पुणे: पुणे शहरातून गोळा होणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रकल्पाच्या संदर्भात महापालिकेने अखेर नरमाईची भूमिका घेत महत्त्वाची पीछेहाट केली आहे. वृत्तपत्राने या प्रकल्पातील वाढीव दरांबाबत आणि संभाव्य आर्थिक उधळपट्टीबाबत आक्रमक भूमिका मांडल्यानंतर, प्रशासनाने तातडीने दखल घेत प्रकल्पाच्या निविदेतील प्रतिटन दरामध्ये मोठी कपात केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेचे तब्बल १४९ कोटी रुपये वाचले असून, शहराच्या तिजोरीवरील मोठा आर्थिक भार टळला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुणे महापालिकेच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा व्यवस्थितपणे विल्हेवाट लावण्यासाठी ५०० मेट्रिक टन प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी मे. भूमी ग्रीन एनर्जी एनव्हायरोकेअर एलएलपी (Bhumi Green Energy Environcare LLP) या कंपनीने प्रतिटन ९४३ रुपये इतका उच्च दर नमूद केला होता. सुरुवातीला प्रशासनाकडून याच वाढीव दराने प्रक्रिया शुल्क देण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिटन दर आकारल्यास महापालिकेला पुढील २० वर्षांत कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला असता.
माध्यमांचा दणका आणि दरकपात:
कचरा प्रकल्पाच्या या निविदेतील अव्वाच्या सव्वा दरामुळे महापालिकेची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दा वृत्तपत्राने पुराव्यासহ लावून धरला. या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला. अखेर महापालिकेने तडजोड करत संबंधित ठेकेदार कंपनीशी चर्चा केली आणि प्रतिटन ९४३ रुपये असणारा दर थेट ७७२ रुपयांवर आणून ठेवला.
तसेच, या प्रकल्पाच्या करारामध्ये महागाईचा दर (Inflation Hike) १० टक्के देण्याचे निश्चित करण्यात आले होते, तो देखील कमी करून ७ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वीच्या अंदाजित दरानुसार पुढील २० वर्षांत महापालिकेला या प्रकल्पासाठी जवळपास ७२६ कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागला असता. परंतु, आता दरांमध्ये फेरफार झाल्यामुळे महापालिकेची थेट १४९ कोटी रुपयांची बचत झाली असून, भविष्यातील संभाव्य आर्थिक उधळपट्टीला मोठा लगाम बसला आहे. प्रशासनाच्या या यू-टर्नमुळे आणि निर्णयामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



