपाऊल उचलले आहे. त्यांनी पुस्तक रोखून त्यात काहीसुधारणा सुचवणारी पाच पानांची एक नोंद पाठवली होती,जी सॅको यांनी फेटाळून लावली. आता अनेक भारतीयप्रकाशक सॅको यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतआहेत. सॅको यांचे म्हणणे आहे की, हे पुस्तक भारतीयवाचकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा आहे. 155 पानांच्या या पुस्तकात कॉमिक्स-पत्रकारितेचे उस्तादसॅको यांनी आपल्या शानदार स्केचेसच्या माध्यमातून एकगुंतागुंतीची कथा सांगितली आहे. मजकूर केवळ‘ब्लर्ब्स’मध्ये आहे, जो वाचायला दोन तासांपेक्षा जास्तवेळ लागणार नाही, जर तुम्ही त्यांच्या रेखाचित्रांच्यामोहपाशात अडकला नाहीत तरच. पुस्तकावर बंदी नाहीआणि कोणताही कायदा पुस्तक वाचण्यापासून रोखत नाही.सॅको यांनी 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीची जी कथामांडली आहे, ती सरळ, मुख्यत्वे एका रेषेत चालणारी,तथ्यपूर्ण आहे आणि भारतीय पत्रकारितेत ती शंभर नाही तरअनेकदा सांगितली गेली आहे. पुस्तकात कोणतीही आश्चर्यकारक गोष्ट सांगितलेली नाही, कोणताही नवीन खुलासा झालेला नाही किंवा कशाचेही अतिरंजित वर्णनकेलेले नाही. भारतीय संदर्भाचा विचार करता सॅको यांनी दंगलीला ‘लहान’ असेच म्हटले आहे. मग सॅको यांनी यावर अखेर संपूर्ण पुस्तक का लिहिले, ज्या अर्थी बोस्निया आणि गाझा येथील नरसंहारावर लिहिलेल्या कृतींमुळे त्यांना खूप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळालेआहेत? ज्या दंगलीला ते ‘लहान’ म्हणत आहेत, ज्यात 52 मुसलमान आणि 20 हिंदू मिळून एकूण 62 लोक मारले गेले, त्यामध्ये त्यांना इतका रस का वाटला? नवी दिल्लीपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर 62 लोकांचा बळी जाणेही नक्कीच छोटी गोष्ट नाही. पण, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जातीय दंगलींच्या आकाराचेही एक प्रमाण ठरले आहे. सॅको यांचे ‘रिपोर्टिंग’ अविश्वसनीयरीत्या सूक्ष्म आहे, परंतु काही बाबतीत ते चुकले आहेत असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, फाळणीच्या वेळी झालेल्या भीषण कत्तलींनंतर भारतात जातीय दंगली 1992 मधील बाबरी मशीदविध्वंसानंतरच झाल्या, हा त्यांचा समज चुकीचा आहे. गुजरातमध्ये तर 1992 च्या आधीपासूनच दंगलींचा इतिहासराहिला आहे, विशेषतः 1969 च्या अहमदाबाद दंगलीत 612लोक मारले गेले होते. मोठी आकडेवारी खूप काही सांगते.जातीय हिंसाचारावरील संशोधन ‘वार्ष्णेय-विल्किन्स न’डेटासेटवर आधारित आहे. हा डेटासेट ब्राउन युनिव्हर्सिटीचेप्राध्यापक आशुतोष वार्ष्णेय आणि येल युनिव्हर्सिटीचेप्राध्यापक स्टीव्हन विल्किन्सन यांच्या नावाने ओळखलाजातो. यामध्ये भारतात 1960 ते 1996 दरम्यान झालेल्या1,195 उल्लेखनीय जातीय दंगलींची आकडेवारीनोंदवलेली आहे. त्यापैकी 72 टक्के म्हणजेच 871 दंगलीनेहरू, इंदिरा आणि राजीव गांधींच्या सरकारच्या काळातझाल्या. भारतात जातीय दंगलींचा सिलसिला बाबरी मशीदपाडल्यानंतर सुरू झाला नाही, परंतु विडंबना ही की सॅकोयांनी हा तर्क स्वीकारला. जातीय दंगलींच्या रूपातअसलेल्या आपल्या राष्ट्रीय लाजिरवाण्या गोष्टीबद्दलअधिक जाणून घ्यायचे असेल, तर ‘पब्लिक पॉलिसी रिसर्चसेंटर’च्या वेबसाइटवरील ‘अ फॅक्ट शीट ऑन कम्युनलरायट्स’ नक्की पाहा. परंतु, यामुळे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये ज्यावरसॅको यांनी भर दिला आहे. स्थानिक वाद कशा प्रकारेदंगलींचे रूप घेतात, जिथे नेतृत्वहीन आणि सुरुवातीलाराजकारणापासून दूर असलेली गर्दी वरचढ ठरते. संधीचाफायदा घेऊन राजकारणी आणि सिद्धांतवादीदेखील त्यातउडी घेतात. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्ये हेचघडले. ते याचीदेखील आठवण करून देतात की, त्या वेळीसूत्रे कुणाच्या हाती होती. तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेशयादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे वडील मुलायमसिंह यादवयांची समाजवादी पार्टी सत्तेत होती आणि देशाची सूत्रे यूपीएसरकारकडे होती. दोन्ही ‘सेक्युलर’ शक्ती! बाबरी विध्वंस (1992) आणि गुजरात दंगली (2002) नंतरसार्वजनिक चर्चेचे ज्या प्रकारे ध्रुवीकरण झाले आहे, तेपाहता कधी-कधी परकीय दृष्टिकोन तुम्हाला अधिक स्पष्टचित्र दाखवतो. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्येछोट्या-छोट्या घटनांकडे कसे दुर्लक्ष केले गेले. जसे कीएका मुस्लिम मुलीवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न, एकाहिंदू मुलीला त्रास दिल्याच्या संशयावरून एका मुस्लिममुलाची हत्या आणि त्याचा बदला घेण्यासाठी हिंदू गटाकडूनदोन चुलत भावांची हत्या, जाट समुदायाच्या मिरवणुकीवरमुस्लिम गर्दीचा हल्ला... अशा सर्व घटना गांभीर्याने घेतल्यागेल्या नाहीत. सॅको सांगतात की दोन मुलांच्या हत्येप्रकरणीपोलिसांनी अनेक मुस्लिमांना अटक केली होती, ज्यांच्याशर्टवर रक्ताचे डाग होते. त्या सर्वांना दुसऱ्याच दिवशीसकाळी सोडून देण्यात आले आणि एसएसपी तसेच जिल्हादंडाधिकाऱ्यांची बदलीही करण्यात आली. सॅको यांनीलिहिले आहे की, यूपीमधील जाटांना या मुस्लिमांना संतुष्टकरण्याचा प्रयत्न वाटला असावा. सॅको यांनी ‘दि फ्युचररायट’ (भविष्यातील दंगल) शीर्षकाच्या 17 पानांच्यानिष्कर्षामध्ये लिहिले आहे की, या दंगलींमुळे भाजपला त्याराज्यात 2017 आणि 2022 च्या निवडणुका जिंकण्यासमदत झाली. पण, अशा गोष्टी सांगणाऱ्या पुस्तकावर कोणतेही सरकारबंदी घालणार नाही. अशा गोष्टी गेल्या एका दशकातप्रकाशित झालेल्या दोन डझन पुस्तकांमध्ये आढळूशकतात. हो, प्रकाशकाचे हे म्हणणे खरे आहे की, पुस्तकातभारताचा जो नकाशा दिला आहे, तो प्रकाशित करणेकायद्याचे उल्लंघन ठरेल. पण, अशा प्रकरणांना कसेहाताळायचे हे सर्वांना ठाऊक आहे. परदेशी प्रकाशनांमध्येअशा नकाशांवर ते चुकीचे असल्याची खूण केली जातेकिंवा ते काढून टाकले जातात. मात्र, याचे निमित्त करूनएखादे पुस्तक वितरित न करणे ही क्रूर थट्टाच असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) स्वातंत्र्यानंतर भारतात जातीय दंगलींचाप्रदीर्घ इतिहास राहिला आहे.भारतात 1960 ते 1996 या काळात 1,195 उल्लेखनीयजातीय दंगलींची नोंद झाली आहे. यापैकी 72 % म्हणजे871 दंगली या नेहरू, इंदिरा व राजीव गांधी सरकारच्याकार्यकाळात झाल्या. भारतात दंगलींचा सिलसिला बाबरीमशीद पतनानंतर सुरू झाला, असे नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"


























Subscribe to my channel


