माल्टा येथे जन्मलेले अमेरिकन व्यंगचित्रकार जो सॅकोयांनी त्यांच्या अनोख्या ‘कॉमिक्स जर्नलिझम’च्या जोरावरजगभरात लोकप्रियता मिळवली आहेच, पण आता त्यांनीआपल्या समृद्ध बायोडाटात ‘द वन्स अँड फ्युचर रायट’ याताज्या पुस्तकाची भर घातली आहे. मात्र, प्रकाशकाने यापुस्तकाचे वितरण थांबवले आहे. हे पुस्तक 2002 च्यागुजरात दंगलींनंतर झालेल्या सर्वात मोठ्या मुझफ्फरनगरदंगलीवर आधारित आहे. प्रथम आपण तथ्यांवर नजर टाकूया. भारतात पुस्तकांवरबंदी येण्याचा दुर्दैवी इतिहास आहे. पण, सॅको यांच्यापुस्तकावर सरकारने बंदी घातलेली नाही. प्रकाशकानेच हेपाऊल उचलले आहे. त्यांनी पुस्तक रोखून त्यात काहीसुधारणा सुचवणारी पाच पानांची एक नोंद पाठवली होती,जी सॅको यांनी फेटाळून लावली. आता अनेक भारतीयप्रकाशक सॅको यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतआहेत. सॅको यांचे म्हणणे आहे की, हे पुस्तक भारतीयवाचकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा आहे. 155 पानांच्या या पुस्तकात कॉमिक्स-पत्रकारितेचे उस्तादसॅको यांनी आपल्या शानदार स्केचेसच्या माध्यमातून एकगुंतागुंतीची कथा सांगितली आहे. मजकूर केवळ‘ब्लर्ब्स’मध्ये आहे, जो वाचायला दोन तासांपेक्षा जास्तवेळ लागणार नाही, जर तुम्ही त्यांच्या रेखाचित्रांच्यामोहपाशात अडकला नाहीत तरच. पुस्तकावर बंदी नाहीआणि कोणताही कायदा पुस्तक वाचण्यापासून रोखत नाही.सॅको यांनी 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीची जी कथामांडली आहे, ती सरळ, मुख्यत्वे एका रेषेत चालणारी,तथ्यपूर्ण आहे आणि भारतीय पत्रकारितेत ती शंभर नाही तरअनेकदा सांगितली गेली आहे. पुस्तकात कोणतीही आश्चर्यकारक गोष्ट सांगितलेली नाही, कोणताही नवीन खुलासा झालेला नाही किंवा कशाचेही अतिरंजित वर्णनकेलेले नाही. भारतीय संदर्भाचा विचार करता सॅको यांनी दंगलीला ‘लहान’ असेच म्हटले आहे. मग सॅको यांनी यावर अखेर संपूर्ण पुस्तक का लिहिले, ज्या अर्थी बोस्निया आणि गाझा येथील नरसंहारावर लिहिलेल्या कृतींमुळे त्यांना खूप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळालेआहेत? ज्या दंगलीला ते ‘लहान’ म्हणत आहेत, ज्यात 52 मुसलमान आणि 20 हिंदू मिळून एकूण 62 लोक मारले गेले, त्यामध्ये त्यांना इतका रस का वाटला? नवी दिल्लीपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर 62 लोकांचा बळी जाणेही नक्कीच छोटी गोष्ट नाही. पण, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जातीय दंगलींच्या आकाराचेही एक प्रमाण ठरले आहे. सॅको यांचे ‘रिपोर्टिंग’ अविश्वसनीयरीत्या सूक्ष्म आहे, परंतु काही बाबतीत ते चुकले आहेत असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, फाळणीच्या वेळी झालेल्या भीषण कत्तलींनंतर भारतात जातीय दंगली 1992 मधील बाबरी मशीदविध्वंसानंतरच झाल्या, हा त्यांचा समज चुकीचा आहे. गुजरातमध्ये तर 1992 च्या आधीपासूनच दंगलींचा इतिहासराहिला आहे, विशेषतः 1969 च्या अहमदाबाद दंगलीत 612लोक मारले गेले होते. मोठी आकडेवारी खूप काही सांगते.जातीय हिंसाचारावरील संशोधन ‘वार्ष्णेय-विल्किन्स न’डेटासेटवर आधारित आहे. हा डेटासेट ब्राउन युनिव्हर्सिटीचेप्राध्यापक आशुतोष वार्ष्णेय आणि येल युनिव्हर्सिटीचेप्राध्यापक स्टीव्हन विल्किन्सन यांच्या नावाने ओळखलाजातो. यामध्ये भारतात 1960 ते 1996 दरम्यान झालेल्या1,195 उल्लेखनीय जातीय दंगलींची आकडेवारीनोंदवलेली आहे. त्यापैकी 72 टक्के म्हणजेच 871 दंगलीनेहरू, इंदिरा आणि राजीव गांधींच्या सरकारच्या काळातझाल्या. भारतात जातीय दंगलींचा सिलसिला बाबरी मशीदपाडल्यानंतर सुरू झाला नाही, परंतु विडंबना ही की सॅकोयांनी हा तर्क स्वीकारला. जातीय दंगलींच्या रूपातअसलेल्या आपल्या राष्ट्रीय लाजिरवाण्या गोष्टीबद्दलअधिक जाणून घ्यायचे असेल, तर ‘पब्लिक पॉलिसी रिसर्चसेंटर’च्या वेबसाइटवरील ‘अ फॅक्ट शीट ऑन कम्युनलरायट्स’ नक्की पाहा. परंतु, यामुळे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये ज्यावरसॅको यांनी भर दिला आहे. स्थानिक वाद कशा प्रकारेदंगलींचे रूप घेतात, जिथे नेतृत्वहीन आणि सुरुवातीलाराजकारणापासून दूर असलेली गर्दी वरचढ ठरते. संधीचाफायदा घेऊन राजकारणी आणि सिद्धांतवादीदेखील त्यातउडी घेतात. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्ये हेचघडले. ते याचीदेखील आठवण करून देतात की, त्या वेळीसूत्रे कुणाच्या हाती होती. तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेशयादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे वडील मुलायमसिंह यादवयांची समाजवादी पार्टी सत्तेत होती आणि देशाची सूत्रे यूपीएसरकारकडे होती. दोन्ही ‘सेक्युलर’ शक्ती! बाबरी विध्वंस (1992) आणि गुजरात दंगली (2002) नंतरसार्वजनिक चर्चेचे ज्या प्रकारे ध्रुवीकरण झाले आहे, तेपाहता कधी-कधी परकीय दृष्टिकोन तुम्हाला अधिक स्पष्टचित्र दाखवतो. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्येछोट्या-छोट्या घटनांकडे कसे दुर्लक्ष केले गेले. जसे कीएका मुस्लिम मुलीवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न, एकाहिंदू मुलीला त्रास दिल्याच्या संशयावरून एका मुस्लिममुलाची हत्या आणि त्याचा बदला घेण्यासाठी हिंदू गटाकडूनदोन चुलत भावांची हत्या, जाट समुदायाच्या मिरवणुकीवरमुस्लिम गर्दीचा हल्ला... अशा सर्व घटना गांभीर्याने घेतल्यागेल्या नाहीत. सॅको सांगतात की दोन मुलांच्या हत्येप्रकरणीपोलिसांनी अनेक मुस्लिमांना अटक केली होती, ज्यांच्याशर्टवर रक्ताचे डाग होते. त्या सर्वांना दुसऱ्याच दिवशीसकाळी सोडून देण्यात आले आणि एसएसपी तसेच जिल्हादंडाधिकाऱ्यांची बदलीही करण्यात आली. सॅको यांनीलिहिले आहे की, यूपीमधील जाटांना या मुस्लिमांना संतुष्टकरण्याचा प्रयत्न वाटला असावा. सॅको यांनी ‘दि फ्युचररायट’ (भविष्यातील दंगल) शीर्षकाच्या 17 पानांच्यानिष्कर्षामध्ये लिहिले आहे की, या दंगलींमुळे भाजपला त्याराज्यात 2017 आणि 2022 च्या निवडणुका जिंकण्यासमदत झाली. पण, अशा गोष्टी सांगणाऱ्या पुस्तकावर कोणतेही सरकारबंदी घालणार नाही. अशा गोष्टी गेल्या एका दशकातप्रकाशित झालेल्या दोन डझन पुस्तकांमध्ये आढळूशकतात. हो, प्रकाशकाचे हे म्हणणे खरे आहे की, पुस्तकातभारताचा जो नकाशा दिला आहे, तो प्रकाशित करणेकायद्याचे उल्लंघन ठरेल. पण, अशा प्रकरणांना कसेहाताळायचे हे सर्वांना ठाऊक आहे. परदेशी प्रकाशनांमध्येअशा नकाशांवर ते चुकीचे असल्याची खूण केली जातेकिंवा ते काढून टाकले जातात. मात्र, याचे निमित्त करूनएखादे पुस्तक वितरित न करणे ही क्रूर थट्टाच असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) स्वातंत्र्यानंतर भारतात जातीय दंगलींचाप्रदीर्घ इतिहास राहिला आहे.भारतात 1960 ते 1996 या काळात 1,195 उल्लेखनीयजातीय दंगलींची नोंद झाली आहे. यापैकी 72 % म्हणजे871 दंगली या नेहरू, इंदिरा व राजीव गांधी सरकारच्याकार्यकाळात झाल्या. भारतात दंगलींचा सिलसिला बाबरीमशीद पतनानंतर सुरू झाला, असे नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- "देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
गुन्हा
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
























Subscribe to my channel




