मुंबई: लाडक्या बाप्पाच्या आणि गौरी-गणपतीच्या आगमनासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला असून, कोकणातील चाकरमान्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात आपल्या गावी जात असतात. मात्र, या काळात रेल्वेची तिकिटे काही मिनिटांतच संपत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. चाकरमान्यांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST Mahamandal) यंदा एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या धर्तीवर गणेशोत्सवासाठी देखील मोठ्या प्रमाणावर विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, यंदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून ५,२२० जादा बसेस चालवल्या जाणार आहेत.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक:
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी आणि वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासंदर्भात एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती मुख्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटीचे सर्व प्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यावर आणि सुरळीत वाहतूक राखण्यावर विशेष भर देण्यात आला.
प्रवाशांसाठी बस आरक्षण सुरू:
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटीच्या या जादा बसेसचे आरक्षण (Reservation) आता अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. चाकरमान्यांना गर्दीच्या वेळेस तासनतास ताटकळत राहावे लागू नये किंवा ऐनवेळी प्रवासाची अडचण होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाने आधीच बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवासी अधिकृत एसटी संकेतस्थळावरून (Website) किंवा एसटीच्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आपल्या बसचे आरक्षण करू शकतात.
स्थानिक स्तरावर किंवा ग्रुप बुकिंगसाठी सुद्धा महामंडळाकडून विशेष सवलती आणि सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, जेणेकरून चाकरमान्यांचा कोकण प्रवास सुखकर आणि आनंददायी होईल. या ५,२२० जादा बसेसमुळे मुंबई, ठाणे, कल्याण यांसारख्या प्रमुख शहरांमधून कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटीची लालपरी यंदाही कोकनवासीयांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



