शेखर गुप्ता यांचा कॉलम:दंगलीच्या कारणांवर चर्चा करणे गरजेचे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎माल्टा येथे जन्मलेले अमेरिकन व्यंगचित्रकार जो सॅको‎यांनी त्यांच्या अनोख्या ‘कॉमिक्स जर्नलिझम’च्या जोरावर‎जगभरात लोकप्रियता मिळवली आहेच, पण आता त्यांनी‎आपल्या समृद्ध बायोडाटात ‘द वन्स अँड फ्युचर रायट’ या‎ताज्या पुस्तकाची भर घातली आहे. मात्र, प्रकाशकाने या‎पुस्तकाचे वितरण थांबवले आहे. हे पुस्तक 2002 च्या‎गुजरात दंगलींनंतर झालेल्या सर्वात मोठ्या मुझफ्फरनगर‎दंगलीवर आधारित आहे.‎ प्रथम आपण तथ्यांवर नजर टाकूया. भारतात पुस्तकांवर‎बंदी येण्याचा दुर्दैवी इतिहास आहे. पण, सॅको यांच्या‎पुस्तकावर सरकारने बंदी घातलेली नाही. प्रकाशकानेच हे‎पाऊल उचलले आहे. त्यांनी पुस्तक रोखून त्यात काही‎सुधारणा सुचवणारी पाच पानांची एक नोंद पाठवली होती,‎जी सॅको यांनी फेटाळून लावली. आता अनेक भारतीय‎प्रकाशक सॅको यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत‎आहेत. सॅको यांचे म्हणणे आहे की, हे पुस्तक भारतीय‎वाचकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची इच्छा आहे.‎ 155 पानांच्या या पुस्तकात कॉमिक्स-पत्रकारितेचे उस्ताद‎सॅको यांनी आपल्या शानदार स्केचेसच्या माध्यमातून एक‎गुंतागुंतीची कथा सांगितली आहे. मजकूर केवळ‎‘ब्लर्ब्स’मध्ये आहे, जो वाचायला दोन तासांपेक्षा जास्त‎वेळ लागणार नाही, जर तुम्ही त्यांच्या रेखाचित्रांच्या‎मोहपाशात अडकला नाहीत तरच. पुस्तकावर बंदी नाही‎आणि कोणताही कायदा पुस्तक वाचण्यापासून रोखत नाही.‎सॅको यांनी 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीची जी कथा‎मांडली आहे, ती सरळ, मुख्यत्वे एका रेषेत चालणारी,‎तथ्यपूर्ण आहे आणि भारतीय पत्रकारितेत ती शंभर नाही तर‎अनेकदा सांगितली गेली आहे. पुस्तकात कोणतीही ‎‎आश्चर्यकारक गोष्ट सांगितलेली नाही, कोणताही नवीन ‎‎खुलासा झालेला नाही किंवा कशाचेही अतिरंजित वर्णन‎केलेले नाही. भारतीय संदर्भाचा विचार करता सॅको यांनी ‎‎दंगलीला ‘लहान’ असेच म्हटले आहे.‎ मग सॅको यांनी यावर अखेर संपूर्ण पुस्तक का लिहिले, ज्या ‎‎अर्थी बोस्निया आणि गाझा येथील नरसंहारावर लिहिलेल्या ‎‎कृतींमुळे त्यांना खूप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळाले‎आहेत? ज्या दंगलीला ते ‘लहान’ म्हणत आहेत, ज्यात 52 ‎‎मुसलमान आणि 20 हिंदू मिळून एकूण 62 लोक मारले गेले, ‎‎त्यामध्ये त्यांना इतका रस का वाटला? नवी दिल्लीपासून ‎‎अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर 62 लोकांचा बळी जाणे‎ही नक्कीच छोटी गोष्ट नाही. पण, तुम्हाला आवडो किंवा न ‎‎आवडो, जातीय दंगलींच्या आकाराचेही एक प्रमाण ठरले ‎‎आहे. सॅको यांचे ‘रिपोर्टिंग’ अविश्वसनीयरीत्या सूक्ष्म आहे, ‎‎परंतु काही बाबतीत ते चुकले आहेत असे म्हणता येईल. ‎‎उदाहरणार्थ, फाळणीच्या वेळी झालेल्या भीषण कत्तलींनंतर ‎‎भारतात जातीय दंगली 1992 मधील बाबरी मशीद‎विध्वंसानंतरच झाल्या, हा त्यांचा समज चुकीचा आहे.‎ गुजरातमध्ये तर 1992 च्या आधीपासूनच दंगलींचा इतिहास‎राहिला आहे, विशेषतः 1969 च्या अहमदाबाद दंगलीत 612‎लोक मारले गेले होते. मोठी आकडेवारी खूप काही सांगते.‎जातीय हिंसाचारावरील संशोधन ‘वार्ष्णेय-विल्किन्स न’‎डेटासेटवर आधारित आहे. हा डेटासेट ब्राउन युनिव्हर्सिटीचे‎प्राध्यापक आशुतोष वार्ष्णेय आणि येल युनिव्हर्सिटीचे‎प्राध्यापक स्टीव्हन विल्किन्सन यांच्या नावाने ओळखला‎जातो. यामध्ये भारतात 1960 ते 1996 दरम्यान झालेल्या‎1,195 उल्लेखनीय जातीय दंगलींची आकडेवारी‎नोंदवलेली आहे. त्यापैकी 72 टक्के म्हणजेच 871 दंगली‎नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधींच्या सरकारच्या काळात‎झाल्या. भारतात जातीय दंगलींचा सिलसिला बाबरी मशीद‎पाडल्यानंतर सुरू झाला नाही, परंतु विडंबना ही की सॅको‎यांनी हा तर्क स्वीकारला. जातीय दंगलींच्या रूपात‎असलेल्या आपल्या राष्ट्रीय लाजिरवाण्या गोष्टीबद्दल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अधिक जाणून घ्यायचे असेल, तर ‘पब्लिक पॉलिसी रिसर्च‎सेंटर’च्या वेबसाइटवरील ‘अ फॅक्ट शीट ऑन कम्युनल‎रायट्स’ नक्की पाहा.‎ परंतु, यामुळे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये ज्यावर‎सॅको यांनी भर दिला आहे. स्थानिक वाद कशा प्रकारे‎दंगलींचे रूप घेतात, जिथे नेतृत्वहीन आणि सुरुवातीला‎राजकारणापासून दूर असलेली गर्दी वरचढ ठरते. संधीचा‎फायदा घेऊन राजकारणी आणि सिद्धांतवादीदेखील त्यात‎उडी घेतात. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्ये हेच‎घडले. ते याचीदेखील आठवण करून देतात की, त्या वेळी‎सूत्रे कुणाच्या हाती होती. तेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेश‎यादव यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे वडील मुलायमसिंह यादव‎यांची समाजवादी पार्टी सत्तेत होती आणि देशाची सूत्रे यूपीए‎सरकारकडे होती. दोन्ही ‘सेक्युलर’ शक्ती!‎ बाबरी विध्वंस (1992) आणि गुजरात दंगली (2002) नंतर‎सार्वजनिक चर्चेचे ज्या प्रकारे ध्रुवीकरण झाले आहे, ते‎पाहता कधी-कधी परकीय दृष्टिकोन तुम्हाला अधिक स्पष्ट‎चित्र दाखवतो. सॅको सांगतात की मुझफ्फरनगरमध्ये‎छोट्या-छोट्या घटनांकडे कसे दुर्लक्ष केले गेले. जसे की‎एका मुस्लिम मुलीवर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न, एका‎हिंदू मुलीला त्रास दिल्याच्या संशयावरून एका मुस्लिम‎मुलाची हत्या आणि त्याचा बदला घेण्यासाठी हिंदू गटाकडून‎दोन चुलत भावांची हत्या, जाट समुदायाच्या मिरवणुकीवर‎मुस्लिम गर्दीचा हल्ला... अशा सर्व घटना गांभीर्याने घेतल्या‎गेल्या नाहीत. सॅको सांगतात की दोन मुलांच्या हत्येप्रकरणी‎पोलिसांनी अनेक मुस्लिमांना अटक केली होती, ज्यांच्या‎शर्टवर रक्ताचे डाग होते. त्या सर्वांना दुसऱ्याच दिवशी‎सकाळी सोडून देण्यात आले आणि एसएसपी तसेच जिल्हा‎दंडाधिकाऱ्यांची बदलीही करण्यात आली. सॅको यांनी‎लिहिले आहे की, यूपीमधील जाटांना या मुस्लिमांना संतुष्ट‎करण्याचा प्रयत्न वाटला असावा. सॅको यांनी ‘दि फ्युचर‎रायट’ (भविष्यातील दंगल) शीर्षकाच्या 17 पानांच्या‎निष्कर्षामध्ये लिहिले आहे की, या दंगलींमुळे भाजपला त्या‎राज्यात 2017 आणि 2022 च्या निवडणुका जिंकण्यास‎मदत झाली.‎ पण, अशा गोष्टी सांगणाऱ्या पुस्तकावर कोणतेही सरकार‎बंदी घालणार नाही. अशा गोष्टी गेल्या एका दशकात‎प्रकाशित झालेल्या दोन डझन पुस्तकांमध्ये आढळू‎शकतात. हो, प्रकाशकाचे हे म्हणणे खरे आहे की, पुस्तकात‎भारताचा जो नकाशा दिला आहे, तो प्रकाशित करणे‎कायद्याचे उल्लंघन ठरेल. पण, अशा प्रकरणांना कसे‎हाताळायचे हे सर्वांना ठाऊक आहे. परदेशी प्रकाशनांमध्ये‎अशा नकाशांवर ते चुकीचे असल्याची खूण केली जाते‎किंवा ते काढून टाकले जातात. मात्र, याचे निमित्त करून‎एखादे पुस्तक वितरित न करणे ही क्रूर थट्टाच असेल.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ स्वातंत्र्यानंतर भारतात जातीय दंगलींचा‎प्रदीर्घ इतिहास राहिला आहे.‎भारतात 1960 ते 1996 या काळात 1,195 उल्लेखनीय‎जातीय दंगलींची नोंद झाली आहे. यापैकी 72 % म्हणजे‎871 दंगली या नेहरू, इंदिरा व राजीव गांधी सरकारच्या‎कार्यकाळात झाल्या. भारतात दंगलींचा सिलसिला बाबरी‎मशीद पतनानंतर सुरू झाला, असे नाही.‎

This post was originally published on this site.



गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *