
Pimpri : नागरिकांना भेटीसाठी राखीव ठेवलेल्या आठवड्यातील तीन दिवसांच्या वेळेत दोन अतिरिक्त आयुक्तांसह ३४ वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
महापालिकेत मागील तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. अनेक नागरिक कामासाठी महापालिकेत येतात. मात्र, अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांसाठी भेटीची वेळ देणे, नोंद वही ठेवणे, भेटीची वेळ दर्शविणारे फलक लावणे आदी सूचना दिल्या आहेत. विविध कामांसाठी महापालिकेत येणा-या नागरिकांना भेटण्यासाठीच्या अधिकाऱ्यांच्या वेळा आयुक्त सिंह यांनी निश्चित केल्या आहेत.
सर्व विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजासाठी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दुपारी तीन ते सायंकाळी सहा ही समान वेळ राखीव ठेवावी. या कालावधीत विभाग अंतर्गत बैठका, प्रकल्प भेटीचे आयोजन करू नये. भेटीचा कालावधी सूचना फलकांवर ठळकपणे प्रदर्शित करावा. प्रत्येक नागरिकांचे म्हणणे पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावे. त्यांना आवश्यक सहकार्य करावे. तक्रारींचे अधिक जलदगतीने निराकारण करावे. तक्रारींचे निराकारण झाले की नाही याची खात्री करावी. संबंधितांना त्याची माहिती द्यावी.
त्याचबरोबर कार्यालयीन वेळेनंतरच कार्यालय सोडण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नागरिकांसाठीच्या राखीव वेळेत ३४ अधिकारी कार्यालयात हजर नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाच्या पाहणीत समोर आले. दहा दिवसांचा अधिका-यांच्या उपस्थितीचा अहवाल तयार करून तो आयुक्तांकडे सादर केला आहे. यामध्ये ३४ अधिकारी एकपेक्षा अधिक वेळा गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




