
Ahilyanagar : जिल्ह्यात गॅस तुटवडा निर्माण होईल या भीतीने नागरिकांकडून गॅस सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र जिल्ह्यात घरगुती गॅसचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर गॅस तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यातून अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घाई किंवा साठेबाजी करू नये. दरम्यान, गॅस सिलेंडरचा गैरवापर होऊ नये आणि अवैध रिफिलिंगचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके तैनात करण्यात आली असून अवैध रिफिलिंग सेंटरवर लक्ष ठेवले जात आहे. कुठेही बेकायदेशीर रिफिलिंग आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
धार्मिक स्थळांवरही प्रशासनाचे विशेष लक्ष
याशिवाय जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांवरही प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने येथील प्रसादालयांमध्ये गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या प्रसादालयांमधील गॅस साठ्याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे प्रसाद वितरणात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पुरेसा गॅस साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या दोन्ही ठिकाणी प्रसादालये नियमित सुरू असून गॅस तुटवड्याचा प्रश्न उद्भवणार नसल्याचेही जिल्हाधिकारी आशिया यांनी स्पष्ट केले.
तसेच एकदा गॅस सिलेंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक साठा करण्याऐवजी नियमित पद्धतीने गॅस बुकिंग करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अफवांमुळे निर्माण झालेल्या घबराटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हाभरात सतर्कता वाढवली असून गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




