1. ‘मला डॉक्टर व्हायचे होते. मी नेहमी चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास करत असे. पण जपान्यांनी मला सांगितले की अभ्यास का महत्त्वाचा आहे. तेथील शिक्षणाचे मूळ तत्त्व हे आहे की तंत्रज्ञानातील प्रगती जिज्ञासेमुळे झाली आहे.’ 2. ‘संपूर्ण देश स्वच्छ आहे. आपल्याला तिथे प्लास्टिकचा एक तुकडाही दिसणार नाही. मी त्यांच्या दयाळूपणा, सहानुभूती आणि जबाबदारीच्या भावनेने खूप प्रभावित झालो.’ 3. ‘मी जपानी लोकांचा सिव्हिक सेन्स पाहून थक्क झालो. तिथे लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते.’ या गोष्टी कोणत्याही महान व्यक्तीने सांगितलेल्या नाहीत, तर गुरुवारी या प्रतिक्रिया कर्नाटकातील त्या तीन विद्यार्थ्यांच्या होत्या. ते 56 भारतीय विद्यार्थ्यांच्या गटासोबत काशिवा येथील ‘शिबुरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये गेले होते. तिथे त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्यांसह प्रमुख वैज्ञानिकांच्या विशेष वर्गांना उपस्थिती लावली. जपानच्या प्रमुख विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना भेटी दिल्या. जपानी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला आणि तिथली संस्कृती अनुभवली. त्याच गुरुवारी कोलकाता येथे राज्याच्या नगरविकासमंत्री अग्निमित्रा पॉल यांनी घोषणा केली की, ‘पुढील तीन महिने आम्ही जनजागृती आणि पायाभूत सुविधा उभारणी मोहीम राबवू. लोकांना रस्त्यावर कचरा न फेकण्याचे आवाहन करू. तीन महिन्यांनंतर 1 सप्टेंबरपासून कचरा पसरवणाऱ्यांवर दंड आकारला जाईल.’ या मुलांसाठी सर्वात मोठा धडा हा होता की, तिथल्या शाळांमध्ये नागरी जबाबदारी, नैतिकता, सहानुभूती आणि संयम शिकवण्यावर जास्त भर दिला जातो. हा अनुभव या विद्यार्थ्यांना सवय असलेल्या अनुभवापेक्षा अगदी वेगळा होता. भारतीय शिक्षण व्यवस्थेत ‘स्टेम’ (STEM - विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित), बोर्डाच्या परीक्षा आणि लहान वयापासूनच इंग्रजीवरील प्रभुत्वाला अतिशय प्राधान्य दिले जाते. भारतात यशाचे मोजमाप बहुधा गुण, रँक आणि पुस्तकी ज्ञानाने केले जाते. तर जपानमध्ये, विशेषत: सुरुवातीच्या आणि विशेष विकासाच्या टप्प्यांवर, यश यावरून मोजले जाते की मूल आपले दैनंदिन जीवन किती चांगल्या प्रकारे हाताळते, टीमला किती सहकार्य करते आणि किती भावनिक कणखरपणा दाखवते. तिथल्या अभ्यासक्रमाकडे बारकाईने पाहिले तर, तो जाणीवपूर्वक असा बनवला आहे की ज्यामुळे स्वतंत्र आणि नागरी भान असलेले प्रौढ घडवले जातील. तिथे स्वयंपाक आणि शिलाईदेखील शिकवली जाते, ज्याला ‘कतैका’ म्हणतात. हा कोणताही निरुपयोगी विषय नसून, ‘होम इकॉनॉमिक्स’ म्हणून जपानमध्ये मुले आणि मुली या दोघांसाठीही तो सक्तीचा विषय आहे. विद्यार्थी हे केवळ मोठे झाल्यावर पालक किंवा घरगुती मदतनिसांवर अवलंबून राहू नये म्हणून शिकत नाहीत, तर यामध्ये ते पोषण समतोल, बजेटिंग आणि कपड्यांची दुरुस्ती शिकतात. त्यानंतर संगीत आणि खेळ येतात. ते याला बौद्धिक विकास, भावनिक अभिव्यक्ती आणि सामूहिक सामंजस्याचे आवश्यक साधन मानतात. जपानमध्ये बालपणीच्या जड शैक्षणिक परीक्षा जाणीवपूर्वक टाळल्या जातात. तिथे अशी मान्यता आहे की शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांत मुलांना परीक्षेतील गुणांच्या आधारे ‘स्मार्ट’ आणि स्ट्रगलिंग अशा श्रेणींमध्ये विभागण्याऐवजी, त्यांच्यात चारित्र्य, वागणूक आणि समाजाप्रति जवळीक निर्माण केली पाहिजे. जपानचे शिक्षण मंत्रालय या व्यवस्थांना स्पष्टपणे ‘इकिरू चिकारा’ नावाच्या तत्त्वाभोवती गुंफते, ज्याचा अर्थ आहे- ‘जगण्याचा उत्साह’. याचा उद्देश तीन मुख्य स्तंभांमध्ये समतोल साधणे हा आहे: 1. शैक्षणिक योग्यता, केवळ पाठांतरासाठी नाही तर समस्या सोडवण्यासाठी. 2. समृद्ध मानवी गुण, म्हणजेच नैतिकता, सहानुभूती आणि नागरी जबाबदारी. 3. आरोग्य आणि शारीरिक कणखरपणा, जो चिकाटी आणि स्वयंशिस्त आणतो. जपानी शाळांचा अर्थ केवळ शैक्षणिक अभ्यासापेक्षा खूप मोठा आहे. त्या चारित्र्य घडवण्याच्या संपूर्ण यंत्रणेप्रमाणे काम करतात, जिथे नैतिकता, नागरी कर्तव्य आणि कडक सामाजिक शिस्त दैनंदिन जीवनात समाविष्ट केली जाते. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी शाळा चालवण्यात सक्रिय सहभाग घेतात, कठोर क्लब उपक्रमांमध्ये भाग घेतात आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.
फंडा असा आहे की, ही लढाई नैतिकता आणि दबावामधील आहे. जर तुम्हाला भावी पिढीसाठी हे युद्ध जिंकायचे असेल, तर त्यांना शालेय दिवसांतच सहानुभूतीचा धडा शिकवणे निवडा, जेणेकरून आपल्याला कारवाईसाठी कायदे बनवण्यास भाग पडावे लागणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




